शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या कारागृहातील शेती करणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:28 IST

विवेक भुसे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खुल्या कारागृहातील बंद्यांना शेतीचे काम दिले जाते. त्यासाठी त्यांना दररोज कुशल कामगारांचे ...

विवेक भुसे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खुल्या कारागृहातील बंद्यांना शेतीचे काम दिले जाते. त्यासाठी त्यांना दररोज कुशल कामगारांचे वेतनही दिले जाते. ब्रिटीश काळापासून सुरु असलेली ही पद्धत आताच्या काळात सुसंगत नसल्याने आता खुल्या कारागृहातील शेती विभाग बंद करणार आहे. त्याचबरोबर कारागृहातील दशकानुदशके तेच ते उद्योगातून निर्मिती केली जात आहे. त्यात आता बदल करणार आहे. त्यासाठी उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे.

कारागृहातील उद्योग तसेच विविध बाबींत करण्यात येणाऱ्या सुधारणाविषयी कारागृह अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद यांनी लोकमत ला माहिती दिली.

कारागृहात शिक्षा झालेल्या बंदी तसेच चांगली वागणूक असणार्‍या बंदींना खुल्या कारागृहात पाठविले जाते. तेथे प्रामुख्याने त्यांच्याकडून शेतीची कामे करुन घेतली जातात. राज्यातील विविध कारागृहाकडे मोठी शेत जमीन आहे. त्यात गहू, ज्वारीपासून वेगवेगळी पिके घेतली जातात. ब्रिटीश काळापासून ही पद्धत आहे. या बंद्यांना कुशल कारागीर असे समजून वेतन दिले जाते. त्यासाठी होणारा खर्च लक्षात घेता त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कारागृहातील शेती विभाग बंद करावा, असा प्रस्ताव कारागृह प्रशासनाकडून राज्य शासनाला पाठविण्यात येत आहे. त्याऐवजी खुल्या कारागृहातील बंद्यांना कारागृहाजवळच खासगी उद्योगात रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव आहे.

पुणे, ठाणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक रोड या कारागृहात ही योजना राबविणार आहे. खुल्या कारागृहातील या बंद्यांना सकाळी रोजगारासाठी सोडले जाईल. त्यांनी जवळच्या दुकानात, उद्योगात दिवसभर काम करावे व सायंकाळी पुन्हा बराकीत परत यावे, अशी ही योजना आहे. शासनाकडून हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी करणार असल्याचे रामानंद यांनी सांगितले.

कारागृहात सध्या अनेक पारंपारीक उद्योग चालविले जातात. त्यात त्या प्रामुख्याने टेक्सट्राईल इंडस्ट्रीवर भर दिला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हातमागाद्वारे येथे कापडाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या ७० वर्षात त्यात फारसा बदल केला नाही. सध्याच्या बाजारपेठेला अनुसरुन उद्योगाची उभारणी करण्याचा विचार सुरु झाला आहे. त्यासाठी कोणते उद्योग कालबाह्य झाले आहेत. कोणते नवीन उद्योग सुरु करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालानुसार आवश्यक ते बदल करणार आहे.

१४०० कैद्यांची क्षमता वाढीचा प्रस्ताव

राज्यातील कारागृहातील कैद्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक कैदी सध्या ठेवले जात आहे. त्यामुळे कोरोना सारख्या संसर्गात संपूर्ण कारागृहात त्याची लागण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे राज्यातील कारागृहाची क्षमता १४०० कैद्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत मुंबईत नुकतीच बैठक झाली आहे. नवीन कारागृह स्थापनेसाठी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना जमीन शोधण्याचे आदेश राज्य शासनाकडून दिल्याचे सुनील रामानंद यांनी सांगितले.