शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शेतकऱ्यांची हक्काची लढाई मागे राहिली

By admin | Updated: April 29, 2017 03:59 IST

शेतकऱ्यांच्या व तरुणांच्या डोक्यात जात व धर्म घातल्याने हक्काची लढाई मागे राहिली आहे. सरकारकडे नोकरदारवर्गाच्या वेतन आयोगासाठी पैसा आहे.

मंचर : शेतकऱ्यांच्या व तरुणांच्या डोक्यात जात व धर्म घातल्याने हक्काची लढाई मागे राहिली आहे. सरकारकडे नोकरदारवर्गाच्या वेतन आयोगासाठी पैसा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाही. आत्महत्या थांबावयाच्या असतील तर शेतकऱ्यांनी पेटून उठून कट्टरवाद निर्माण झाला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले.मंचर येथे शिवस्मारक समिती व ग्रामदैवत श्री भैरवनाथ उत्सव कमिटी यांचे विद्यमाने लोकनेते किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमालेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि पीककर्ज या विषयावर कडू बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच दत्ता गांजाळे हे होते. अपंगांसाठी ३ टक्के निधी खर्च करा, असे कायदा सांगतो. मात्र हा खर्च कोणीच करत नाही. कायदा असूनही कायद्यासारखे वागत नाही. मंदिर व मशिदीत जरूर जा; मात्र जाताना एखाद्या अपंगाच्या घरी जाऊन त्यांना मदत करा, असे आवाहन कडू यांनी केले. शेतकरी का पेटून उठत नाही. धोरणे विरोधी असल्याने शेतकरी मरतो आहे. शेतकऱ्यांना आता गर्वसे कहो हम किसान है! हे म्हणावे लागेल. आता पेटून उठावे लागले. शेतकऱ्यांचे भले झाले तर सर्वांचे भले होईल, असा आशावाद शेवटी कडू यांनी बोलून दाखवला.या वेळी यात्रा समिती अध्यक्ष दत्ता थोरात, उपाध्यक्ष प्रविण मोरडे, डॉ. मंगेश बाणखेले, युवराज बाणखेले, लक्ष्मण भक्ते, माजी सरपंच प्रल्हाद बाणखेले, अश्विनी शेटे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात आदी उपस्थित होते. कामगार नेते बाळासाहेब बाणखेले यांनी प्रास्ताविक केले. वसंतराव बाणखेले यांनी आभार मानले.(वार्ताहर)