शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या धास्तीने दौंडच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

-- खोर : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जागेचा मुद्दा एकिकडे गाजत असताना आता दुसरा धक्का बुलेट ट्रेन ...

--

खोर : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जागेचा मुद्दा एकिकडे गाजत असताना आता दुसरा धक्का बुलेट ट्रेन ने शेतकऱ्यांना दिला आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्या बरोबरच आता दौंड तालुक्यातील शेतकरी वर्ग देखील चिंतेत पडला गेला आहे.

केंद्र शासनाच्या अति महत्वकांक्षी मुंबई-हैद्राबाद हायस्पीड बुलेट ट्रेनच्या कामाने आता वेग धरला असून पुणे जिल्ह्यातील गावागावात याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यातील ७०० किमी अंतरातील आज हजारो गावे यामध्ये बाधित होणार आहेत. एकट्या पुणे जिल्ह्यातील ४५ गावांना या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फटका बसून या गावातील भूसंपादन करण्यात येणार असल्याचे प्राथमिक चित्र आहे. मध्य रेल्वे प्रकल्पाच्या नियोजित मार्गाशेजाराच्या २ हजार फूट रुंदीच्या परिसरातील जमीन धारकांना बोलावून त्याची माहिती देण्यात येणार असून त्याची अपेक्षित किंमत किती होईल, नोकरी हवी आहे का, घर, दुकान, जमिनीच्याया बदल्यात इतर ठिकाणी व्यवसाय असाही पर्याय यामध्ये दिला असून कुटुंबातील माहिती तसेच प्रभावित होणाऱ्या एकूण परिस्थितीची माहिती घेतली जात आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प हा आय आयएमआर रिसर्च फाउंडेशनच्या मार्फत हे सर्वेक्षण सुरू आहे. दौंड तालुक्यातील खोर व पडवी या दोन गावांचा समावेश करण्यात आला असून आता हे सर्वेक्षण नेमके कोठून करणार व हे गाव हलविण्यात येणार हे ही पाहणे तितकेच महत्वाचे असणार आहे. हे सर्वेक्षण दोन महिन्यांच्या आत उरकण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावर देण्यात आले असून पुढील महिन्या पासून नव्याने या भूसंपादनाच्या पहिल्या टप्प्यात सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अर्थात आता पर्यंतच्या टप्प्यात शासकीय विभागांना यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली नाही हे देखील महत्वाचे आहे.

या बाबत दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांना या बुलेट ट्रेन प्रकल्प योजनेच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले की, या केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी प्रकल्प योजनेच्या बाबतीत अजून पर्यंत आमच्या कडे कोणतीही माहिती अथवा जबाबदारी ही आलेली नाही. दौंड तालुक्यातील कोणत्या गावांचा या मध्ये समावेश होणार आहे याची देखील माहिती अजून पर्यंत आमच्याकडे आलेली नसल्याचे तहसीलदार संजय पाटील यांनी सांगितले आहे.

याबाबत शेतकरी जालिंदर डोंबे यांना विचारले असता ते म्हणाले की, हा केंद्र शासनाच्या माध्यमातून होणार प्रकल्प आहे. मात्र आमचे कायमस्वरूपी उपजीविकेचे साधन हे शेती आहे. हीच शेती जर संपुष्टात येणार असेल तर ही चिंतेची बाब आहे. परंतु केंद्र शासनाने शेतकरी वर्गाला चांगला मोबदला देऊन शेतकरी वर्गाच्या भविष्याचा कायमस्वरूपी विचार केल्यास व कायमस्वरूपीचे आर्थिक दरडोई उत्पन्न चालू करून दिल्यास आमची जागा देण्यास काहीही हरकत नसल्याचे जालिंदर डोंबे यांनी सांगितले आहे.

--

कोट

केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी प्रकल्प योजनेच्या बाबतीत अजून पर्यंत आमच्या कडे कोणतीही माहिती अथवा जबाबदारी ही आलेली नाही. दौंड तालुक्यातील कोणत्या गावांचा या मध्ये समावेश होणार आहे याची देखील माहिती अजून पर्यंत आमच्याकडे आलेली नाही.

-संजय पाटील (तहसीलदार, दौंड)