शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांच्या संसारानंतरही सासरी छळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:08 IST

पुणे : कोणतेही संकट आले की त्याचा पहिला फटका बसतो तो समाजातील सर्वांत खालच्या वर्गाला आणि महिलांना. कोरोना संसर्गाच्या ...

पुणे : कोणतेही संकट आले की त्याचा पहिला फटका बसतो तो समाजातील सर्वांत खालच्या वर्गाला आणि महिलांना. कोरोना संसर्गाच्या या जागतिक महामारीत हेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दुसऱ्या लॉकडाऊनमध्येही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्याचे दिसून आले आहे.

विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक देऊन तिचा छळ करण्याच्या यंदा आत्तापर्यंत १३१ घटना घडल्या. त्या तुलनेत गेल्या वर्षी जूनअखेर ११५ घटना घडल्या होत्या. राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार विवाहानंतर महिलांवर हिंसाचार केल्याच्या तक्रारीचे राष्ट्रीय प्रमाण २८.९ टक्के आहे. महाराष्ट्रातही हे प्रमाण २१.४ टक्के इतके आहे. पुण्यात हे प्रमाण २७ टक्के इतके आहे. विशेषत: आयटी क्षेत्रात घरगुती हिंसाचार वेगाने वाढतो आहे.

महिलांच्या हिंसाचारामध्ये प्रामुख्याने विवाहानंतर वर्षभरापासून ते वयाच्या ३५ वर्षांपर्यत महिलांचा छळ होण्याच्या तक्रारी दाखल होताना दिसतात.

चौकट

‘सोशल मीडिया’मुळे वाढली भांडणे

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुण विवाहितांमध्ये परस्परांबद्दलचा संशय वाढू लागला आहे. एकमेकांशेजारी बसले असतानाही एकमेकांशी संवाद न करता मोबाईलमध्ये चॅटिंग करतानाचे दृश्य घराघरात दिसू लागले आहे. पुढचे मागचे काही माहिती नसताना एखादा दुसरा मेसेज, एखाद्या समारंभातील फोटोवरून एकमेकांविषयी संशयाची सुई डोक्यात वळवळू लागते. त्यातून आपसातील संबंध बिघडू लागतात.

चौकट

वंशाला वारसा हवा

अनेकदा मुली झाल्यानंतर ‘वंशाला वारस हवा’ या संकल्पनेतून अजूनही विवाहित स्त्रियांचा छळ होताना दिसतो. त्यासाठी बेकायदेशीरपणे लिंगभेद चाचणी करून मुलगी असेल तर जबरदस्तीने गर्भपात करण्याच्या घटना घडत आहेत. अनेक घटनांमध्ये महिलांना माहेरचा आधार नसतो. त्यामुळे सासरी छळ होत असला तरी त्या तो सहन करीत संसाराचा गाडा हाकत असतात. अगदी लग्नाला २०-२० वर्षे झाल्यानंतरही सासरच्या लोकांकडून सातत्याने टोमणे ऐकून घ्यावे लागतात.

चौकट

पुरुषांची मानसिकता कधी बदलणार?

महिलांचा छळाचे प्रकार कमी होण्यासाठी घरातूनच संस्कार व्हायला हवेत; परंतु अजूनही तसे होताना दिसत नाही. त्यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल होण्याची आवश्यकता आहे. महिलांसाठी अनेक कायदे केले असले तरी पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अजूनही महिलांना चकरा माराव्या लागतात. यासाठी समुपदेशनाबरोबरच समाज प्रबोधनाची चळवळ उभारण्याची आवश्यकता आहे. स्वयंसेवी संघटनांची मदत घेऊन समुपदेशन करण्याची गरज आहे.

-अ‍ॅड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

चौकट

केवळ कायद्याचा धाक कामाचा नाही

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना अजूनही मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. या पीडित महिलांच्या समुपदेशनासाठी ऑनलाइन हेल्पलाइनची आवश्यकता आहे. महिलांनीही छळ सहन न करता जवळच्या महिला संघटना, पोलीस यांच्याशी संपर्क साधावा. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार कमी व्हावा, यासाठी समाजानेही आपला वाटा उचलण्याची गरज आहे. केवळ कायदे करून व त्याचा धाक दाखवून हा प्रश्न सुटण्यासारखा नाही. त्याचबरोबर एकमेकांशी साथीने संसार होत असतो, ही भावना पुरुषांमध्ये वाढीस लावण्याची आवश्यकता आहे.

-किरण मोघे, सामाजिक कार्यकर्त्या