शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

खुल्या कारागृहातील शेती करणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:28 IST

विवेक भुसे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खुल्या कारागृहातील बंद्यांना शेतीचे काम दिले जाते. त्यासाठी त्यांना दररोज कुशल कामगारांचे ...

विवेक भुसे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खुल्या कारागृहातील बंद्यांना शेतीचे काम दिले जाते. त्यासाठी त्यांना दररोज कुशल कामगारांचे वेतनही दिले जाते. ब्रिटीश काळापासून सुरु असलेली ही पद्धत आताच्या काळात सुसंगत नसल्याने आता खुल्या कारागृहातील शेती विभाग बंद करणार आहे. त्याचबरोबर कारागृहातील दशकानुदशके तेच ते उद्योगातून निर्मिती केली जात आहे. त्यात आता बदल करणार आहे. त्यासाठी उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे.

कारागृहातील उद्योग तसेच विविध बाबींत करण्यात येणाऱ्या सुधारणाविषयी कारागृह अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद यांनी लोकमत ला माहिती दिली.

कारागृहात शिक्षा झालेल्या बंदी तसेच चांगली वागणूक असणार्‍या बंदींना खुल्या कारागृहात पाठविले जाते. तेथे प्रामुख्याने त्यांच्याकडून शेतीची कामे करुन घेतली जातात. राज्यातील विविध कारागृहाकडे मोठी शेत जमीन आहे. त्यात गहू, ज्वारीपासून वेगवेगळी पिके घेतली जातात. ब्रिटीश काळापासून ही पद्धत आहे. या बंद्यांना कुशल कारागीर असे समजून वेतन दिले जाते. त्यासाठी होणारा खर्च लक्षात घेता त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कारागृहातील शेती विभाग बंद करावा, असा प्रस्ताव कारागृह प्रशासनाकडून राज्य शासनाला पाठविण्यात येत आहे. त्याऐवजी खुल्या कारागृहातील बंद्यांना कारागृहाजवळच खासगी उद्योगात रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव आहे.

पुणे, ठाणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक रोड या कारागृहात ही योजना राबविणार आहे. खुल्या कारागृहातील या बंद्यांना सकाळी रोजगारासाठी सोडले जाईल. त्यांनी जवळच्या दुकानात, उद्योगात दिवसभर काम करावे व सायंकाळी पुन्हा बराकीत परत यावे, अशी ही योजना आहे. शासनाकडून हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी करणार असल्याचे रामानंद यांनी सांगितले.

कारागृहात सध्या अनेक पारंपारीक उद्योग चालविले जातात. त्यात त्या प्रामुख्याने टेक्सट्राईल इंडस्ट्रीवर भर दिला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हातमागाद्वारे येथे कापडाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या ७० वर्षात त्यात फारसा बदल केला नाही. सध्याच्या बाजारपेठेला अनुसरुन उद्योगाची उभारणी करण्याचा विचार सुरु झाला आहे. त्यासाठी कोणते उद्योग कालबाह्य झाले आहेत. कोणते नवीन उद्योग सुरु करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालानुसार आवश्यक ते बदल करणार आहे.

१४०० कैद्यांची क्षमता वाढीचा प्रस्ताव

राज्यातील कारागृहातील कैद्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक कैदी सध्या ठेवले जात आहे. त्यामुळे कोरोना सारख्या संसर्गात संपूर्ण कारागृहात त्याची लागण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे राज्यातील कारागृहाची क्षमता १४०० कैद्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत मुंबईत नुकतीच बैठक झाली आहे. नवीन कारागृह स्थापनेसाठी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना जमीन शोधण्याचे आदेश राज्य शासनाकडून दिल्याचे सुनील रामानंद यांनी सांगितले.