शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

मतपत्रिका स्वत: देण्यावर भर

By admin | Updated: March 3, 2016 01:40 IST

मतपत्रिका पळविणे, बोगस मतपत्रिका, या गोष्टींमुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला गेल्या काही वर्षांपासून ‘राजकीय’ रंग चढला आहे

पुणे : मतपत्रिका पळविणे, बोगस मतपत्रिका, या गोष्टींमुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला गेल्या काही वर्षांपासून ‘राजकीय’ रंग चढला आहे. यंदा निवडणूक प्रक्रियेला ‘शिस्त’ लावण्यात आली असल्याने मतपत्र्किा स्वत: देण्याकडे मतदारांचा कल असल्याचे दिसून येत आहे.मसाप निवडणूक कि ंवा साहित्य संमेलन अध्यक्ष निवडणुकीत नेहमी गोंधळाचे वातावरण असते. मतपत्रिका एकगठ्ठा आणून दिल्या जातात. पण, या निवडणुकीत मतपत्रिकांचा गोंधळ होण्याचे प्रमाण जवळपास नगण्य आहे. त्यामुळे मतदारांकडून मतपत्रिका पाठविण्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. परंतु या काहीशा कडक धोरणामुळे उमेदवारांची मात्र पंचाईत झाली आहे. गतवेळची मसापची निवडणूक ही मतपत्रिकांची पळवापळवी, बोगस मतपत्रिकांमुळे गाजली. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये आणि मतदारांचा निवडणूकप्रक्रियेमध्ये थेट सहभाग वाढावा, या उद्देशाने यंदा प्रथमच निवडणूकप्रक्रियेचे धोरण काहीसे कडक करण्याबरोबरच त्याला ‘शिस्त’ लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मतपत्रिकेला बारकोड लागू करण्याबरोबरच मतदारांनी मतपत्रिकेबरोबरच ओळखपत्र सादर करणे आणि मतपत्रिकेला पोस्ट क्रमांक देणे या गोष्टींमुळे मतदानप्रक्रिया अधिक पारदर्शक ठरली आहे. त्यामुळे मतपत्रिका पाठविण्याचा ओघ वाढत आहे.बाहेरगावचे प्रतिनिधी स्वत: मतपत्रिका आणून देत असले, तरीही ज्या व्यक्तीने आणून दिले तिचे नाव, पत्ता याची नोंद ठेवली जात आहे. उमेदवारांविरुद्ध तक्रार किंवा बोगस मतपत्रिका आढळल्या, तर कडक कारवाई केली जाणार आहे. राज्यात ११ हजार मतदार आहेत. आजमितीला अंदाजे दीड ते दोन हजार मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. शेवटच्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे निवडणूक अधिकारी परदेशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)