शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

उंडवडी कडेपठार येथील शेतकऱ्यांचा पालखी महामार्गाला विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:10 IST

आधी मागण्या पूर्ण करा उंडवडी कडेपठार: जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पालखी मार्गाला कायम विरोेध राहणार असल्याची ...

आधी मागण्या पूर्ण करा

उंडवडी कडेपठार: जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पालखी मार्गाला कायम विरोेध राहणार असल्याची भूमिका उंडवडी कडेपठार येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे.

संत तुकाराम महाराज पालखीमार्गाच्या चौपदरीकरण भूमिसंपादनासाठी सरसरी प्रतिगुंठा ४ लाख २५ हजार दर निघाला असला तरी उंडवडी कडेपठार येथील शेतकऱ्यांचे ज्यादाचे क्षेत्र भूसंपादनात गेले असून देखील गावातील शेतकऱ्यांना प्रतिगुंठा केवळ ७१ हजार ९९९ दर शासनाच्या वतीने काढल्याने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध दर्शवला आहे. या कारणास्तव मागील दोन दिवसांपूर्वी उंडवडी कडेपठार येथील शेतक-यांनी मोजणीला विरोध करून मोजणी बंद पाडली होती.

जराडवाडी येथील शेतकऱ्यांनी नोटीस मिळाल्यासून सर्व कागपत्रांची पूर्तता व पाठपुरावा केला. त्याचबरोबर यासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन वेळी शेतकऱ्यांनी भेट घेतली. त्यावेळी प्रांताधिकारी यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले होते. परंतु आज ११ महिने होऊन देखील मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी देखील मोजणी बंद पाडली होती.

उंडवडी कडेपठार गावच्या शेतकऱ्यांचे इतर गावांपेक्षा सर्वाधिक ११.९७ आर क्षेत्र भूसंपादनात गेले असून देखील त्यांना मिळालेल्या ७१ हजार ९९९ रुपये मोबदल्यापेक्षा इतर गावांना जवळपास ६ पट ज्यादा मोबदला मिळाल्यामुळे फक्त उंडवडी कडेपठार गावासाठीच असा दर का? असा प्रश्न शेतक-यांचा आहे. शेतक-यांवर झालेल्या अन्यायामुळे शेतकरी संतप्त आहेत.

संबधित शेतक-यांच्या मागण्या...

इतर गावांच्या तुलनेत उंडवडी कडेपठारच्या जमिनीचा मोबदला मिळावा. जराडवाडीतील शेतक-यांना पाटस रोड लगत असलेल्या क्षेत्रास आणि आतील बाजूस क्षेत्रास एकसमान मोबदला मिळाला. परंतु उंडवडी कडेपठारमधील शेतक-यांना पाटस रोड लगत असलेल्या क्षेत्रास आणि आतील क्षेत्रास वेगवेगळा मोबदला का? तो ही एकसमान मिळावा. भूसंपादीत झालेल्या जमिनीच्या क्षेत्रातील बांधकाम, विहिरी, बोरवेल, पाईपलाईन, फळझाडे, शेततलाव, पोल्ट्री, मंदीर तसेच इतर पंचनामे अनेकदा कळवून देखील ते पंचनामे झाले नाहीत. त्वरित हे पंचनामे करावेत. जर वरील सर्व बाबींची पूर्ण पूर्तता झाल्याशिवाय पालखी महामार्गाच्या कामास आम्हा सर्व शेतकऱ्यांचा पूर्णपणे कायम विरोध राहील, असे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.