शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील शेतकरी आंदोलन मागे घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताकदिनी झालेला हिंसाचार देशाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे. किमान आता तरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताकदिनी झालेला हिंसाचार देशाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे. किमान आता तरी शेतकरी संघटनांना आंदोलन मागे घेत सरकारबरोबर चर्चा करावी, असे आवाहन भारतीय किसान संघाचे राज्य अध्यक्ष बळीराम सोळंके यांनी केले.

दिल्लीत शेतकऱ्यांना आंदोलनाला प्रवृत्त करून काही राजकीय शक्ती लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी पार्श्वभूमी तयार करत आहेत. अशा शक्तींनी लाल किल्ल्यावरील तिरंग्याचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला. यातून देशाच्या स्वाभिमानालाच धक्का लागला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी या सर्व प्रकाराचा तपास करावा आणि दोषींना माफी देऊ नये अशी मागणी किसान संघ करणार असल्याचे सोळंके यांनी सांगितले.

ते म्हणाले की, किसान संघही सुरुवातीपासून शेतीविधेयकातील किमान चार मुद्द्यांच्या विरोधात आहे, मात्र आपण आपल्याच देशातील नागरिकांनी निवडून दिलेल्या आपल्याच सरकारला विरोध करतो आहोत, याचे भान किसान संघाने सुटू दिले नाही. दिल्लीतील शेतकरी संघटनांची कृती परक्या सरकारबरोबर भांडत असल्याप्रमाणे आहे. इतक्या बैठका होऊनही तोडगा निघत नसेल तर त्यात या संघटनांचेच चुकते आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यामुळे सरकारनेही ताठर भूमिका घेतली असेल तर ते गैर नाही.

किसान संघाचा विरोध आहे तर मग संघ काय करत आहे असे विचारले असता सोळंके म्हणाले की, आम्ही आमचे म्हणणे सरकारपर्यंत सनदशीर मार्गाने पोहोचवले आहे. शेतकऱ्यांचे लेखी प्रस्ताव केंद्र सरकारला दिले. सरकारची भूमिका चर्चेची आहे. आमची वाट पाहण्याची तयारी आहे. आंदोलन करण्यासारखी ही गोष्ट नाही, असे सोळंके यांनी सांगितले.