शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

उजनीच्या पाण्यासाठी सरडेवाडीतील शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST

वाटेल ती किंमत मोजू; परंतु पंधरा दिवसांत इंदापूर तालुक्याला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका सध्या इंदापूर तालुक्यातील शेतकरी ...

वाटेल ती किंमत मोजू; परंतु पंधरा दिवसांत इंदापूर तालुक्याला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका सध्या इंदापूर तालुक्यातील शेतकरी संघर्ष कृती समितीने घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातून इंदापूरच्या पाच टीएमसी पाण्याला विरोध झाला. त्यामुळे शासनाला पाणी वाटपाचा आदेश रद्द करावा लागला. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा. कारण इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न मिटणार आहे. उजनी धरण होताना इंदापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या हजारो एकर शेतजमिनींचा त्याग केलेला आहे. पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात फिरकू न देण्याची भाषा सोलापुरातील काही नेतेमंडळी करत आहेत. तसे घडल्यास इंदापूर तालुक्यातील शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील एकाही नेत्याची गाडी भीमानगर पुलाच्या अलीकडे येऊ न देता, जशास तसे उत्तर दिले जाईल, असे इंदापूर तालुका शेतकरी संघर्ष कृती समितीकडून सूचित करण्यात आल्याने पाणीप्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

————————————————————

उजनीतील पाच टीएमसी पाणी निर्णयाचा फेरविचार व्हावा, यासाठी सरडेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करताना शेतकरी.

२७०५२०२१-बारामती-१५

————————————————