शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सीबीएसईचे पंधरा हजार विद्यार्थी होणार उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST

गेल्या काही वर्षांपासून सीबीएसई बोर्डाच्या शाळांची संख्या पुण्यात वाढत चालली आहे. नीट, जेईईसारख्या प्रवेश पूर्वपरीक्षांसाठी सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम महत्त्वाचा ...

गेल्या काही वर्षांपासून सीबीएसई बोर्डाच्या शाळांची संख्या पुण्यात वाढत चालली आहे. नीट, जेईईसारख्या प्रवेश पूर्वपरीक्षांसाठी सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अनेक पालक राज्य मंडळाच्या शाळांना ऐवजी सीबीएसई बोर्डाच्या शाळांचा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत. परंतु, कोरोनामुळे सर्वच बोर्डाच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. इयत्ता दहावीनंतर सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु, परीक्षा देऊन स्वतःला सिद्ध करता येऊ शकले नाही, याबाबत काही विद्यार्थ्यांच्या मनात खंत आहे.

बारावीनंतर अनेक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाचा पर्याय स्वीकार करतात. त्यामुळे बारावीच्या गुणांना फारसे महत्त्व नसते. विद्यार्थ्यांना बारावीत विषय किती समजला हे परीक्षेतून कळते. त्यामुळे परीक्षा महत्त्वाच्या आहेत. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले देणे गरजेचे आहे. त्यामुळे या परीक्षा रद्द करण्याची मागणी मागणी विद्यार्थी व पालकांकडून केली जात होती.

-----------------

पुण्यात सीबीएससी बोर्डाच्या अंदाजे १५० शाळा असून त्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १५ हजार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या व देशाच्या भवितव्याच्यादृष्टीने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत निरुत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणावरही त्याचा परिणाम दिसू शकतो. तसेच काहीही न करता आपण उत्तीर्ण होत आहोत असा विचार विद्यार्थ्यांच्या मनात शाळेवर ते साठी घातक ठरणार आहे.

- गायत्री जाधव, प्राचार्य, प्रियदर्शनी स्कूल

-----------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दहावी पाठोपाठ बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यवर परिणाम होणार नाही.या दृष्टीने प्रयत्न करण्याचे सामुदायिक जबाबदारी सर्वांनी स्वीकारली पाहिजे.

- रवींद्र सुरपे, कुकडी व्हॅली, शिक्षक