शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

By admin | Updated: July 9, 2016 03:46 IST

महिना कोरडा गेल्याने फक्त ४.३७ टक्के झालेल्या खरीप हंगामाच्या पेरण्यांनी आता वेग घेतला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्या २० टक्केंवर गेल्या आहेत.

पुणे - महिना कोरडा गेल्याने फक्त ४.३७ टक्के झालेल्या खरीप हंगामाच्या पेरण्यांनी आता वेग घेतला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्या २० टक्केंवर गेल्या आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी या हंगामात सोयाबीन लागवडीला पसंती दिल्याचे दिसते. आतापर्यंत ३४८ टक्के लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या साप्ताहिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. जून महिन्यात ८१.३६ मिमी पाऊस झाल्याने पेरण्या रखडल्या होत्या. खरिपाच्या पेरण्या होतात की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ४.३७ टक्के इतक्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यात सर्वाधिक सोयाबीनच्या ३३.६, मुगाच्या ३२.४, मका १५.७, बाजरी १०.६, भात ४.८, ज्वारी २.९,उडीद ९३.०, भुईमूग ३.६ टक्केइतक्याच पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जुलै महिना पाऊस घेऊन आला. जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. पहिल्याच आठवड्यात १६५.११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत ३५ लाख ५१ हजार ५० हेक्टरपैैकी ७० हजार ११० हेक्टरवर म्हणजे २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ हजार ५०० हेक्टर अपेक्षित असताना ८ हजार ७०० हेक्टरवर म्हणजे ३४८ टक्के पेरणी झाली आहे. त्यानंतर उडीद ७२, मका ६४ व मूग ६१ टक्के पेरण्या झाल्या आहेत, तर सर्वात कमी खरीप ज्वारी व रागी ४ टक्के इतक्याच पेरण्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)