शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

फेमिनिझम केवळ सोशल मीडियापुरता उरलाय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:11 IST

स्त्रीवरील अत्याचारांचा विरोध आणि स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार हे स्त्रीवादाचे मूळ उद्दिष्ट मानले जाते. स्त्रीवाद म्हणजे स्त्री आणि पुरुषांनी मिळून ...

स्त्रीवरील अत्याचारांचा विरोध आणि स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार हे स्त्रीवादाचे मूळ उद्दिष्ट मानले जाते. स्त्रीवाद म्हणजे स्त्री आणि पुरुषांनी मिळून पुरुषसत्ताक व्यवस्थेविरोधात दिलेला लढा... त्यामुळे मुळातच ‘समता’ हा स्त्रीवादाचा पाया आहे. स्त्रीवाद म्हणजे पुरुषांना विरोध ही मानसिकता पूर्णपणे बदलण्याची गरज आहे. स्त्रीवादामध्ये एलजीबीटीक्यू कम्युनिटीलाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. तीही माणसे आहेत आणि समाजाच्या मुख्य प्रवाहातील घटक आहेत, हे विसरून चालणार नाही, असे मत स्त्रीवादी कार्यकर्त्यांकडून अधोरेखित केले जात आहे.

‘मिळून सा-याजणी’ मासिकाच्या संपादिका गीताली वि. म. म्हणाल्या, ‘फेमिनिझम केवळ सोशल मीडियापुरता उरलेला आहे, असे मला वाटत नाही. फेमिनिझम स्त्री-पुरुषांच्या जीवनात खोलवर रुजलेला आहे. पूर्वीसारखे मोर्चे, आंदोलने, स्त्री संघटनांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत आहेत, असे चित्र दिसत नाही. कारण चळवळीने आता पुढचा टप्पा गाठला आहे. स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समता याला ब-यापैकी महत्त्व दिले जात आहे. दोघेही एकमेकांच्या मदतीने संसार पुढे नेत आहेत. समाजात मूल्यात्मक बदल झाले आहेत, असे म्हणता येणार नाही. मात्र, बदलाला सुरुवात झाली आहे, असे नक्कीच म्हणता येईल. एकीकडे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे, तर दुसरीकडे स्त्रियांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचारात वाढ झाली आहे. समाजाची मानसिकता पूर्ण बदलण्यासाठी आणखी बरीच वर्षे जावी लागतील. तोवर स्त्री-पुरुष दोघांनी मिळून पुरुषसत्ताक व्यवस्थेविरोधात लढा देत राहणे हेच चळवळीचे स्वरूप असेल.’

कवयित्री डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, ‘आजच्या बहुतांश स्त्रिया आपले कुटुंब, प्रतिष्ठा यामध्ये रमल्या आहेत. त्यामुळे समाजात इतरत्र काय चालले आहे, याबाबत फारशी सजगता पाहायला मिळत नाही. स्त्रीवादी व्यक्तीमध्ये अस्मितेची जाणीव, खंबीरपणा यांची कमतरता पाहायला मिळत आहे. सोशल मीडियातून व्यक्त होणे सोपे असले तरी निरीक्षणातून मांडणी करताना अभ्यासाची बैठक लागते. स्त्रीवादी लेखनही आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. लेखनातून अनुभव विस्तृतपणे मांडण्याची गरजच वाटत नाही. साहित्यात बदलत्या समाजाचे वास्तव जोरकसपणे मांडले गेले पाहिजे. फेमिनिझम अर्थात स्त्रीवाद ही आयुष्यभराची विचारांची बांधिलकी असायला हवी. व्यावसायिक आयुष्यातही स्त्री-पुरुष समता पिरॅमिडसारखी पाहायला मिळते. हे चित्र बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.’