शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगरात कापड दुकानाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST

राजगुरुनगर: राजगुरुनगर येथील पुणे उत्तर जिल्ह्यातील प्रसिद्ध संगम कापड दुकानास शॉटसर्किट झाल्याने दि. ७ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ...

राजगुरुनगर: राजगुरुनगर येथील पुणे उत्तर जिल्ह्यातील प्रसिद्ध संगम कापड दुकानास शॉटसर्किट झाल्याने दि. ७ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्यामुळे कापड दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर साडेतीन तासाने अग्निशामक दलाने वाढत्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

राजगुरुनगर शहरात वाडा रोडलगत संगम कपड्याचे दुकान आहे. दुकानाचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. दुपारी ४ वाजता दुकान कोरोनाच्या प्रार्शभूमीवर दुकान बंद करण्यात आले होते. साडेचार वाजण्याच्या सुमारास शार्टसर्किट होऊन दुकानाला आग लागली. काही कळण्याच्या आत आगीने रौद्ररूप धारण केले होते. राजगुरुनगर नगर परिषदेचा अग्निशामक बंब घटनास्थळी येऊन आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र आग भडकत होती. दरम्यान लागलेल्या आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी प्रशासनाने

चाकण नगर परिषेदचा व खेड एमआयडीसीतील अग्निशामक बंब बोलविण्यात आला होता. मात्र आग नियंत्रणात आली नाही. कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. अखेर ७ वाजता पुणे येथून अग्निशामक बंब आला, अर्धा तासात तिसऱ्या मजल्यावरील आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, खेड पोलीस निरीक्षक सतीश गुरव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, नायब तहसीलदार राजेश कानसकर, राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा व राजगुरुनगर शहरातील व्यापारी, नागरिक, आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते.

फोटो ओळ: राजगुरुनगर येथे कापड दुकानाला आग लागली होती. पुणे येथील अग्निशामक दलाने ४ तासांनंतर आगीवर नियत्रंण मिळवले.

--

मोबाईल शूटिंग काढणाऱ्यांच्या गर्दीने मदत कार्यात अडथळ

--

दुपारी लागलेल्या आगीमुळे शहरात धुराचे लोट पसरल्याचे दूरवरून दिसत होते. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. लॉकडाऊन असल्यामुळे इतर दुकाने बंद होती. त्यामुळे घटनास्थळी अग्निशामक बंब व पोलीस लागलीच पोहोचले. बघ्यांची गर्दी व मोबाईलवर ती फोटो, शूटिंग करणारे उत्साही नागरिक यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. सुमारे ४ तास शहरातून जाणारा वाड्याला जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना पायी जावे लागले.