शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या धास्तीने दौंडच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

-- खोर : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जागेचा मुद्दा एकिकडे गाजत असताना आता दुसरा धक्का बुलेट ट्रेन ...

--

खोर : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जागेचा मुद्दा एकिकडे गाजत असताना आता दुसरा धक्का बुलेट ट्रेन ने शेतकऱ्यांना दिला आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्या बरोबरच आता दौंड तालुक्यातील शेतकरी वर्ग देखील चिंतेत पडला गेला आहे.

केंद्र शासनाच्या अति महत्वकांक्षी मुंबई-हैद्राबाद हायस्पीड बुलेट ट्रेनच्या कामाने आता वेग धरला असून पुणे जिल्ह्यातील गावागावात याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यातील ७०० किमी अंतरातील आज हजारो गावे यामध्ये बाधित होणार आहेत. एकट्या पुणे जिल्ह्यातील ४५ गावांना या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फटका बसून या गावातील भूसंपादन करण्यात येणार असल्याचे प्राथमिक चित्र आहे. मध्य रेल्वे प्रकल्पाच्या नियोजित मार्गाशेजाराच्या २ हजार फूट रुंदीच्या परिसरातील जमीन धारकांना बोलावून त्याची माहिती देण्यात येणार असून त्याची अपेक्षित किंमत किती होईल, नोकरी हवी आहे का, घर, दुकान, जमिनीच्याया बदल्यात इतर ठिकाणी व्यवसाय असाही पर्याय यामध्ये दिला असून कुटुंबातील माहिती तसेच प्रभावित होणाऱ्या एकूण परिस्थितीची माहिती घेतली जात आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प हा आय आयएमआर रिसर्च फाउंडेशनच्या मार्फत हे सर्वेक्षण सुरू आहे. दौंड तालुक्यातील खोर व पडवी या दोन गावांचा समावेश करण्यात आला असून आता हे सर्वेक्षण नेमके कोठून करणार व हे गाव हलविण्यात येणार हे ही पाहणे तितकेच महत्वाचे असणार आहे. हे सर्वेक्षण दोन महिन्यांच्या आत उरकण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावर देण्यात आले असून पुढील महिन्या पासून नव्याने या भूसंपादनाच्या पहिल्या टप्प्यात सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अर्थात आता पर्यंतच्या टप्प्यात शासकीय विभागांना यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली नाही हे देखील महत्वाचे आहे.

या बाबत दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांना या बुलेट ट्रेन प्रकल्प योजनेच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले की, या केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी प्रकल्प योजनेच्या बाबतीत अजून पर्यंत आमच्या कडे कोणतीही माहिती अथवा जबाबदारी ही आलेली नाही. दौंड तालुक्यातील कोणत्या गावांचा या मध्ये समावेश होणार आहे याची देखील माहिती अजून पर्यंत आमच्याकडे आलेली नसल्याचे तहसीलदार संजय पाटील यांनी सांगितले आहे.

याबाबत शेतकरी जालिंदर डोंबे यांना विचारले असता ते म्हणाले की, हा केंद्र शासनाच्या माध्यमातून होणार प्रकल्प आहे. मात्र आमचे कायमस्वरूपी उपजीविकेचे साधन हे शेती आहे. हीच शेती जर संपुष्टात येणार असेल तर ही चिंतेची बाब आहे. परंतु केंद्र शासनाने शेतकरी वर्गाला चांगला मोबदला देऊन शेतकरी वर्गाच्या भविष्याचा कायमस्वरूपी विचार केल्यास व कायमस्वरूपीचे आर्थिक दरडोई उत्पन्न चालू करून दिल्यास आमची जागा देण्यास काहीही हरकत नसल्याचे जालिंदर डोंबे यांनी सांगितले आहे.

--

कोट

केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी प्रकल्प योजनेच्या बाबतीत अजून पर्यंत आमच्या कडे कोणतीही माहिती अथवा जबाबदारी ही आलेली नाही. दौंड तालुक्यातील कोणत्या गावांचा या मध्ये समावेश होणार आहे याची देखील माहिती अजून पर्यंत आमच्याकडे आलेली नाही.

-संजय पाटील (तहसीलदार, दौंड)