शहरं
Join us  
Trending Stories
1
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
2
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
3
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
4
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
5
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
6
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
7
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
8
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
9
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
10
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
11
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
12
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
13
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
14
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं
15
सौदीत जाऊन योगी आदित्यनाथांबद्दल आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट, अखेर तावडीत सापडलाच
16
म्हणून त्याला किंग खान म्हणतात! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला ड्रेसमुळे चालताच येईना, शाहरुखची 'ती' कृती प्रेक्षकांना भावली
17
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
18
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
19
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...

चाऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर

By admin | Updated: December 23, 2015 00:09 IST

परतीच्या अवकाळी पावसाने दिलासा दिल्यामुळे मागील दोन महिन्यांत चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला होता.

बारामती : परतीच्या अवकाळी पावसाने दिलासा दिल्यामुळे मागील दोन महिन्यांत चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा चाऱ्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. यापूर्वीच जनावरांसाठी चारा डेपोसाठी बारामती तहसीलदारांकडून अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. त्यामध्ये तब्बल ३२ गावांचा समावेश आहे. साधारणत: जानेवारी, फेब्रुवारीमध्ये हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येईल. त्यादृष्टीने तयारी प्रशासनाने केली आहे, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली.बारामती तालुक्याचा पश्चिम पट्ट्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढतच असल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद होत आहे. त्यातच आता तब्बल लाखभर पशुधनासाठी या जनावरांना खाण्यासाठी चारा आणि पिण्यासाठी पाणी मिळणेही दिवसेंदिवस जिकिरीचे बनत चालले आहे. मध्यंतरी अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात चारा पिके तरली. त्यामुळे दोन महिने जनावरांना चारा पुरला. आता परिस्थिती बदलत आहे. यापूर्वी बारामती तालुक्यातील प्रमुख चार महसुली गावांमधील तब्बल ३२ वाड्या-वस्त्यांवर जनावरांसाठी चारा आणि पाणीच नसल्याने तत्काळ चारा डेपोसुरू करण्याची मागणी तहसील कार्यालयाकडून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील उंडवडी, सुपे, सुपा, मोरगाव, लोणी भापकर या मंडल गावांच्या परिसरातील सुमारे ३२ गावे, तसेच वाड्या-वस्त्यांवर पाण्याची तसेच चाऱ्याची प्रचंड टंचाई आहे. या गावांमध्ये लहान ४९ हजार ५५८, तर मोठी २५ हजार १३८ जनावरे आहेत. या जनावरांसाठी दररोज सुमारे १० हजार क्विंटल चाऱ्याची आवश्यकता आहे. त्यानुसार, तीस हजार क्विंटल चाऱ्याची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षात तीन-चार हजार क्विंटल चाराच या जनावरांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या मंडल गावांकडून चारा डेपो सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून त्यानुसार तहसील कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)जलयुक्तने तारले...दुष्काळी पट्ट्यात असलेल्या या गावांमध्ये दरवर्षी काही प्रमाणात का होईना, पण पाऊस झाल्याने चाऱ्याची समस्या सुटते. मात्र, या वर्षी आॅगस्ट संपला तरी दरवर्षीच्या सरासरीच्या अवघा २८६ मिमी पाऊस पडला आहे. त्यात दुष्काळी पट्ट्यात कमी पाऊस झाला आहे. परतीच्या अवकाळी पावसाने दुष्काळी गावांना तारले. त्यातच जलयुक्त शिवार योजनेमुळे पावसाचे पाणी भूगर्भात जिरविणे शक्य झाले. त्यामुळे विहीर, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढली. आता ही परिस्थितीदेखील बदलत आहे. पाण्याच्या टँकरबरोबरच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.