शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

दिल्लीतील शेतकरी आंदोलन मागे घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताकदिनी झालेला हिंसाचार देशाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे. किमान आता तरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताकदिनी झालेला हिंसाचार देशाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे. किमान आता तरी शेतकरी संघटनांना आंदोलन मागे घेत सरकारबरोबर चर्चा करावी, असे आवाहन भारतीय किसान संघाचे राज्य अध्यक्ष बळीराम सोळंके यांनी केले.

दिल्लीत शेतकऱ्यांना आंदोलनाला प्रवृत्त करून काही राजकीय शक्ती लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी पार्श्वभूमी तयार करत आहेत. अशा शक्तींनी लाल किल्ल्यावरील तिरंग्याचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला. यातून देशाच्या स्वाभिमानालाच धक्का लागला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी या सर्व प्रकाराचा तपास करावा आणि दोषींना माफी देऊ नये अशी मागणी किसान संघ करणार असल्याचे सोळंके यांनी सांगितले.

ते म्हणाले की, किसान संघही सुरुवातीपासून शेतीविधेयकातील किमान चार मुद्द्यांच्या विरोधात आहे, मात्र आपण आपल्याच देशातील नागरिकांनी निवडून दिलेल्या आपल्याच सरकारला विरोध करतो आहोत, याचे भान किसान संघाने सुटू दिले नाही. दिल्लीतील शेतकरी संघटनांची कृती परक्या सरकारबरोबर भांडत असल्याप्रमाणे आहे. इतक्या बैठका होऊनही तोडगा निघत नसेल तर त्यात या संघटनांचेच चुकते आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यामुळे सरकारनेही ताठर भूमिका घेतली असेल तर ते गैर नाही.

किसान संघाचा विरोध आहे तर मग संघ काय करत आहे असे विचारले असता सोळंके म्हणाले की, आम्ही आमचे म्हणणे सरकारपर्यंत सनदशीर मार्गाने पोहोचवले आहे. शेतकऱ्यांचे लेखी प्रस्ताव केंद्र सरकारला दिले. सरकारची भूमिका चर्चेची आहे. आमची वाट पाहण्याची तयारी आहे. आंदोलन करण्यासारखी ही गोष्ट नाही, असे सोळंके यांनी सांगितले.