शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

ग्रामसेवकांवर सदोष मनुष्यवधाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST

बारामती: झारगडवाडी येथील गायरान क्षेत्रात अवैध उत्खनन झाले असून, २०० ते २२० ब्रास मुरुमाची चोरी झाली आहे. या ...

बारामती: झारगडवाडी येथील गायरान क्षेत्रात अवैध उत्खनन झाले असून, २०० ते २२० ब्रास मुरुमाची चोरी झाली आहे. या मुरूमचोरीमुळे झालेल्या खड्ड्यात ग्रामपंचायतीने सांडपाणी सोडल्याची येथील ग्रामस्थांची तक्रार आहे. यामध्ये आतापर्यंत दोन निष्पाप नागरिकांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच सबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत या काही ग्रामस्थांनी त्यांच्या स्वाक्षऱ्यांचे महसूल नायब तहसीलदारांसह पोलीस ठाण्याला निवेदन दिले आहे.

झारगडवाडी येथील सार्वजनिक वनीकरण क्षेत्रातील अवैध उत्खनन बुजविणे, तसेच गावातील भूमिगत गटारीच्या सांडपाण्याची नागरी लोकवस्तीपासून दूर योग्य ठिकाणी व्यवस्था करणेबाबत वेळोवेळी तक्रार करण्यात आली. मात्र, या तक्रारीची विनंती अर्जाची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच, मागील वर्षी ऑगस्ट २०२० रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी देखील योग्य कारवाईचे आदेश दिले. मात्र, त्यांच्या आदेशाला देखील प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली. संबंधित उत्खननात यापूर्वी डोर्लेवाडी गावातील एका नागरिकाचा बळी गेला आहे. त्यानंतर देखील ग्रामपंचायत प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. या खड्डयात मृत्यूची मालिका आणखी सुरूच असल्याचे या ग्रामस्थांचे म्हणने आहे.

दिनांक २४ मे २०२१ रोजी दुपारी १२ ते २ च्या दरम्यान जनाबाई मारुती कांबळे (वय ७५) या वृद्ध महिलेचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. या गंभीर घटनेची माहिती सरपंच, पोलीस पाटील यांना दिली. मात्र, येथील ग्रामसेवकांना या घटनेनंतर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. ग्रामप्रशासनातील मुख्य शासकीय अधिकाऱ्याने अशा गंभीर घटनेची दखल न घेता फोन बंद ठेवणे योग्य नाही. अधिकारी या नात्याने संबंधित वनीकरण क्षेत्रातील अवैध खड्डा खोदण्यात ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यकारिणीच्या चुकीच्या निर्णयावर अंमलबजावणी करणारे ग्रामसेवक सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर योगेश नाळे, दादासो आगम, अमोल यादव, तेजस चिरमे, ऋषिकेश भापकर, तुषार झगडे, सचिन आगम, धनंजय कुंभार, विशाल गदादे, अनिल तरटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.