शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मतपत्रिका स्वत: देण्यावर भर

By admin | Updated: March 3, 2016 01:40 IST

मतपत्रिका पळविणे, बोगस मतपत्रिका, या गोष्टींमुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला गेल्या काही वर्षांपासून ‘राजकीय’ रंग चढला आहे

पुणे : मतपत्रिका पळविणे, बोगस मतपत्रिका, या गोष्टींमुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला गेल्या काही वर्षांपासून ‘राजकीय’ रंग चढला आहे. यंदा निवडणूक प्रक्रियेला ‘शिस्त’ लावण्यात आली असल्याने मतपत्र्किा स्वत: देण्याकडे मतदारांचा कल असल्याचे दिसून येत आहे.मसाप निवडणूक कि ंवा साहित्य संमेलन अध्यक्ष निवडणुकीत नेहमी गोंधळाचे वातावरण असते. मतपत्रिका एकगठ्ठा आणून दिल्या जातात. पण, या निवडणुकीत मतपत्रिकांचा गोंधळ होण्याचे प्रमाण जवळपास नगण्य आहे. त्यामुळे मतदारांकडून मतपत्रिका पाठविण्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. परंतु या काहीशा कडक धोरणामुळे उमेदवारांची मात्र पंचाईत झाली आहे. गतवेळची मसापची निवडणूक ही मतपत्रिकांची पळवापळवी, बोगस मतपत्रिकांमुळे गाजली. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये आणि मतदारांचा निवडणूकप्रक्रियेमध्ये थेट सहभाग वाढावा, या उद्देशाने यंदा प्रथमच निवडणूकप्रक्रियेचे धोरण काहीसे कडक करण्याबरोबरच त्याला ‘शिस्त’ लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मतपत्रिकेला बारकोड लागू करण्याबरोबरच मतदारांनी मतपत्रिकेबरोबरच ओळखपत्र सादर करणे आणि मतपत्रिकेला पोस्ट क्रमांक देणे या गोष्टींमुळे मतदानप्रक्रिया अधिक पारदर्शक ठरली आहे. त्यामुळे मतपत्रिका पाठविण्याचा ओघ वाढत आहे.बाहेरगावचे प्रतिनिधी स्वत: मतपत्रिका आणून देत असले, तरीही ज्या व्यक्तीने आणून दिले तिचे नाव, पत्ता याची नोंद ठेवली जात आहे. उमेदवारांविरुद्ध तक्रार किंवा बोगस मतपत्रिका आढळल्या, तर कडक कारवाई केली जाणार आहे. राज्यात ११ हजार मतदार आहेत. आजमितीला अंदाजे दीड ते दोन हजार मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. शेवटच्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे निवडणूक अधिकारी परदेशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)