शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या मालाच्या दरवाढीने कंपन्यांनी वाढवले खतांचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: ऐन खरिपाच्या हंगामात खत कंपन्यांंनी केंद्र सरकारला न कळवता परस्पर दरवाढ केली. त्यामुळे शेतकरीवर्गात रोष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: ऐन खरिपाच्या हंगामात खत कंपन्यांंनी केंद्र सरकारला न कळवता परस्पर दरवाढ केली. त्यामुळे शेतकरीवर्गात रोष निर्माण झाला आहे, तर शेतकरी संघटनाही आक्रमक होत आहेत. दरांवर नियंत्रण ठेवणे शक्य असूनही केंद्र सरकार काहीच भूमिका घेत नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

खतांमधील पोषक तत्त्वांच्या प्रमाणावर केंद्र सरकार कंपन्यांना अनुदान देत असते. या अनुदानावर किमतीचे नियंत्रण होते. मात्र, अनुदानाचा दर कायम व कच्च्या मालाचे दर मात्र वाढले, त्याचा परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर होत असल्यानेच त्यांनी खतांचे भाव वाढवले, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल धनवट यांनी सांगितले.

सरकारने आता अनुदानाचे दर वाढवावे किंवा मग शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे दर उत्पादन खर्चावर ठेवण्याची संमती द्यावी, किमान हमी भावाच्या दरांमध्ये विचार वाढ करावी आणि कोरोना आपत्ती काळात मदत म्हणून शेतकऱ्यांना खताच्या किमतीत सवलतही द्यावी अशी मागणी धनवट यांनी केली.

भारतीय किसान संघ या केंद्र सरकारबरोबर वैचारिक नाते सांगणाऱ्या शेतकरी संघटनेनेही खतांच्या दरवाढीला विरोध दर्शवला आहे. प्रदेशाध्यक्ष बळीराम सोळंके व राज्य संघटन मंत्री चंदन पाटील यांनी सांगितले की, आम्ही आमचा निषेध थेट पंतप्रधानांना पत्र पाठवून नोंदवला आहे. खतांच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी आमची मागणी आहे.

पुरोगामी विचारांच्या किसान संघर्ष समितीचे पदाधिकारी सुभाष वारे यांनीही केंद्र सरकारचा कारभार डोके ठिकाणावर नसल्यासारखा सुरू असल्याची टीका केली. जनसंघर्ष मोर्चा ही केंद्रीय समिती याविरोधात मतप्रदर्शन करेलच, पण सरकार ऐन कोरोना आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे असे ते म्हणाले.

काँग्रेसच्या भारतीय किसान काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष हनुमंत पवार यांनी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना आवळा देऊन कोहळा काढला असे सांगितले. किसान सन्मानमध्ये २ हजार दिले आणि खतांची किंमत वाढवून ते लगेच काढूनही घेतले असे ते म्हणाले.

--//

केंद्र सरकारने यात त्वरित हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. कंपन्यांच्या दरावर सरकारचे थेट नियंत्रण नसले, तरी आडमार्गाने केंद्र सरकार दर कमी करायला लावू शकते. अनुदान वाढवले तरी यातून मार्ग निघेल. अशा किमतीला खते घेऊन शेती करणे अवघड होईल.

- निवृत्त वरिष्ठ कृषी अधिकारी--