शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ग्रामसेवकांवर सदोष मनुष्यवधाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST

बारामती: झारगडवाडी येथील गायरान क्षेत्रात अवैध उत्खनन झाले असून, २०० ते २२० ब्रास मुरुमाची चोरी झाली आहे. या ...

बारामती: झारगडवाडी येथील गायरान क्षेत्रात अवैध उत्खनन झाले असून, २०० ते २२० ब्रास मुरुमाची चोरी झाली आहे. या मुरूमचोरीमुळे झालेल्या खड्ड्यात ग्रामपंचायतीने सांडपाणी सोडल्याची येथील ग्रामस्थांची तक्रार आहे. यामध्ये आतापर्यंत दोन निष्पाप नागरिकांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच सबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत या काही ग्रामस्थांनी त्यांच्या स्वाक्षऱ्यांचे महसूल नायब तहसीलदारांसह पोलीस ठाण्याला निवेदन दिले आहे.

झारगडवाडी येथील सार्वजनिक वनीकरण क्षेत्रातील अवैध उत्खनन बुजविणे, तसेच गावातील भूमिगत गटारीच्या सांडपाण्याची नागरी लोकवस्तीपासून दूर योग्य ठिकाणी व्यवस्था करणेबाबत वेळोवेळी तक्रार करण्यात आली. मात्र, या तक्रारीची विनंती अर्जाची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच, मागील वर्षी ऑगस्ट २०२० रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी देखील योग्य कारवाईचे आदेश दिले. मात्र, त्यांच्या आदेशाला देखील प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली. संबंधित उत्खननात यापूर्वी डोर्लेवाडी गावातील एका नागरिकाचा बळी गेला आहे. त्यानंतर देखील ग्रामपंचायत प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. या खड्डयात मृत्यूची मालिका आणखी सुरूच असल्याचे या ग्रामस्थांचे म्हणने आहे.

दिनांक २४ मे २०२१ रोजी दुपारी १२ ते २ च्या दरम्यान जनाबाई मारुती कांबळे (वय ७५) या वृद्ध महिलेचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. या गंभीर घटनेची माहिती सरपंच, पोलीस पाटील यांना दिली. मात्र, येथील ग्रामसेवकांना या घटनेनंतर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. ग्रामप्रशासनातील मुख्य शासकीय अधिकाऱ्याने अशा गंभीर घटनेची दखल न घेता फोन बंद ठेवणे योग्य नाही. अधिकारी या नात्याने संबंधित वनीकरण क्षेत्रातील अवैध खड्डा खोदण्यात ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यकारिणीच्या चुकीच्या निर्णयावर अंमलबजावणी करणारे ग्रामसेवक सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर योगेश नाळे, दादासो आगम, अमोल यादव, तेजस चिरमे, ऋषिकेश भापकर, तुषार झगडे, सचिन आगम, धनंजय कुंभार, विशाल गदादे, अनिल तरटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.