शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शेतकऱ्यांचे सशक्तीकरण गरजेचे

By admin | Updated: October 1, 2015 01:08 IST

शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले आहे. त्यातून निराश झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. अशा वेळी त्यांचे मानसिक सशक्तीकरण करणे गरजेचे आहे,

पुणे : शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले आहे. त्यातून निराश झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. अशा वेळी त्यांचे मानसिक सशक्तीकरण करणे गरजेचे आहे, असे मत ब्रह्माकुमारी नलिनी दीदी यांनी व्यक्त केले.प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाद्वारे ‘अखिल भारतीय किसान सशक्तीकरण अभियान’ या कार्यक्रमाचे आयोजन धायरी गाव येथे करण्यात आले होते. त्या वेळी नलिनी दीदी बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे, ब्रह्माकुमार दशरथ भाई, सरपंच नितीन दुधाने, अंकुश बगाटे, नांदेड सिटीचे संचालक प्रल्हाद जाधव आदी उपस्थित होते.नलिनी दीदी म्हणाल्या, की आज मॅन पॉवर, मनी पॉवर मटेरियल पॉवर आहे. पण त्याचबरोबर मेंटल पॉवरची आवश्यक आहे. तिचे बीजारोपण यौगीक शेतीच्या कार्यामध्ये केल्याने भारतभूमी सुजलाम सुफलाम होईल.दशरथ भाई म्हणाले, की या अभियानाचे उद्घाटन १३ सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहनसिंंग यांच्या हस्ते दिल्ली येथे झाले असून, संपूर्ण देशभरात १३० अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, यौगीक शेती यावर मार्गदर्शन करणार आहे. हे अभियान पुणे ते जेजुरी असे असून, यामध्ये पुणे, सातारा, वाई-फलटण अशी १२१ गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात येणार असून, ते २ नोव्हेंबरला जेजुरीला समाप्त होणार आहे. या वेळी विनयकुमार आवटे, डॉ. रजपूत, नवनाथ कोळपकर, नितीन दुधाने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ब्रह्माकुमारी सुलभा बहन यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)