शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

कोरोना निर्बंध अंमलबजावणीचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण भागात रुग्णसंख्या आटोक्यात येत नसून हॉटस्पॉट गावांच्या संख्येतही वाढ होत आहे. रुग्णवाढीचा दरही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्रामीण भागात रुग्णसंख्या आटोक्यात येत नसून हॉटस्पॉट गावांच्या संख्येतही वाढ होत आहे. रुग्णवाढीचा दरही कायम असल्याने नाईलाजाने ग्रामीण भागाला निर्बंधातून सूट देण्यात आलेली नाही. असे असतानाही या निर्बंधांना हरताळ पासला जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. तर या निर्बंधाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केवळ आरोग्य यंत्रणा आणि ग्रामपंचायतीवर आली असून तलाठी, पोलीस यंत्रणा गावाकडे फिरकत नसल्याने याचा ताण जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा बाधित दर पाच टक्क्यांखाली आहे. त्यामुळे दुपारी चार वाजल्यानंतर असलेले निर्बंध उठविण्यात आले. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर असली, तरी ती कमी गेल्या काही दिवसांपासू आटोक्यात आलेली नाही. तीन आठवड्यांपासून बाधित दर हा साडेपाच टक्के आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गावा-गावांत, वाडी-वस्त्यांवर कोरोनाचे रुग्ण आढळत होते. सध्या १३ तालुक्यांतील सुमारे ४०० गावांत किमान १ किंवा २ पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, १०९ हॉटस्पॉट गावांत १० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. जिल्हा परिषदेने दहापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांत बाधित कुटुंबांतील सर्व सदस्यांची आणि ज्या गावात दहापेक्षा कमी रुग्ण आहेत त्याठिकाणी कोरोना चाचण्या करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या तीन आठवड्यांत या मोहिमेंतर्गत २ लाख २२ हजार १ हजार १४६ नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत.

ग्रामीण भागात सर्व दुकाने ४ वाजता बंद होणे अपेक्षित आहेत. मात्र, ती होत नाहीत. महामार्गावरील सर्व दुकाने, हॉटेल हे रात्रभर सुरू असतात. या ठिकाणी गावातील तसेच बाहेर गावातील नागरिक येत असल्याने रुग्णसंख्या ही कमी होण्याऐवजी वाढती आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही पोलीस यंत्रणेची आहे. मात्र, ही कारवाई होताना दिसत नाही. कोरोना नियंत्रित आणण्यासाठी तलाठ्यांची महत्वाची जबाबदारी आहे. मात्र, गाव पातळीवर नियमांची अंमलबजावणी करण्यास ही यंत्रणाही कमी पडत आहे. यामुळे जर कोरोनाला खऱ्या अर्थाने नियंत्रणात आणायाचे असल्यास आरोग्य यंत्रणेसोबतच इतर यंत्रणांनीही तेवढाच पुढाकार घेणे गरजेचे आहे.

चौकट

ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालमकंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला बैठक घेऊन सूचना देत असतात. त्यावेळी प्रशासनाकडून आम्ही खूप काम करत असल्याचे दाखवले जाते. मात्र, प्रत्यक्षात ग्रामीण भागात परिस्थिती वेगळी आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर यांच्यावर कोरोना चाचण्या आणि लसीकरण असा दुहेरी ताण आहे. तर निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेले अनेक अधिकारी व कर्मचारी गावात राहत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.