शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

By admin | Updated: July 9, 2016 03:46 IST

महिना कोरडा गेल्याने फक्त ४.३७ टक्के झालेल्या खरीप हंगामाच्या पेरण्यांनी आता वेग घेतला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्या २० टक्केंवर गेल्या आहेत.

पुणे - महिना कोरडा गेल्याने फक्त ४.३७ टक्के झालेल्या खरीप हंगामाच्या पेरण्यांनी आता वेग घेतला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्या २० टक्केंवर गेल्या आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी या हंगामात सोयाबीन लागवडीला पसंती दिल्याचे दिसते. आतापर्यंत ३४८ टक्के लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या साप्ताहिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. जून महिन्यात ८१.३६ मिमी पाऊस झाल्याने पेरण्या रखडल्या होत्या. खरिपाच्या पेरण्या होतात की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ४.३७ टक्के इतक्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यात सर्वाधिक सोयाबीनच्या ३३.६, मुगाच्या ३२.४, मका १५.७, बाजरी १०.६, भात ४.८, ज्वारी २.९,उडीद ९३.०, भुईमूग ३.६ टक्केइतक्याच पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जुलै महिना पाऊस घेऊन आला. जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. पहिल्याच आठवड्यात १६५.११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत ३५ लाख ५१ हजार ५० हेक्टरपैैकी ७० हजार ११० हेक्टरवर म्हणजे २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ हजार ५०० हेक्टर अपेक्षित असताना ८ हजार ७०० हेक्टरवर म्हणजे ३४८ टक्के पेरणी झाली आहे. त्यानंतर उडीद ७२, मका ६४ व मूग ६१ टक्के पेरण्या झाल्या आहेत, तर सर्वात कमी खरीप ज्वारी व रागी ४ टक्के इतक्याच पेरण्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)