शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
4
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
6
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
7
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
8
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
9
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
10
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
11
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
12
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
13
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
14
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
15
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
16
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
17
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

प्रवेशद्वार मोजतंय अखेरच्या घटका

By admin | Updated: May 1, 2017 02:00 IST

हिवरेतर्फे नारायणगावपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर पूर्व पश्चिम विस्तारलेला किल्ले नारायणगड इतक्या वर्षांनंतरही

अशोक खरात / खोडदहिवरेतर्फे नारायणगावपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर पूर्व पश्चिम विस्तारलेला किल्ले नारायणगड इतक्या वर्षांनंतरही आपल्या अंगाखांद्यावर कोसळलेल्या अवस्थेत असलेल्या प्राचीन प्रवेशद्वार व इतर वास्तूंमुळे एक गडकोट किल्ला म्हणून आपली स्वत:ची ओळख देत अखेरचा श्वास घेत उभा आहे.नारायणगडावरील राजवाड्याजवळील कोसळलेल्या प्रवेशद्वाराची गणेशपट्टी, खांब व शेजारीच असलेले सामर्थ्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे शरभशिल्प हे नारायणगडाच्या प्राचीन अस्तित्वाची आजही साक्ष देत आहेत. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे नारायणगडावरील ऐतिहासिक वारसा जपत असलेली एक एक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.नारायणगडावर आढळणारी प्राचीन शिल्प, पाण्याच्या टाक्या व येथील इतर प्राचीन वास्तू शिवकालीन (१६ व्या शतकातील) आहेत. नारायणगड हा शिवकालीन असावा असा तर्क दुर्गअभ्यासकांकडून लावला जात आहे. नारायणगडावर एका झाडाचा आधार घेत उभा असलेला काही भाग आणि कोसळलेला काही भाग अशा अवस्थेतील हे दगडी प्रवेशद्वार निश्चित पर्यटकांना व अभ्यासकांना प्राचीन काळात घेऊन जात आहेत.हिवरे, खोडद, नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर, मंचर येथील तरुणांनी एकत्र येऊन व्हॉट्सअ‍ॅपवर ‘दुर्गप्रेमी-निसर्गमित्र’ नावाचा ग्रुप तयार केला असून, हा ग्रुप व शिवाजी ट्रेल या संस्थेच्या वतीने नारायणगड संवर्धनाचे कार्य दोन वर्षांपासून हाती घेण्यात आले आहे.शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडून नारायणगडाची कोणतीच दखल न घेतल्याने गडावरील या प्राचीन वास्तू शेवटच्या घटका मोजताना पाहावयास मिळत आहेत. जुन्नर तालुक्यात शिवनेरी, चावंड, हडसर, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, नारायणगड असे सात किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांपैकी एकमेव नारायणगड असा किल्ला आहे की ज्याचे बुरुज व चोरदिंडी दरवाजा आजही शाबूत आहेत. चोरदिंडी दरवाजा म्हणजे साधारणपणे चार फूट बाय चार फूट रुंदीचे चौकोनी भुयार होय. या भुयारावर वरच्या बाजूने मोठमोठे दगड लावून या दगडांवर माती टाकून हा दरवाजा पूर्णपणे झाकून ठेवला जात असे.विशेष म्हणजे हा चोरदिंडी दरवाजा झाडाझुडपांनी पूर्णपणे वेढलेला असल्याने तो शत्रुसैन्याच्या लक्षात येत नसायचा. शत्रूच्या सैन्याने किल्ल्याला वेढा दिल्यानंतर किंवा किल्ल्यावर आक्रमण केल्यानंतर किल्ल्यावरील सैनिक या चोरदिंडी दरवाजावरील माती व दगड बाजूला करून दोराच्या सहायाने खोल दऱ्यांच्या मार्गे सुखरुप निघून जात असत.वेळप्रसंगी पुन्हा त्याच मार्गाने किल्ल्यावर येऊन शत्रूसैन्यावर पुन्हा नव्या जोमाने हल्ला चढवायचा आणि त्यांना नेस्तनाबूत करायचे. केवळ याच दोन मुख्य कारणांसाठी या चोरदिंडी दरवाजाचा वापर केला जायचा.