शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
4
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
5
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
6
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
7
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
8
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
9
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
10
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
11
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
12
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
13
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
14
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
15
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
16
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
17
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
18
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
19
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
20
कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

राजगुरुनगरात कापड दुकानाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST

राजगुरुनगर: राजगुरुनगर येथील पुणे उत्तर जिल्ह्यातील प्रसिद्ध संगम कापड दुकानास शॉटसर्किट झाल्याने दि. ७ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ...

राजगुरुनगर: राजगुरुनगर येथील पुणे उत्तर जिल्ह्यातील प्रसिद्ध संगम कापड दुकानास शॉटसर्किट झाल्याने दि. ७ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्यामुळे कापड दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर साडेतीन तासाने अग्निशामक दलाने वाढत्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

राजगुरुनगर शहरात वाडा रोडलगत संगम कपड्याचे दुकान आहे. दुकानाचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. दुपारी ४ वाजता दुकान कोरोनाच्या प्रार्शभूमीवर दुकान बंद करण्यात आले होते. साडेचार वाजण्याच्या सुमारास शार्टसर्किट होऊन दुकानाला आग लागली. काही कळण्याच्या आत आगीने रौद्ररूप धारण केले होते. राजगुरुनगर नगर परिषदेचा अग्निशामक बंब घटनास्थळी येऊन आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र आग भडकत होती. दरम्यान लागलेल्या आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी प्रशासनाने

चाकण नगर परिषेदचा व खेड एमआयडीसीतील अग्निशामक बंब बोलविण्यात आला होता. मात्र आग नियंत्रणात आली नाही. कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. अखेर ७ वाजता पुणे येथून अग्निशामक बंब आला, अर्धा तासात तिसऱ्या मजल्यावरील आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, खेड पोलीस निरीक्षक सतीश गुरव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, नायब तहसीलदार राजेश कानसकर, राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा व राजगुरुनगर शहरातील व्यापारी, नागरिक, आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते.

फोटो ओळ: राजगुरुनगर येथे कापड दुकानाला आग लागली होती. पुणे येथील अग्निशामक दलाने ४ तासांनंतर आगीवर नियत्रंण मिळवले.

--

मोबाईल शूटिंग काढणाऱ्यांच्या गर्दीने मदत कार्यात अडथळ

--

दुपारी लागलेल्या आगीमुळे शहरात धुराचे लोट पसरल्याचे दूरवरून दिसत होते. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. लॉकडाऊन असल्यामुळे इतर दुकाने बंद होती. त्यामुळे घटनास्थळी अग्निशामक बंब व पोलीस लागलीच पोहोचले. बघ्यांची गर्दी व मोबाईलवर ती फोटो, शूटिंग करणारे उत्साही नागरिक यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. सुमारे ४ तास शहरातून जाणारा वाड्याला जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना पायी जावे लागले.