शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांचाही झाला मृत्यू

By admin | Updated: June 1, 2017 01:49 IST

शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अमितने छातीत दुखूू लागल्याने उपचारासाठी नेत असताना

लोकमत न्यूज नेटवर्कनीरा : शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अमितने छातीत दुखूू लागल्याने उपचारासाठी नेत असताना वडिलांच्या मांडीवरच आपला प्राण सोडला. हा धक्का सहन न झाल्याने वडिलांनाही हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचीही प्राणज्योत मालवली. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील इंदोली गावात घडली. मोहन चितू कोळपे (वय ६४) व त्यांचा शिक्षक मुलगा अमित ( वय ३०) असे या घटनेत मृत झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. एकाच दिवशी काही क्षणांच्या अंतरात दोघांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.मृत वडील हे येथील पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्योतिर्लिंग हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक होते. तेव्हापासून कोळपे कुटुंब पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथे राहत होते. सध्या आईवडील मूळ गावी इंदोली येथे राहत असून, एक मुलगा अमोल गुळूंचे येथे व मृत मुलगा अमित सातारा येथे शिक्षक म्हणून कार्यरत होता. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार: अमित, भाऊ अमोल आपल्या मूळगावी इंदोली (ता. कराड, जि .सातारा ) येथे आईवडिलांकडे उन्हाळी सुटीसाठी गेले होते. अमित सातारा येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. सोमवारी ( ता.२९) रोजी त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आपल्या वडिलांच्या मांडीवरच अमितने प्राण सोडला. हा धक्का वडिलांना सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.निधीअभावी काम बंद अतिशय खडतर परिस्थितीतून मोहन कोळपे यांनी सुरुवात केली. गरिबीतून बी.एड्.चे शिक्षण पूर्ण केले. नोकरी मिळेपर्यंत दूध डेअरीतही काम केले. काही दिवसांनी पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळात त्यांना नोकरीची संधी मिळाली. पुढे गुळूंचे गावात राहून कोळपे सरांनी माध्यमिक विद्यालयात आपली सेवा पूर्ण केली. दोन्ही मुलांचे शिक्षण येथेच झाले. ३१ वर्षे ८ महिने एवढी प्रदीर्घ सेवा बजावली.