शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अखेर नवव्या दिवशी पाचंगेंचे उपोषण मागे

By admin | Updated: May 11, 2017 04:11 IST

शेतकरीबांधवांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ११ कलमी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी

लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : शेतकरीबांधवांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ११ कलमी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांचे आमरण उपोषण सुरू होते. तब्बल आठ दिवस उलटूनही शासनदरबारी मागण्या मान्य करण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली केल्या जात नव्हत्या. त्यामुळे पाचंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या आंदोलकांमधून चिडीची भावना व्यक्त होत होती. अखेर उपोषणाच्या नवव्या दिवशी मंगळवारी (दि. ९) रात्री उशिरा आमदार सुरेश गोरे यांनी आंदोलनस्थळी पाचंगे यांची भेट घेतली. शेतकरीहिताच्या असलेल्या प्रमुख ११ कलमी मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी आपली विशेष तातडीची बैठक आयोजिली जाईल, अशा आशयाचे लेखी पत्र पाचंगे यांच्याकडे सुपूर्त केल्यानंतर पाचंगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख राम गावडे, विजय शिंदे, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर, मधुकर शिंगाडे, दीपाली शेळके, बाळासाहेब शेळके, शिवाजी मांढरे, उमेश मोरे, सुहास मलगुंडे, नामदेव गोडसे, भूदेव शिंदे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. विजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दीपाली शेळके यांनी आभार मानले.