शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

वडील, बहिणींमुळे घडलो!

By admin | Updated: January 9, 2017 02:41 IST

माझ्या संगीतविषयक वाटचालीत, वडील आणि बहिणींचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्यामुळेच मला मान-सन्मान मिळाले. यश मिळाले, असे मत भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी : माझ्या संगीतविषयक वाटचालीत, वडील आणि बहिणींचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्यामुळेच मला मान-सन्मान मिळाले. यश मिळाले, असे मत भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नादब्रह्म परिवाराच्या वतीने आयोजित मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सवात ते बोलत होते. या वेळी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते नादस्वरब्रह्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी शारदापीठाचे वसंतराव गाडगीळ, वेदमूर्ती दी. मा. फडके, संस्थेचे प्रमुख डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. वंदना घांगुर्डे, अरुण चितळे आदी उपस्थित होते. मंगेशकर म्हणाले, ‘‘वयाच्या आठव्या वर्षापासून रंगमंचावर काम करीत आहे. ज्या चांगल्या संगीतरचना माझ्या हातून झाल्या आहेत, त्या वडिलांच्या संस्कारामुळेच. ही त्यांची कृपा आहे. ज्या ज्या ठिकाणी अडचण आली, तिथे नकळत वडिलांनी हात दिला. वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी प्रतिष्ठानाच्या वतीने दर वर्षी मान्यवरांचा सन्मान करतो. मला हा पुरस्कार माझे वडील आणि बहिणीमुळे मिळाला. माझ्या वाट्याला आलेल्या मानसन्मानामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. अनेकांच्या ठिकाणी चांगले गुण असतात; पण त्यांना योग्य तो मान मिळतोच असे नाही; पण मला हे भाग्य केवळ वडील व आईसमान असलेली बहीण लता मंगेशकर यांच्यामुळे शक्य झाले.’’ डॉ घांगुर्डे प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या २२ वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव सुरू आहे. संगीत चळवळीत नादब्रह्म परिवार योगदान देत आहे. संगीत चळवळ वाढीसाठीचा महोत्सव हा प्रयत्न आहे.’’ प्रसिद्ध अभिनेते प्रमोद पवार आणि तृप्ती भागवत यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)