शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाळूमाफियांत टोळी युद्धाची भीती

By admin | Updated: June 22, 2015 04:23 IST

राहू (ता.दौंड) येथे वाळूच्या वादातून झालेल्या दुहेरी खून खटल्यातील मुख्य आरोपी संतोष संपत जगताप याला त्या वेळी खून झालेल्या सोनवने बंधूंच्या

यवत : राहू (ता.दौंड) येथे वाळूच्या वादातून झालेल्या दुहेरी खून खटल्यातील मुख्य आरोपी संतोष संपत जगताप याला त्या वेळी खून झालेल्या सोनवने बंधूंच्या भावांनी इतर साथीदारांच्या मदतीने जीवे ठार मारण्याची सुपारी दिली असल्याची तक्रार जगताप याने यवत पोलिसांत दिली आहे. सदर घटनेनंतर गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली असून, टोळी युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.वाळूच्या वादातून झालेल्या दुहेरी खून खटल्यातील मुख्य आरोपी संतोष संपत जगताप बारामती न्यायालयातून जात असताना, त्याला मारण्यासाठी मागावर असलेल्या चार आरोपींना यवत पोलिसांनी खामगाव फाटा (ता.दौंड) नजीक सापळा रचून पकडले होते. सदर आरोपींकडे दोन गावठी कट्टे व दहा राऊंड मिळून आले होते.संतोष जगताप, समीर जगताप, अप्पा लोंढे, महेश लगाड़े व त्याच्या इतर २२ साथीदार यांच्या विरोधात गणेश शिवाजी सोनवने व रमेश सोपान सोनवने यांचा राहू येथे खून केल्याचा खटला सुरू आहे. संतोष जगताप हा (दि.१८) रोजी त्याचा भाऊ समीर जगताप व इतर सहकाऱ्यांसह बारामती न्यायालयात तारीख असल्याने तिथे गेले होते. न्यायालयातील तारीख संपल्यानंतर, संतोष जगताप व त्याचे सहकारी परत जात असताना सदर प्रकार घडला होता. दरम्यान, संतोष जगताप याने याबाबत यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून सदर फिर्यादीत सन २०११ मध्ये सोनवने यांच्या बरोबर झालेली भांडने याचा राग मनात धरून उमेश सोनवने, अनिल सोनवने, संदीप सोनवने ( सर्व रा. राहु, ता. दौंड), महेश शेळके (रा.पारगाव, ता. दौंड), स्वप्निल शेलार (रा.देलवडी, ता. दौंड) यांनी आरोपी अशिद रशीद रियासन अली ( वय २२ , रा.सीलमपुर थाना, जे ९ , सीलमपुर, दिल्ली ६ ), दिलशान इरशाद खान (वय २३, रा. हापड रोड, जाकीर कॉलनी, नं.३२४, मेराड, उत्तर प्रदेश), जावेद नसीर खान (वय २१) यांना जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे म्हटले आहे. (वार्ताहर)