शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

By admin | Updated: August 23, 2015 04:46 IST

कचऱ्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनीच कंबर कसली असून, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे छायाचित्र काढून फ्लेक्सवर लावण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट

पुणे : कचऱ्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनीच कंबर कसली असून, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे छायाचित्र काढून फ्लेक्सवर लावण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच आवश्यकतेनुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबतही अधिकाऱ्यांना बजावले.दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पुण्याच्या कचऱ्याच्या प्रश्नावर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, सर्व पक्षांचे गटनेते, पालिका आयुक्त कुणाल कुमार आदी या बैठकीस उपस्थित होते. पालिका आयुक्तांनी कचरा व्यवस्थापनाबाबत बैठकीत माहिती सांगितली. तसेच स्वच्छ संघटनेच्या मदतीने कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. तसेच येत्या ७ सप्टेंबरपर्यंत शहरातील बहुतांश कचरा शहरात व शहरालगत निर्माण केलेल्या प्रकल्पामध्ये जिरविला तरीही ३00 ते ५00 टन कचरा शहराबाहेर टाकण्यासाठी डंपिंग ग्राऊंडची आवश्यकता भासणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, एकट्या स्वच्छ संघटनेवर अवलंबून न राहता पालिकेने स्वत:ची यंत्रणा निर्माण करावी, अशी भूमिका गिरीष बापट यांच्यासह सर्व पक्षाच्या गटनेत्यांनी मांडली.रस्त्यावर कचरा टाकण्यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांना शिस्त लागणे गरजेचे आहे. त्यामुळे कचरा पेटीच्या जवळ किंवा रस्त्यावर कचरा टाकणा-यांचे फोटो काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी,असे स्पष्ट करून बापट म्हणाले,रात्री चायनिजच्या गाड्या किंवा हातगाड्या चालविणा-यांवर लक्ष देण्यासाठी पालिकेने यंत्रणा निर्माण करावी. शहरातील प्रत्येक नागरिकाची मानसिकता लक्षात घेवून कचरा व्यवस्थापनाबाबतच्या उपाययोजना करण्यास सांगितले. कच-याच्या प्रश्नावर पालिका प्रशासनाने खोलवर विचार केला नसल्याने अधिका-यांची कान उघडनी केली.कचऱ्याचा प्रश्न गंभीर असून, तो एकट्या पालिका प्रशासनाला सोडविता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातील नगरसेवकाला यात सहभागी करून घ्यायला हवे, असे स्पष्ट करून बापट म्हणाले, कचरा विलगीकरणासाठी शहरातील पालिकेच्या जागांवर लहान प्रकल्प उभारावेत. सुक्या कचऱ्यापासून अनेकांना उत्पन्न कसे मिळेल याचा विचार करावा. १0 टनापर्यंत सुका कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्यांना लहान टॅम्पो उपलब्ध करून द्यावेत. कचऱ्याच्या प्रश्न सुटला नाही तर वॉर्डातील नागरिक पुढील काळात आताच्या नगरसेवकांना सत्तेपासून दूर ठेवतील. त्यामुळे नगरसेवकही हा प्रश्न सोडविण्यासाठी मदत करतील.ओल्या कच-यापासून खत निर्माण करण्यावर पालिकेने भर द्यावा.खतामधून प्लास्टिकच्या पिशव्या जात असल्याचे शेतक्-यांचा लक्षात आले तर शेतकरी खत घेण्यास नकार देतील.त्यामुळे खूप गंभीर प्रश्न निर्माण होईल.त्यसाठी चांगले खत निर्माण करा.