शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

उंडवडी कडेपठार येथील शेतकऱ्यांचा पालखी महामार्गाला विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:10 IST

आधी मागण्या पूर्ण करा उंडवडी कडेपठार: जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पालखी मार्गाला कायम विरोेध राहणार असल्याची ...

आधी मागण्या पूर्ण करा

उंडवडी कडेपठार: जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पालखी मार्गाला कायम विरोेध राहणार असल्याची भूमिका उंडवडी कडेपठार येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे.

संत तुकाराम महाराज पालखीमार्गाच्या चौपदरीकरण भूमिसंपादनासाठी सरसरी प्रतिगुंठा ४ लाख २५ हजार दर निघाला असला तरी उंडवडी कडेपठार येथील शेतकऱ्यांचे ज्यादाचे क्षेत्र भूसंपादनात गेले असून देखील गावातील शेतकऱ्यांना प्रतिगुंठा केवळ ७१ हजार ९९९ दर शासनाच्या वतीने काढल्याने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध दर्शवला आहे. या कारणास्तव मागील दोन दिवसांपूर्वी उंडवडी कडेपठार येथील शेतक-यांनी मोजणीला विरोध करून मोजणी बंद पाडली होती.

जराडवाडी येथील शेतकऱ्यांनी नोटीस मिळाल्यासून सर्व कागपत्रांची पूर्तता व पाठपुरावा केला. त्याचबरोबर यासंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन वेळी शेतकऱ्यांनी भेट घेतली. त्यावेळी प्रांताधिकारी यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले होते. परंतु आज ११ महिने होऊन देखील मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी देखील मोजणी बंद पाडली होती.

उंडवडी कडेपठार गावच्या शेतकऱ्यांचे इतर गावांपेक्षा सर्वाधिक ११.९७ आर क्षेत्र भूसंपादनात गेले असून देखील त्यांना मिळालेल्या ७१ हजार ९९९ रुपये मोबदल्यापेक्षा इतर गावांना जवळपास ६ पट ज्यादा मोबदला मिळाल्यामुळे फक्त उंडवडी कडेपठार गावासाठीच असा दर का? असा प्रश्न शेतक-यांचा आहे. शेतक-यांवर झालेल्या अन्यायामुळे शेतकरी संतप्त आहेत.

संबधित शेतक-यांच्या मागण्या...

इतर गावांच्या तुलनेत उंडवडी कडेपठारच्या जमिनीचा मोबदला मिळावा. जराडवाडीतील शेतक-यांना पाटस रोड लगत असलेल्या क्षेत्रास आणि आतील बाजूस क्षेत्रास एकसमान मोबदला मिळाला. परंतु उंडवडी कडेपठारमधील शेतक-यांना पाटस रोड लगत असलेल्या क्षेत्रास आणि आतील क्षेत्रास वेगवेगळा मोबदला का? तो ही एकसमान मिळावा. भूसंपादीत झालेल्या जमिनीच्या क्षेत्रातील बांधकाम, विहिरी, बोरवेल, पाईपलाईन, फळझाडे, शेततलाव, पोल्ट्री, मंदीर तसेच इतर पंचनामे अनेकदा कळवून देखील ते पंचनामे झाले नाहीत. त्वरित हे पंचनामे करावेत. जर वरील सर्व बाबींची पूर्ण पूर्तता झाल्याशिवाय पालखी महामार्गाच्या कामास आम्हा सर्व शेतकऱ्यांचा पूर्णपणे कायम विरोध राहील, असे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.