शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

राजगुरुनगरात कापड दुकानाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST

राजगुरुनगर: राजगुरुनगर येथील पुणे उत्तर जिल्ह्यातील प्रसिद्ध संगम कापड दुकानास शॉटसर्किट झाल्याने दि. ७ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ...

राजगुरुनगर: राजगुरुनगर येथील पुणे उत्तर जिल्ह्यातील प्रसिद्ध संगम कापड दुकानास शॉटसर्किट झाल्याने दि. ७ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्यामुळे कापड दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर साडेतीन तासाने अग्निशामक दलाने वाढत्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

राजगुरुनगर शहरात वाडा रोडलगत संगम कपड्याचे दुकान आहे. दुकानाचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. दुपारी ४ वाजता दुकान कोरोनाच्या प्रार्शभूमीवर दुकान बंद करण्यात आले होते. साडेचार वाजण्याच्या सुमारास शार्टसर्किट होऊन दुकानाला आग लागली. काही कळण्याच्या आत आगीने रौद्ररूप धारण केले होते. राजगुरुनगर नगर परिषदेचा अग्निशामक बंब घटनास्थळी येऊन आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र आग भडकत होती. दरम्यान लागलेल्या आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी प्रशासनाने

चाकण नगर परिषेदचा व खेड एमआयडीसीतील अग्निशामक बंब बोलविण्यात आला होता. मात्र आग नियंत्रणात आली नाही. कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. अखेर ७ वाजता पुणे येथून अग्निशामक बंब आला, अर्धा तासात तिसऱ्या मजल्यावरील आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, खेड पोलीस निरीक्षक सतीश गुरव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, नायब तहसीलदार राजेश कानसकर, राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा व राजगुरुनगर शहरातील व्यापारी, नागरिक, आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते.

फोटो ओळ: राजगुरुनगर येथे कापड दुकानाला आग लागली होती. पुणे येथील अग्निशामक दलाने ४ तासांनंतर आगीवर नियत्रंण मिळवले.

--

मोबाईल शूटिंग काढणाऱ्यांच्या गर्दीने मदत कार्यात अडथळ

--

दुपारी लागलेल्या आगीमुळे शहरात धुराचे लोट पसरल्याचे दूरवरून दिसत होते. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. लॉकडाऊन असल्यामुळे इतर दुकाने बंद होती. त्यामुळे घटनास्थळी अग्निशामक बंब व पोलीस लागलीच पोहोचले. बघ्यांची गर्दी व मोबाईलवर ती फोटो, शूटिंग करणारे उत्साही नागरिक यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. सुमारे ४ तास शहरातून जाणारा वाड्याला जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना पायी जावे लागले.