शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

लढाऊ विमानांची होणार आता निर्धोक भरारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:51 IST

लढाऊ विमाने उडवण्यासाठी वैमानिकांकडे अतिउच्च कौशल्याची गरज असते. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे तसेच मानवीय चुकांमुळे विमानांचे अपघात होतात.

निनाद देशमुख पुणे : लढाऊ विमाने उडवण्यासाठी वैमानिकांकडे अतिउच्च कौशल्याची गरज असते. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे तसेच मानवीय चुकांमुळे विमानांचे अपघात होतात. भविष्यातील असे अपघात टाळण्यासाठी तसेच वैमानिकांचा थकवा तसेच तणाव कमी करून त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी डीआरडीओच्या सहकार्याने नव्या यंत्रणेचा विकास करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात भारतीय हवाई दलातील वैमानिक कठीण परिस्थीतही चांगली कामगिरी करू शकणार आहेत, अशी माहिती हवाई दलाच्या आरोग्य विभागाचे प्रमुख एअर मार्शल पवन कुमार यांनी दिली.लढाऊ विमाने उडवण्यासाठी अनेक कसोट्यांना वैमानिक पुढे जात असतात. तासन्तास विमानाचे उड्डाण करताना तणाव, थकवा तसेच अनेक मानसिक आव्हानांचा सामना वैमानिकांना करावा लागतो. या परिस्थितीत चुका होऊन अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे वैमानिकांवरील तणाव कमी असणे गरजेचे असते. यासाठी डीआरडीओच्या साह्याने नवी यंत्रणा विकसित करण्यात येत असून वैमानिकांवर याचे काय परिणाम होतात, याच्या चाचण्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.सध्या, उड्डाणापूर्वी वैमानिकाच्या पूर्व-वैद्यकीय चाचण्या वायुसेनेतर्फे घेतल्या जातात. वैमानिकांसाठी तयार करण्यात येणारी नवी यंत्रणा ही सध्यस्थितीत असलेल्या यंत्रणेपेक्षा अधिक प्रभावी आहे. ही यंत्रणा अधिक वस्तूनिष्ठ आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या तपासणीत न आढळलेल्या गोष्टी या यंत्रणेद्वारे माहिती करणे शक्य होणार आहे. वैमानिकांच्या डोळ्यांच्या हालचाली, शारीरिक हालचाली, त्याची मानसिक स्थिती अभ्यासता येणार आहे. ही यंत्रणा हाताळण्यास अधिक सोपी असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परदेशात वैमानिकांना येणाºया अडचणी तपासण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा विकास झाला आहे. भारतातही या सारख्या यंत्रणेची गरज होती. या नव्या यंत्रणेमुळे वैमानिकांना अधिक सक्षम बनवता येणार आहे.वैमानिकांना अनावर होणारी झोप यावर संशोधन सुरू आहे. यासाठी ४० वैमानिकांची चाचणी घेण्यात आली होती. यात अनेक तथ्ये पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लांब पल्यांच्या उड्डाणावेळी सतर्क राहण्यासाठी तसेच झोप टाळण्यासाठी वैमानिकांद्वारे काही औषधांचे सेवन करण्यात येते. यामुळे अल्पझोपेच्या तक्रारीवर मात करता येते. लढाऊ विमान चालवतांना वैमानिकाला सतर्क राहावे लागते. एक छोटीशी चूक अपघातासाठी कारणीभूत ठरू शकते.एका विमानाची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असते. त्यामुळे हवाई दलाला असे अपघात परवडणारे नसतात.अशा प्रकारच्या यंत्रणेमुळे वैमानिकाचा थकवा तसेच तणाव कमी करता येईल, आणि मानवी चुका टाळता येतील, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका वैमानिकाने सांगितले.