शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

खरीपातील पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना अजून नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यामुळे विम्याची मागणी केलेल्या शेतकऱ्यांची मागणी वेगवेगळी कारणे देऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यामुळे विम्याची मागणी केलेल्या शेतकऱ्यांची मागणी वेगवेगळी कारणे देऊन नाकारण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे. जिल्ह्यातील २८ हजार शेतकऱ्यांनी विम्याचे हप्ते जमा केले होते. त्यातील ३ हजार ७८२ शेतकऱ्यांनी विमा मिळावा अशी मागणी केली होती, मात्र वेळेत म्हणजे ७२ तासात ऑनलाईन मागणी केली नाही म्हणून त्यांच्यातील अनेकांची मागणीच विमा कंपनीने नाकारली असल्याची माहिती मिळाली.

जिल्ह्यात तब्बल १ हजार ६७६ शेतकऱ्यांचा विमा थेट नाकारण्यात आला आहे. उर्वरित २०१०६ शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी पात्र समजण्यात आले. त्यापैकी २ हजार १४ जणांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वगैरे तयार झाले आहेत, मात्र त्यांना अद्याप विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. ९२ शेतकऱ्यांचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत.

संरक्षित रकमेच्या साधारण ७० टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळते, मात्र त्यासाठी विमा कंपनीने दिलेले सर्व निकष पार पाडावे लागतात. कंपन्यांच्या नकारघंटेचा फटका १ हजार ६७६ शेतकऱ्यांना बसला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसानीनंतर लगेचच ऑनलाईन तक्रार दाखल करणे शक्य होत नाही. मात्र विमा कंपनीबरोबर करार करताना त्यात याच कलमाचा प्रामुख्याने उल्लेख असल्याने त्याचाच आधार घेत विम्याची मागणी नाकारल्याचे दिसते.

चौकट

सर्व तक्रारींचे निराकरण होईल.

विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबर याच संदर्भात पुढील आठवड्यात बैठक आयोजित केली आहे. त्यात सर्व प्रकारच्या तक्रारींचे निराकरण केले जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. या बैठकीला कृषी विभागाचे अधिकारीही उपस्थित असतील. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा आढावा घेण्यात येईल.

राजेश देशमुख, जिल्हाधिकारी