शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कसा पाहता येईल जेतेपदासाठीचा ऐतिहासिक सामना?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

ग्रामसेवकांवर सदोष मनुष्यवधाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST

बारामती: झारगडवाडी येथील गायरान क्षेत्रात अवैध उत्खनन झाले असून, २०० ते २२० ब्रास मुरुमाची चोरी झाली आहे. या ...

बारामती: झारगडवाडी येथील गायरान क्षेत्रात अवैध उत्खनन झाले असून, २०० ते २२० ब्रास मुरुमाची चोरी झाली आहे. या मुरूमचोरीमुळे झालेल्या खड्ड्यात ग्रामपंचायतीने सांडपाणी सोडल्याची येथील ग्रामस्थांची तक्रार आहे. यामध्ये आतापर्यंत दोन निष्पाप नागरिकांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच सबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत या काही ग्रामस्थांनी त्यांच्या स्वाक्षऱ्यांचे महसूल नायब तहसीलदारांसह पोलीस ठाण्याला निवेदन दिले आहे.

झारगडवाडी येथील सार्वजनिक वनीकरण क्षेत्रातील अवैध उत्खनन बुजविणे, तसेच गावातील भूमिगत गटारीच्या सांडपाण्याची नागरी लोकवस्तीपासून दूर योग्य ठिकाणी व्यवस्था करणेबाबत वेळोवेळी तक्रार करण्यात आली. मात्र, या तक्रारीची विनंती अर्जाची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच, मागील वर्षी ऑगस्ट २०२० रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी देखील योग्य कारवाईचे आदेश दिले. मात्र, त्यांच्या आदेशाला देखील प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली. संबंधित उत्खननात यापूर्वी डोर्लेवाडी गावातील एका नागरिकाचा बळी गेला आहे. त्यानंतर देखील ग्रामपंचायत प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. या खड्डयात मृत्यूची मालिका आणखी सुरूच असल्याचे या ग्रामस्थांचे म्हणने आहे.

दिनांक २४ मे २०२१ रोजी दुपारी १२ ते २ च्या दरम्यान जनाबाई मारुती कांबळे (वय ७५) या वृद्ध महिलेचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. या गंभीर घटनेची माहिती सरपंच, पोलीस पाटील यांना दिली. मात्र, येथील ग्रामसेवकांना या घटनेनंतर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. ग्रामप्रशासनातील मुख्य शासकीय अधिकाऱ्याने अशा गंभीर घटनेची दखल न घेता फोन बंद ठेवणे योग्य नाही. अधिकारी या नात्याने संबंधित वनीकरण क्षेत्रातील अवैध खड्डा खोदण्यात ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यकारिणीच्या चुकीच्या निर्णयावर अंमलबजावणी करणारे ग्रामसेवक सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर योगेश नाळे, दादासो आगम, अमोल यादव, तेजस चिरमे, ऋषिकेश भापकर, तुषार झगडे, सचिन आगम, धनंजय कुंभार, विशाल गदादे, अनिल तरटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.