शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगरात कापड दुकानाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST

राजगुरुनगर: राजगुरुनगर येथील पुणे उत्तर जिल्ह्यातील प्रसिद्ध संगम कापड दुकानास शॉटसर्किट झाल्याने दि. ७ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ...

राजगुरुनगर: राजगुरुनगर येथील पुणे उत्तर जिल्ह्यातील प्रसिद्ध संगम कापड दुकानास शॉटसर्किट झाल्याने दि. ७ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्यामुळे कापड दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर साडेतीन तासाने अग्निशामक दलाने वाढत्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

राजगुरुनगर शहरात वाडा रोडलगत संगम कपड्याचे दुकान आहे. दुकानाचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. दुपारी ४ वाजता दुकान कोरोनाच्या प्रार्शभूमीवर दुकान बंद करण्यात आले होते. साडेचार वाजण्याच्या सुमारास शार्टसर्किट होऊन दुकानाला आग लागली. काही कळण्याच्या आत आगीने रौद्ररूप धारण केले होते. राजगुरुनगर नगर परिषदेचा अग्निशामक बंब घटनास्थळी येऊन आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र आग भडकत होती. दरम्यान लागलेल्या आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी प्रशासनाने

चाकण नगर परिषेदचा व खेड एमआयडीसीतील अग्निशामक बंब बोलविण्यात आला होता. मात्र आग नियंत्रणात आली नाही. कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. अखेर ७ वाजता पुणे येथून अग्निशामक बंब आला, अर्धा तासात तिसऱ्या मजल्यावरील आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, खेड पोलीस निरीक्षक सतीश गुरव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, नायब तहसीलदार राजेश कानसकर, राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा व राजगुरुनगर शहरातील व्यापारी, नागरिक, आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते.

फोटो ओळ: राजगुरुनगर येथे कापड दुकानाला आग लागली होती. पुणे येथील अग्निशामक दलाने ४ तासांनंतर आगीवर नियत्रंण मिळवले.

--

मोबाईल शूटिंग काढणाऱ्यांच्या गर्दीने मदत कार्यात अडथळ

--

दुपारी लागलेल्या आगीमुळे शहरात धुराचे लोट पसरल्याचे दूरवरून दिसत होते. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. लॉकडाऊन असल्यामुळे इतर दुकाने बंद होती. त्यामुळे घटनास्थळी अग्निशामक बंब व पोलीस लागलीच पोहोचले. बघ्यांची गर्दी व मोबाईलवर ती फोटो, शूटिंग करणारे उत्साही नागरिक यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. सुमारे ४ तास शहरातून जाणारा वाड्याला जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना पायी जावे लागले.