शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना निर्बंध अंमलबजावणीचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण भागात रुग्णसंख्या आटोक्यात येत नसून हॉटस्पॉट गावांच्या संख्येतही वाढ होत आहे. रुग्णवाढीचा दरही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्रामीण भागात रुग्णसंख्या आटोक्यात येत नसून हॉटस्पॉट गावांच्या संख्येतही वाढ होत आहे. रुग्णवाढीचा दरही कायम असल्याने नाईलाजाने ग्रामीण भागाला निर्बंधातून सूट देण्यात आलेली नाही. असे असतानाही या निर्बंधांना हरताळ पासला जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. तर या निर्बंधाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केवळ आरोग्य यंत्रणा आणि ग्रामपंचायतीवर आली असून तलाठी, पोलीस यंत्रणा गावाकडे फिरकत नसल्याने याचा ताण जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा बाधित दर पाच टक्क्यांखाली आहे. त्यामुळे दुपारी चार वाजल्यानंतर असलेले निर्बंध उठविण्यात आले. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर असली, तरी ती कमी गेल्या काही दिवसांपासू आटोक्यात आलेली नाही. तीन आठवड्यांपासून बाधित दर हा साडेपाच टक्के आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गावा-गावांत, वाडी-वस्त्यांवर कोरोनाचे रुग्ण आढळत होते. सध्या १३ तालुक्यांतील सुमारे ४०० गावांत किमान १ किंवा २ पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, १०९ हॉटस्पॉट गावांत १० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. जिल्हा परिषदेने दहापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांत बाधित कुटुंबांतील सर्व सदस्यांची आणि ज्या गावात दहापेक्षा कमी रुग्ण आहेत त्याठिकाणी कोरोना चाचण्या करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या तीन आठवड्यांत या मोहिमेंतर्गत २ लाख २२ हजार १ हजार १४६ नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत.

ग्रामीण भागात सर्व दुकाने ४ वाजता बंद होणे अपेक्षित आहेत. मात्र, ती होत नाहीत. महामार्गावरील सर्व दुकाने, हॉटेल हे रात्रभर सुरू असतात. या ठिकाणी गावातील तसेच बाहेर गावातील नागरिक येत असल्याने रुग्णसंख्या ही कमी होण्याऐवजी वाढती आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही पोलीस यंत्रणेची आहे. मात्र, ही कारवाई होताना दिसत नाही. कोरोना नियंत्रित आणण्यासाठी तलाठ्यांची महत्वाची जबाबदारी आहे. मात्र, गाव पातळीवर नियमांची अंमलबजावणी करण्यास ही यंत्रणाही कमी पडत आहे. यामुळे जर कोरोनाला खऱ्या अर्थाने नियंत्रणात आणायाचे असल्यास आरोग्य यंत्रणेसोबतच इतर यंत्रणांनीही तेवढाच पुढाकार घेणे गरजेचे आहे.

चौकट

ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालमकंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला बैठक घेऊन सूचना देत असतात. त्यावेळी प्रशासनाकडून आम्ही खूप काम करत असल्याचे दाखवले जाते. मात्र, प्रत्यक्षात ग्रामीण भागात परिस्थिती वेगळी आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर यांच्यावर कोरोना चाचण्या आणि लसीकरण असा दुहेरी ताण आहे. तर निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेले अनेक अधिकारी व कर्मचारी गावात राहत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.