शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

इंदापुरातील शेतकरी राज्यमंत्री भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:10 IST

इंदापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाकडी निंबोडी योजनेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. ...

इंदापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाकडी निंबोडी योजनेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. शासनाचा मोठा निधी दिला. मात्र विरोधकांच्या पोटात राजकीय गोळा आला आणि त्यांनी ही योजना हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सोशल मीडिया प्रमुख हामा पाटील यांनी केले.

इंदापूर तालुक्यातील कौठळी गावामध्ये शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने सोलापूरकरांचा जाहीर निषेध करून शनिवार (दि.२२) रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध केला. त्याचबरोबर 'कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाही' अशा घोषणा दिल्या.

यावेळी माणिक महाराज मारकड, माजी पोलीस पाटील रामभाऊ पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष हामा पाटील, उपसरपंच सुनील खामगळ, वसंत मारकड, हिरामण मारकड, अनिल पवार, नामदेव पाटील, अण्णा काळेल, संदीपान मारकड, अशोक राऊत, राजू पिसाळ, सोमनाथ पाटोळे, संदीप चितारे, महादेव मोरे, बापू खामगळ, भारत यमगर, अविनाश मारकड, जिगर मारकड, आरीफ पठाण, दीपक माने, अमर जाधव, हृषीकेश मारकड, सागर पाटोळे, रमेश पाटोळे, अमित पाटील, अंकुश चितारे, पांडुरंग यमगर, नामदेव खामगळ, अभिजित खामगळ, शिवाजी खामगळ व अनेक शेतकरी उपस्थित होते.

हामा पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्हा पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला पाच टिएमसी पाणी दिल्यानंतर, सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी विरोध करून सरकारवर दबाब टाकून निर्णय रद्द करण्याचा तगादा लावला. त्यामुळे आम्ही कौठळी गावातील शेतकरी सोलापूरच्या राजकीय लोकांचा जाहीर निषेध करतो.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठिशी तालुक्यातील शेतकरी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर आमच्या हक्काचे पाणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणार. तसेच हक्काच्या पाण्यासाठी कायम लढा देणार असल्याचा शेतकऱ्यांनी निर्धार केला.

२२ इंदापूर

इंदापूर तालुक्यातील कौठळी गावात आंदोलन करताना शेतकरी व कृती समितीचे पदाधिकारी.