शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कालव्यात शेतकरी गेला वाहून

By admin | Updated: December 12, 2015 00:46 IST

नेरे येथील धोमबलकवडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात म्हैस वाचविण्यास गेलेला शेतकरी वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता; मात्र ते सापडले नाहीत.

भोर : नेरे येथील धोमबलकवडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात म्हैस वाचविण्यास गेलेला शेतकरी वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता; मात्र ते सापडले नाहीत. रामचंद्र हरिभाऊ शिंदे (वय ६५, रा. नेरे) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता घडली. आत्तापर्यंत विविध घटनांत या कालव्यात वाहून जाऊन चार जण मरण पावले आहेत, तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.याबाबतची महिती अशी की, भोर-मांढरदेवी रोडवरील नेरे गावातून धोमबलकवडी धरणाचा कालवा जातो. आज सकाळी साडेदहा वाजता गावातील रामचंद्र शिंदे आपली जनावरे चारायला घेऊन कालव्याच्या पलीकडे जात होते. या वेळी प्राथमिक शाळेजवळच्या कालव्यात एक म्हैस पाण्यात उतरली. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने म्हैस पाण्यात वाहून जाईल, या भीतीने ते पाण्यात उतरले. म्हशीला वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने शिंदे पाण्यात वाहून गेले. म्हैस पोहुण कालव्याच्या पलीकडच्या टोकाला निघाली. ही घटना नेरे ग्रामस्थांनी धोमबलकवडी धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना सांगून कालव्याचे पाणी बंद करण्यास सांगितले; मात्र पाणी बंद न केल्याने पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने शोध मोहिमेत अडचण येत होती. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. (वार्ताहर)