शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

पाबळला पाण्यासाठी महिला आक्रमक

By admin | Updated: March 22, 2017 02:59 IST

येथील गावठाणातील नळपाणी पुरवठा बंद असल्याने येथील महिलांनी पाबळ ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला. या वेळी महिलांनी ग्रामविकास

पाबळ : (ता. शिरूर) येथील गावठाणातील नळपाणी पुरवठा बंद असल्याने येथील महिलांनी पाबळ ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला. या वेळी महिलांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरून तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी-निवेदन देऊन केली असून दोन-तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला.या वेळी पाबळच्या सरपंच मनीषा बगाटे, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी डहाळे, अमोल जाधव, संजच चौधरी, नामदेव जगताप, ग्रामविकास अधिकारी बी. बी. गोरे व ग्रामस्थ उपस्थित होते. येत्या दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन या वेळी ग्रामसेवक गोरे यांनी दिले.संतप्त महिलांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर नळपट्टी व कर वसुली देऊनसुद्धा नेमके गावठाणाला पाणी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य नामदेव जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी येत्या काळात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर सामूहिक सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.शिरूरच्या दुष्काळी पट्ट्यातील पाबळ गावाला थिटेवाडीचे वरदान लाभले. या ठिकाणी गावठाणासाठी विहीर घेऊन पाणी योजना राबविण्यात आली आहे. काहीसे पाणी असताना १० दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने वीजबिल थकवल्याने येथील विद्युत जोड तोडण्यात आले. सुमारे १८ लाख रुपये थकीत बिल असल्याने विहिरीवरील वीजजोड तोडण्यात आले. सुमारे ४ ते ५ हजार लोकसंख्या असणाऱ्या गावठाणात सध्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, अनेक नागरिकांनी पाणी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत असून, पाणी मिळवताना महिलांची भांडणे होत आहे. तर, अनेकांनी स्वतंत्र पैसे देऊन खासगी टँकरद्वारे पाणी घेणे पसंत केले असून, आठवड्याला १००० ते २००० रुपयांचा आर्थिक फटका अनेक नागरिकांना बसला आहे. येथील नळपाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)