शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

वाळूमाफियांत टोळी युद्धाची भीती

By admin | Updated: June 22, 2015 04:23 IST

राहू (ता.दौंड) येथे वाळूच्या वादातून झालेल्या दुहेरी खून खटल्यातील मुख्य आरोपी संतोष संपत जगताप याला त्या वेळी खून झालेल्या सोनवने बंधूंच्या

यवत : राहू (ता.दौंड) येथे वाळूच्या वादातून झालेल्या दुहेरी खून खटल्यातील मुख्य आरोपी संतोष संपत जगताप याला त्या वेळी खून झालेल्या सोनवने बंधूंच्या भावांनी इतर साथीदारांच्या मदतीने जीवे ठार मारण्याची सुपारी दिली असल्याची तक्रार जगताप याने यवत पोलिसांत दिली आहे. सदर घटनेनंतर गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली असून, टोळी युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.वाळूच्या वादातून झालेल्या दुहेरी खून खटल्यातील मुख्य आरोपी संतोष संपत जगताप बारामती न्यायालयातून जात असताना, त्याला मारण्यासाठी मागावर असलेल्या चार आरोपींना यवत पोलिसांनी खामगाव फाटा (ता.दौंड) नजीक सापळा रचून पकडले होते. सदर आरोपींकडे दोन गावठी कट्टे व दहा राऊंड मिळून आले होते.संतोष जगताप, समीर जगताप, अप्पा लोंढे, महेश लगाड़े व त्याच्या इतर २२ साथीदार यांच्या विरोधात गणेश शिवाजी सोनवने व रमेश सोपान सोनवने यांचा राहू येथे खून केल्याचा खटला सुरू आहे. संतोष जगताप हा (दि.१८) रोजी त्याचा भाऊ समीर जगताप व इतर सहकाऱ्यांसह बारामती न्यायालयात तारीख असल्याने तिथे गेले होते. न्यायालयातील तारीख संपल्यानंतर, संतोष जगताप व त्याचे सहकारी परत जात असताना सदर प्रकार घडला होता. दरम्यान, संतोष जगताप याने याबाबत यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून सदर फिर्यादीत सन २०११ मध्ये सोनवने यांच्या बरोबर झालेली भांडने याचा राग मनात धरून उमेश सोनवने, अनिल सोनवने, संदीप सोनवने ( सर्व रा. राहु, ता. दौंड), महेश शेळके (रा.पारगाव, ता. दौंड), स्वप्निल शेलार (रा.देलवडी, ता. दौंड) यांनी आरोपी अशिद रशीद रियासन अली ( वय २२ , रा.सीलमपुर थाना, जे ९ , सीलमपुर, दिल्ली ६ ), दिलशान इरशाद खान (वय २३, रा. हापड रोड, जाकीर कॉलनी, नं.३२४, मेराड, उत्तर प्रदेश), जावेद नसीर खान (वय २१) यांना जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे म्हटले आहे. (वार्ताहर)