शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

लढाऊ विमानांची होणार आता निर्धोक भरारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:51 IST

लढाऊ विमाने उडवण्यासाठी वैमानिकांकडे अतिउच्च कौशल्याची गरज असते. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे तसेच मानवीय चुकांमुळे विमानांचे अपघात होतात.

निनाद देशमुख पुणे : लढाऊ विमाने उडवण्यासाठी वैमानिकांकडे अतिउच्च कौशल्याची गरज असते. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे तसेच मानवीय चुकांमुळे विमानांचे अपघात होतात. भविष्यातील असे अपघात टाळण्यासाठी तसेच वैमानिकांचा थकवा तसेच तणाव कमी करून त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी डीआरडीओच्या सहकार्याने नव्या यंत्रणेचा विकास करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात भारतीय हवाई दलातील वैमानिक कठीण परिस्थीतही चांगली कामगिरी करू शकणार आहेत, अशी माहिती हवाई दलाच्या आरोग्य विभागाचे प्रमुख एअर मार्शल पवन कुमार यांनी दिली.लढाऊ विमाने उडवण्यासाठी अनेक कसोट्यांना वैमानिक पुढे जात असतात. तासन्तास विमानाचे उड्डाण करताना तणाव, थकवा तसेच अनेक मानसिक आव्हानांचा सामना वैमानिकांना करावा लागतो. या परिस्थितीत चुका होऊन अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे वैमानिकांवरील तणाव कमी असणे गरजेचे असते. यासाठी डीआरडीओच्या साह्याने नवी यंत्रणा विकसित करण्यात येत असून वैमानिकांवर याचे काय परिणाम होतात, याच्या चाचण्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.सध्या, उड्डाणापूर्वी वैमानिकाच्या पूर्व-वैद्यकीय चाचण्या वायुसेनेतर्फे घेतल्या जातात. वैमानिकांसाठी तयार करण्यात येणारी नवी यंत्रणा ही सध्यस्थितीत असलेल्या यंत्रणेपेक्षा अधिक प्रभावी आहे. ही यंत्रणा अधिक वस्तूनिष्ठ आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या तपासणीत न आढळलेल्या गोष्टी या यंत्रणेद्वारे माहिती करणे शक्य होणार आहे. वैमानिकांच्या डोळ्यांच्या हालचाली, शारीरिक हालचाली, त्याची मानसिक स्थिती अभ्यासता येणार आहे. ही यंत्रणा हाताळण्यास अधिक सोपी असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परदेशात वैमानिकांना येणाºया अडचणी तपासण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा विकास झाला आहे. भारतातही या सारख्या यंत्रणेची गरज होती. या नव्या यंत्रणेमुळे वैमानिकांना अधिक सक्षम बनवता येणार आहे.वैमानिकांना अनावर होणारी झोप यावर संशोधन सुरू आहे. यासाठी ४० वैमानिकांची चाचणी घेण्यात आली होती. यात अनेक तथ्ये पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लांब पल्यांच्या उड्डाणावेळी सतर्क राहण्यासाठी तसेच झोप टाळण्यासाठी वैमानिकांद्वारे काही औषधांचे सेवन करण्यात येते. यामुळे अल्पझोपेच्या तक्रारीवर मात करता येते. लढाऊ विमान चालवतांना वैमानिकाला सतर्क राहावे लागते. एक छोटीशी चूक अपघातासाठी कारणीभूत ठरू शकते.एका विमानाची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असते. त्यामुळे हवाई दलाला असे अपघात परवडणारे नसतात.अशा प्रकारच्या यंत्रणेमुळे वैमानिकाचा थकवा तसेच तणाव कमी करता येईल, आणि मानवी चुका टाळता येतील, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका वैमानिकाने सांगितले.