शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
3
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
4
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
5
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
6
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
7
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
8
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
9
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
10
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
11
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
12
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
13
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
14
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
15
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
16
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
17
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

शेतकऱ्यांचे सशक्तीकरण गरजेचे

By admin | Updated: October 1, 2015 01:08 IST

शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले आहे. त्यातून निराश झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. अशा वेळी त्यांचे मानसिक सशक्तीकरण करणे गरजेचे आहे,

पुणे : शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले आहे. त्यातून निराश झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. अशा वेळी त्यांचे मानसिक सशक्तीकरण करणे गरजेचे आहे, असे मत ब्रह्माकुमारी नलिनी दीदी यांनी व्यक्त केले.प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाद्वारे ‘अखिल भारतीय किसान सशक्तीकरण अभियान’ या कार्यक्रमाचे आयोजन धायरी गाव येथे करण्यात आले होते. त्या वेळी नलिनी दीदी बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे, ब्रह्माकुमार दशरथ भाई, सरपंच नितीन दुधाने, अंकुश बगाटे, नांदेड सिटीचे संचालक प्रल्हाद जाधव आदी उपस्थित होते.नलिनी दीदी म्हणाल्या, की आज मॅन पॉवर, मनी पॉवर मटेरियल पॉवर आहे. पण त्याचबरोबर मेंटल पॉवरची आवश्यक आहे. तिचे बीजारोपण यौगीक शेतीच्या कार्यामध्ये केल्याने भारतभूमी सुजलाम सुफलाम होईल.दशरथ भाई म्हणाले, की या अभियानाचे उद्घाटन १३ सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहनसिंंग यांच्या हस्ते दिल्ली येथे झाले असून, संपूर्ण देशभरात १३० अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, यौगीक शेती यावर मार्गदर्शन करणार आहे. हे अभियान पुणे ते जेजुरी असे असून, यामध्ये पुणे, सातारा, वाई-फलटण अशी १२१ गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात येणार असून, ते २ नोव्हेंबरला जेजुरीला समाप्त होणार आहे. या वेळी विनयकुमार आवटे, डॉ. रजपूत, नवनाथ कोळपकर, नितीन दुधाने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ब्रह्माकुमारी सुलभा बहन यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)