शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
6
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
7
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
8
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
9
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
10
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
11
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
12
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
13
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
14
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
15
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
16
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
17
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
18
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
19
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
20
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'

पश्चिम भागातील शेतकरी आजही पारंपरिक शेतीतच अडकलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:09 AM

-- भोर : भोर तालुक्यातील बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे कृषी लागवड क्षेत्रात जरी वाढ होत असली तरी निर्सगाचा ...

--

भोर : भोर तालुक्यातील बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे कृषी लागवड क्षेत्रात जरी वाढ होत असली तरी निर्सगाचा लहरीपणा, पाण्याचा अभाव व अर्थिक परिस्थितीमुळे पश्चिम भागातील शेतकरी आजही पारंपरिक शेतीत अडकलेला आहे. याउलट पूर्व भागातील शेतकरी दिवसेंदिवस पारंपरिक पद्धत सोडून यंत्राचा वापर करताना दिसत असून शेतीत बदल करून आधुनिक पद्धतीने शेती करताना दिसत आहे.

तालुक्यातील प्रमुख पिके भात असले तरी सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

भोर तालुक्यात १९७ गावे असून तालुक्याचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग पडतात. तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ८६७७६ हेक्टर असून १५५ खरिपाची तर ४२ गावे रब्बीची आहेत. पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर तर रब्बी पिकाखालील क्षेत्र १७४०० हेक्टर आहे. तालुक्यात अडीच ते तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. भात हे प्रमुख पीक असुन ७४०० हेक्टवर भाताची लागवड केली जाते. त्यासाठी यावर्षी सुमारे ७०० हेक्टर क्षेत्रावर भातरोपे वाटिकाची पेरणी करण्यात येणार आहे. भात लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असते. निसर्गाचा लहरीपणा, पाण्याचा अभाव व आर्थिक परिस्थिती यामुळे पश्चिम भागातील शेतकरी भात नाचणी वरई ही जिरायती शेती करतात. मात्र पाऊस पडला तर शेती पिकते अन्यथा उपासमार अशी अवस्था आहे.

या उलट पूर्व भागातील पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग परिसर व भोंगवली पट्टा या भागात नवनवीन यंत्राचा वापर करून आधुनिक पद्धतीने बागायती शेती केली जाते. या शिवाय पाॅलीहाऊसचा वापर करूनही शेती करतात. यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न काढण्याचा येथील शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. तालुक्यात भाताबरोबरच सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात वाढ होत असून नसरापूर,उत्रोली, खानापूर, हातनोशी, भाबवडी, पिसावरे, नांदगाव, देगाव, नायगाव, कुरंगवडी यासह अनेक भागात ३ हजार हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. कृषी विभागामार्फत उत्पन्नवाढीसाठी रुंदसरी ओरंभा या पद्धतीचा आणि सुधारीत वाणाचा वापर केला जातो. खरीप भुईमूगदेखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून सुमारे ४ हजार हेक्टरवर लागवड केली जाते. पूर्व भागात ऊस, टोमॅटो, वांगी, भेंडी, काकडी, भाजीपाला ही पिके घेतली जातात. यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्यापासून आर्थिक फायदा मिळत आहे

शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी संकरीत आधुनिक पद्धतीने यंत्राच्या साह्याने भात लागवड तंत्रज्ञानाचा देखील प्रकल्प माळेगाव, हातवे तांबड, आळंदी, नाटंबी आदी भागात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येतो दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे.

चारसूत्री पद्धतीने वाताला करंजी बुद्रुक, खानापूर, रावडी, जयतपाड गृहिणी, आपटी आदी अनेक गावातील शेतकरी भाताची लागवड करतात तालुक्यातील ग्रामीण भागात पाच लागवड करण्यासाठी मजुरांऐवजी यंत्राच्या मदतीने चिखलणी लागवड केली जाते यात वाढ होत आहे. यामुळे मजुरांचा खर्च कमी होतो आणी उत्पन्न अधिक मिळत असल्यामुळे यंत्राचा वापर वाढला आहे. तालुक्यात पश्चिम भागात भाताची पेरणी पूर्ण होत आली असून पूर्व भागातील शेतकरी पेरणीला सुरुवात करत आहेत.