शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अखेर १५ ऑगस्टला ग्रामसभा घेता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:15 IST

पुणे : कोरोनामुळे गेल्या एक-दीड वर्षांपासून ग्रामसभा आयोजित करण्यावर मर्यादा आल्या आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यासह राज्यात ...

पुणे : कोरोनामुळे गेल्या एक-दीड वर्षांपासून ग्रामसभा आयोजित करण्यावर मर्यादा आल्या आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळेच १५ ऑगस्टला ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेता येणार आहे. गावांतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन सुरक्षित अंतर राखून ग्रामसभांचे आयोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ नुसार १५ ऑगस्टला ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र, सद्यस्थितीत १५ ऑगस्टला ग्रामसभा घ्यावी किंवा नाही याबाबत मार्गदर्शनासाठी काही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून शासनाकडे विचारणा करण्यात आले होते. त्यानुसार शासनाने दिलेल्या पत्रात कोविड प्रादुर्भावास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील मागील एक महिन्यातील कोविड रुग्णसंख्या व जिल्ह्याचा पाॅझिटिव्ह दर व ज्या गावांमध्ये ग्रामसभा आयोजित करावयाची आहे. तेथील रुग्णसंख्या लक्षात घेऊन ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत. या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संयुक्तपणे दिले आहेत. ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाल्यास उपाययोजनांचे पालन करून ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.