शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

By admin | Updated: August 23, 2015 04:46 IST

कचऱ्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनीच कंबर कसली असून, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे छायाचित्र काढून फ्लेक्सवर लावण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट

पुणे : कचऱ्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनीच कंबर कसली असून, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे छायाचित्र काढून फ्लेक्सवर लावण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच आवश्यकतेनुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबतही अधिकाऱ्यांना बजावले.दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पुण्याच्या कचऱ्याच्या प्रश्नावर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, सर्व पक्षांचे गटनेते, पालिका आयुक्त कुणाल कुमार आदी या बैठकीस उपस्थित होते. पालिका आयुक्तांनी कचरा व्यवस्थापनाबाबत बैठकीत माहिती सांगितली. तसेच स्वच्छ संघटनेच्या मदतीने कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. तसेच येत्या ७ सप्टेंबरपर्यंत शहरातील बहुतांश कचरा शहरात व शहरालगत निर्माण केलेल्या प्रकल्पामध्ये जिरविला तरीही ३00 ते ५00 टन कचरा शहराबाहेर टाकण्यासाठी डंपिंग ग्राऊंडची आवश्यकता भासणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, एकट्या स्वच्छ संघटनेवर अवलंबून न राहता पालिकेने स्वत:ची यंत्रणा निर्माण करावी, अशी भूमिका गिरीष बापट यांच्यासह सर्व पक्षाच्या गटनेत्यांनी मांडली.रस्त्यावर कचरा टाकण्यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांना शिस्त लागणे गरजेचे आहे. त्यामुळे कचरा पेटीच्या जवळ किंवा रस्त्यावर कचरा टाकणा-यांचे फोटो काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी,असे स्पष्ट करून बापट म्हणाले,रात्री चायनिजच्या गाड्या किंवा हातगाड्या चालविणा-यांवर लक्ष देण्यासाठी पालिकेने यंत्रणा निर्माण करावी. शहरातील प्रत्येक नागरिकाची मानसिकता लक्षात घेवून कचरा व्यवस्थापनाबाबतच्या उपाययोजना करण्यास सांगितले. कच-याच्या प्रश्नावर पालिका प्रशासनाने खोलवर विचार केला नसल्याने अधिका-यांची कान उघडनी केली.कचऱ्याचा प्रश्न गंभीर असून, तो एकट्या पालिका प्रशासनाला सोडविता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातील नगरसेवकाला यात सहभागी करून घ्यायला हवे, असे स्पष्ट करून बापट म्हणाले, कचरा विलगीकरणासाठी शहरातील पालिकेच्या जागांवर लहान प्रकल्प उभारावेत. सुक्या कचऱ्यापासून अनेकांना उत्पन्न कसे मिळेल याचा विचार करावा. १0 टनापर्यंत सुका कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्यांना लहान टॅम्पो उपलब्ध करून द्यावेत. कचऱ्याच्या प्रश्न सुटला नाही तर वॉर्डातील नागरिक पुढील काळात आताच्या नगरसेवकांना सत्तेपासून दूर ठेवतील. त्यामुळे नगरसेवकही हा प्रश्न सोडविण्यासाठी मदत करतील.ओल्या कच-यापासून खत निर्माण करण्यावर पालिकेने भर द्यावा.खतामधून प्लास्टिकच्या पिशव्या जात असल्याचे शेतक्-यांचा लक्षात आले तर शेतकरी खत घेण्यास नकार देतील.त्यामुळे खूप गंभीर प्रश्न निर्माण होईल.त्यसाठी चांगले खत निर्माण करा.