शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची हक्काची लढाई मागे राहिली

By admin | Updated: April 29, 2017 03:59 IST

शेतकऱ्यांच्या व तरुणांच्या डोक्यात जात व धर्म घातल्याने हक्काची लढाई मागे राहिली आहे. सरकारकडे नोकरदारवर्गाच्या वेतन आयोगासाठी पैसा आहे.

मंचर : शेतकऱ्यांच्या व तरुणांच्या डोक्यात जात व धर्म घातल्याने हक्काची लढाई मागे राहिली आहे. सरकारकडे नोकरदारवर्गाच्या वेतन आयोगासाठी पैसा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाही. आत्महत्या थांबावयाच्या असतील तर शेतकऱ्यांनी पेटून उठून कट्टरवाद निर्माण झाला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले.मंचर येथे शिवस्मारक समिती व ग्रामदैवत श्री भैरवनाथ उत्सव कमिटी यांचे विद्यमाने लोकनेते किसनराव बाणखेले स्मृती व्याख्यानमालेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि पीककर्ज या विषयावर कडू बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच दत्ता गांजाळे हे होते. अपंगांसाठी ३ टक्के निधी खर्च करा, असे कायदा सांगतो. मात्र हा खर्च कोणीच करत नाही. कायदा असूनही कायद्यासारखे वागत नाही. मंदिर व मशिदीत जरूर जा; मात्र जाताना एखाद्या अपंगाच्या घरी जाऊन त्यांना मदत करा, असे आवाहन कडू यांनी केले. शेतकरी का पेटून उठत नाही. धोरणे विरोधी असल्याने शेतकरी मरतो आहे. शेतकऱ्यांना आता गर्वसे कहो हम किसान है! हे म्हणावे लागेल. आता पेटून उठावे लागले. शेतकऱ्यांचे भले झाले तर सर्वांचे भले होईल, असा आशावाद शेवटी कडू यांनी बोलून दाखवला.या वेळी यात्रा समिती अध्यक्ष दत्ता थोरात, उपाध्यक्ष प्रविण मोरडे, डॉ. मंगेश बाणखेले, युवराज बाणखेले, लक्ष्मण भक्ते, माजी सरपंच प्रल्हाद बाणखेले, अश्विनी शेटे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात आदी उपस्थित होते. कामगार नेते बाळासाहेब बाणखेले यांनी प्रास्ताविक केले. वसंतराव बाणखेले यांनी आभार मानले.(वार्ताहर)