शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उंडवडी कडेपठार येथील शेतकऱ्यांचा पालखी महामार्गाला विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:10 IST

आधी मागण्या पूर्ण करा उंडवडी कडेपठार: जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पालखी मार्गाला कायम विरोेध राहणार असल्याची ...

आधी मागण्या पूर्ण करा

उंडवडी कडेपठार: जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पालखी मार्गाला कायम विरोेध राहणार असल्याची भूमिका उंडवडी कडेपठार येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे.

संत तुकाराम महाराज पालखीमार्गाच्या चौपदरीकरण भूमिसंपादनासाठी सरसरी प्रतिगुंठा ४ लाख २५ हजार दर निघाला असला तरी उंडवडी कडेपठार येथील शेतकऱ्यांचे ज्यादाचे क्षेत्र भूसंपादनात गेले असून देखील गावातील शेतकऱ्यांना प्रतिगुंठा केवळ ७१ हजार ९९९ दर शासनाच्या वतीने काढल्याने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध दर्शवला आहे. या कारणास्तव मागील दोन दिवसांपूर्वी उंडवडी कडेपठार येथील शेतक-यांनी मोजणीला विरोध करून मोजणी बंद पाडली होती.

जराडवाडी येथील शेतकऱ्यांनी नोटीस मिळाल्यासून सर्व कागपत्रांची पूर्तता व पाठपुरावा केला. त्याचबरोबर यासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन वेळी शेतकऱ्यांनी भेट घेतली. त्यावेळी प्रांताधिकारी यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले होते. परंतु आज ११ महिने होऊन देखील मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी देखील मोजणी बंद पाडली होती.

उंडवडी कडेपठार गावच्या शेतकऱ्यांचे इतर गावांपेक्षा सर्वाधिक ११.९७ आर क्षेत्र भूसंपादनात गेले असून देखील त्यांना मिळालेल्या ७१ हजार ९९९ रुपये मोबदल्यापेक्षा इतर गावांना जवळपास ६ पट ज्यादा मोबदला मिळाल्यामुळे फक्त उंडवडी कडेपठार गावासाठीच असा दर का? असा प्रश्न शेतक-यांचा आहे. शेतक-यांवर झालेल्या अन्यायामुळे शेतकरी संतप्त आहेत.

संबधित शेतक-यांच्या मागण्या...

इतर गावांच्या तुलनेत उंडवडी कडेपठारच्या जमिनीचा मोबदला मिळावा. जराडवाडीतील शेतक-यांना पाटस रोड लगत असलेल्या क्षेत्रास आणि आतील बाजूस क्षेत्रास एकसमान मोबदला मिळाला. परंतु उंडवडी कडेपठारमधील शेतक-यांना पाटस रोड लगत असलेल्या क्षेत्रास आणि आतील क्षेत्रास वेगवेगळा मोबदला का? तो ही एकसमान मिळावा. भूसंपादीत झालेल्या जमिनीच्या क्षेत्रातील बांधकाम, विहिरी, बोरवेल, पाईपलाईन, फळझाडे, शेततलाव, पोल्ट्री, मंदीर तसेच इतर पंचनामे अनेकदा कळवून देखील ते पंचनामे झाले नाहीत. त्वरित हे पंचनामे करावेत. जर वरील सर्व बाबींची पूर्ण पूर्तता झाल्याशिवाय पालखी महामार्गाच्या कामास आम्हा सर्व शेतकऱ्यांचा पूर्णपणे कायम विरोध राहील, असे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.