शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

१० वर्षांच्या संसारानंतरही सासरी छळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:08 IST

पुणे : कोणतेही संकट आले की त्याचा पहिला फटका बसतो तो समाजातील सर्वांत खालच्या वर्गाला आणि महिलांना. कोरोना संसर्गाच्या ...

पुणे : कोणतेही संकट आले की त्याचा पहिला फटका बसतो तो समाजातील सर्वांत खालच्या वर्गाला आणि महिलांना. कोरोना संसर्गाच्या या जागतिक महामारीत हेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दुसऱ्या लॉकडाऊनमध्येही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्याचे दिसून आले आहे.

विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक देऊन तिचा छळ करण्याच्या यंदा आत्तापर्यंत १३१ घटना घडल्या. त्या तुलनेत गेल्या वर्षी जूनअखेर ११५ घटना घडल्या होत्या. राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार विवाहानंतर महिलांवर हिंसाचार केल्याच्या तक्रारीचे राष्ट्रीय प्रमाण २८.९ टक्के आहे. महाराष्ट्रातही हे प्रमाण २१.४ टक्के इतके आहे. पुण्यात हे प्रमाण २७ टक्के इतके आहे. विशेषत: आयटी क्षेत्रात घरगुती हिंसाचार वेगाने वाढतो आहे.

महिलांच्या हिंसाचारामध्ये प्रामुख्याने विवाहानंतर वर्षभरापासून ते वयाच्या ३५ वर्षांपर्यत महिलांचा छळ होण्याच्या तक्रारी दाखल होताना दिसतात.

चौकट

‘सोशल मीडिया’मुळे वाढली भांडणे

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुण विवाहितांमध्ये परस्परांबद्दलचा संशय वाढू लागला आहे. एकमेकांशेजारी बसले असतानाही एकमेकांशी संवाद न करता मोबाईलमध्ये चॅटिंग करतानाचे दृश्य घराघरात दिसू लागले आहे. पुढचे मागचे काही माहिती नसताना एखादा दुसरा मेसेज, एखाद्या समारंभातील फोटोवरून एकमेकांविषयी संशयाची सुई डोक्यात वळवळू लागते. त्यातून आपसातील संबंध बिघडू लागतात.

चौकट

वंशाला वारसा हवा

अनेकदा मुली झाल्यानंतर ‘वंशाला वारस हवा’ या संकल्पनेतून अजूनही विवाहित स्त्रियांचा छळ होताना दिसतो. त्यासाठी बेकायदेशीरपणे लिंगभेद चाचणी करून मुलगी असेल तर जबरदस्तीने गर्भपात करण्याच्या घटना घडत आहेत. अनेक घटनांमध्ये महिलांना माहेरचा आधार नसतो. त्यामुळे सासरी छळ होत असला तरी त्या तो सहन करीत संसाराचा गाडा हाकत असतात. अगदी लग्नाला २०-२० वर्षे झाल्यानंतरही सासरच्या लोकांकडून सातत्याने टोमणे ऐकून घ्यावे लागतात.

चौकट

पुरुषांची मानसिकता कधी बदलणार?

महिलांचा छळाचे प्रकार कमी होण्यासाठी घरातूनच संस्कार व्हायला हवेत; परंतु अजूनही तसे होताना दिसत नाही. त्यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल होण्याची आवश्यकता आहे. महिलांसाठी अनेक कायदे केले असले तरी पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अजूनही महिलांना चकरा माराव्या लागतात. यासाठी समुपदेशनाबरोबरच समाज प्रबोधनाची चळवळ उभारण्याची आवश्यकता आहे. स्वयंसेवी संघटनांची मदत घेऊन समुपदेशन करण्याची गरज आहे.

-अ‍ॅड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

चौकट

केवळ कायद्याचा धाक कामाचा नाही

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना अजूनही मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. या पीडित महिलांच्या समुपदेशनासाठी ऑनलाइन हेल्पलाइनची आवश्यकता आहे. महिलांनीही छळ सहन न करता जवळच्या महिला संघटना, पोलीस यांच्याशी संपर्क साधावा. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार कमी व्हावा, यासाठी समाजानेही आपला वाटा उचलण्याची गरज आहे. केवळ कायदे करून व त्याचा धाक दाखवून हा प्रश्न सुटण्यासारखा नाही. त्याचबरोबर एकमेकांशी साथीने संसार होत असतो, ही भावना पुरुषांमध्ये वाढीस लावण्याची आवश्यकता आहे.

-किरण मोघे, सामाजिक कार्यकर्त्या