शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोना निर्बंध अंमलबजावणीचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण भागात रुग्णसंख्या आटोक्यात येत नसून हॉटस्पॉट गावांच्या संख्येतही वाढ होत आहे. रुग्णवाढीचा दरही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्रामीण भागात रुग्णसंख्या आटोक्यात येत नसून हॉटस्पॉट गावांच्या संख्येतही वाढ होत आहे. रुग्णवाढीचा दरही कायम असल्याने नाईलाजाने ग्रामीण भागाला निर्बंधातून सूट देण्यात आलेली नाही. असे असतानाही या निर्बंधांना हरताळ पासला जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. तर या निर्बंधाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केवळ आरोग्य यंत्रणा आणि ग्रामपंचायतीवर आली असून तलाठी, पोलीस यंत्रणा गावाकडे फिरकत नसल्याने याचा ताण जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा बाधित दर पाच टक्क्यांखाली आहे. त्यामुळे दुपारी चार वाजल्यानंतर असलेले निर्बंध उठविण्यात आले. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर असली, तरी ती कमी गेल्या काही दिवसांपासू आटोक्यात आलेली नाही. तीन आठवड्यांपासून बाधित दर हा साडेपाच टक्के आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गावा-गावांत, वाडी-वस्त्यांवर कोरोनाचे रुग्ण आढळत होते. सध्या १३ तालुक्यांतील सुमारे ४०० गावांत किमान १ किंवा २ पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, १०९ हॉटस्पॉट गावांत १० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. जिल्हा परिषदेने दहापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांत बाधित कुटुंबांतील सर्व सदस्यांची आणि ज्या गावात दहापेक्षा कमी रुग्ण आहेत त्याठिकाणी कोरोना चाचण्या करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या तीन आठवड्यांत या मोहिमेंतर्गत २ लाख २२ हजार १ हजार १४६ नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत.

ग्रामीण भागात सर्व दुकाने ४ वाजता बंद होणे अपेक्षित आहेत. मात्र, ती होत नाहीत. महामार्गावरील सर्व दुकाने, हॉटेल हे रात्रभर सुरू असतात. या ठिकाणी गावातील तसेच बाहेर गावातील नागरिक येत असल्याने रुग्णसंख्या ही कमी होण्याऐवजी वाढती आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही पोलीस यंत्रणेची आहे. मात्र, ही कारवाई होताना दिसत नाही. कोरोना नियंत्रित आणण्यासाठी तलाठ्यांची महत्वाची जबाबदारी आहे. मात्र, गाव पातळीवर नियमांची अंमलबजावणी करण्यास ही यंत्रणाही कमी पडत आहे. यामुळे जर कोरोनाला खऱ्या अर्थाने नियंत्रणात आणायाचे असल्यास आरोग्य यंत्रणेसोबतच इतर यंत्रणांनीही तेवढाच पुढाकार घेणे गरजेचे आहे.

चौकट

ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालमकंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला बैठक घेऊन सूचना देत असतात. त्यावेळी प्रशासनाकडून आम्ही खूप काम करत असल्याचे दाखवले जाते. मात्र, प्रत्यक्षात ग्रामीण भागात परिस्थिती वेगळी आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर यांच्यावर कोरोना चाचण्या आणि लसीकरण असा दुहेरी ताण आहे. तर निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेले अनेक अधिकारी व कर्मचारी गावात राहत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.