शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

कच्च्या मालाच्या दरवाढीने कंपन्यांनी वाढवले खतांचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: ऐन खरिपाच्या हंगामात खत कंपन्यांंनी केंद्र सरकारला न कळवता परस्पर दरवाढ केली. त्यामुळे शेतकरीवर्गात रोष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: ऐन खरिपाच्या हंगामात खत कंपन्यांंनी केंद्र सरकारला न कळवता परस्पर दरवाढ केली. त्यामुळे शेतकरीवर्गात रोष निर्माण झाला आहे, तर शेतकरी संघटनाही आक्रमक होत आहेत. दरांवर नियंत्रण ठेवणे शक्य असूनही केंद्र सरकार काहीच भूमिका घेत नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

खतांमधील पोषक तत्त्वांच्या प्रमाणावर केंद्र सरकार कंपन्यांना अनुदान देत असते. या अनुदानावर किमतीचे नियंत्रण होते. मात्र, अनुदानाचा दर कायम व कच्च्या मालाचे दर मात्र वाढले, त्याचा परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर होत असल्यानेच त्यांनी खतांचे भाव वाढवले, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल धनवट यांनी सांगितले.

सरकारने आता अनुदानाचे दर वाढवावे किंवा मग शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे दर उत्पादन खर्चावर ठेवण्याची संमती द्यावी, किमान हमी भावाच्या दरांमध्ये विचार वाढ करावी आणि कोरोना आपत्ती काळात मदत म्हणून शेतकऱ्यांना खताच्या किमतीत सवलतही द्यावी अशी मागणी धनवट यांनी केली.

भारतीय किसान संघ या केंद्र सरकारबरोबर वैचारिक नाते सांगणाऱ्या शेतकरी संघटनेनेही खतांच्या दरवाढीला विरोध दर्शवला आहे. प्रदेशाध्यक्ष बळीराम सोळंके व राज्य संघटन मंत्री चंदन पाटील यांनी सांगितले की, आम्ही आमचा निषेध थेट पंतप्रधानांना पत्र पाठवून नोंदवला आहे. खतांच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी आमची मागणी आहे.

पुरोगामी विचारांच्या किसान संघर्ष समितीचे पदाधिकारी सुभाष वारे यांनीही केंद्र सरकारचा कारभार डोके ठिकाणावर नसल्यासारखा सुरू असल्याची टीका केली. जनसंघर्ष मोर्चा ही केंद्रीय समिती याविरोधात मतप्रदर्शन करेलच, पण सरकार ऐन कोरोना आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे असे ते म्हणाले.

काँग्रेसच्या भारतीय किसान काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष हनुमंत पवार यांनी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना आवळा देऊन कोहळा काढला असे सांगितले. किसान सन्मानमध्ये २ हजार दिले आणि खतांची किंमत वाढवून ते लगेच काढूनही घेतले असे ते म्हणाले.

--//

केंद्र सरकारने यात त्वरित हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. कंपन्यांच्या दरावर सरकारचे थेट नियंत्रण नसले, तरी आडमार्गाने केंद्र सरकार दर कमी करायला लावू शकते. अनुदान वाढवले तरी यातून मार्ग निघेल. अशा किमतीला खते घेऊन शेती करणे अवघड होईल.

- निवृत्त वरिष्ठ कृषी अधिकारी--