शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

By admin | Updated: July 9, 2016 03:46 IST

महिना कोरडा गेल्याने फक्त ४.३७ टक्के झालेल्या खरीप हंगामाच्या पेरण्यांनी आता वेग घेतला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्या २० टक्केंवर गेल्या आहेत.

पुणे - महिना कोरडा गेल्याने फक्त ४.३७ टक्के झालेल्या खरीप हंगामाच्या पेरण्यांनी आता वेग घेतला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्या २० टक्केंवर गेल्या आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी या हंगामात सोयाबीन लागवडीला पसंती दिल्याचे दिसते. आतापर्यंत ३४८ टक्के लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या साप्ताहिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. जून महिन्यात ८१.३६ मिमी पाऊस झाल्याने पेरण्या रखडल्या होत्या. खरिपाच्या पेरण्या होतात की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ४.३७ टक्के इतक्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यात सर्वाधिक सोयाबीनच्या ३३.६, मुगाच्या ३२.४, मका १५.७, बाजरी १०.६, भात ४.८, ज्वारी २.९,उडीद ९३.०, भुईमूग ३.६ टक्केइतक्याच पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जुलै महिना पाऊस घेऊन आला. जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. पहिल्याच आठवड्यात १६५.११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत ३५ लाख ५१ हजार ५० हेक्टरपैैकी ७० हजार ११० हेक्टरवर म्हणजे २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ हजार ५०० हेक्टर अपेक्षित असताना ८ हजार ७०० हेक्टरवर म्हणजे ३४८ टक्के पेरणी झाली आहे. त्यानंतर उडीद ७२, मका ६४ व मूग ६१ टक्के पेरण्या झाल्या आहेत, तर सर्वात कमी खरीप ज्वारी व रागी ४ टक्के इतक्याच पेरण्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)