शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

हिवरे येथील शेतकऱ्यांचा रेल्वे प्रकल्पाला तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST

खोडद : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...

खोडद : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असून, सुमारे ९९ शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे. दरम्यान, हिवरे हद्दीत रेल्वे प्रकल्पासाठी चालू असलेले सर्वेक्षणाचे कामदेखील शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे.

याबाबत माहिती अशी की, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प हिवरे गाव व परिसरातून जात आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.या प्रकल्पासाठी सुमारे २५ हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात येणार आहे. मात्र याबाबत शेतकऱ्यांना कुठलीही नोटीस बजावण्यात आलेली नाही.

दरम्यान, हिवरे गावातील सुमारे ९९ शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी विरोध केला असून, याबाबत त्यांनी हरकतीचे निवेदन प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर यांना दिले आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी आमच्या शेतजमिनी घेऊन आम्हांला भूमिहीन करू नका, अशी आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी संजय भोर, अवधूत बारवे, विलास खोकराळे, सुभाष खोकराळे, शिवदास खोकराळे, सुरेश शिंदे, संतोष खोकराळे, विशाल भोर यांच्यासह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिवरे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना पुनर्वसनाचे शेरे असून, त्या पुनर्वसनासाठी राखीव ठेवल्या आहेत. यामुळे आधीच अनेकांचे क्षेत्र कमी झालेले आहे. त्यात हा प्रकल्प येथून गेल्यास शेतकरी अधिक अल्पभूधारक होणार आहेत. हिवरे परिसरातील शेतजमिनी बारमाही बागायती आहेत. द्राक्ष, ऊस,टोमॅटो,पपई, सीताफळ,डाळिंब,भाजीपाला अशी नगदी पिके घेतली जातात. हिवरे परिसरातील अनेक शेतकरी हे नोकरीला नसल्याने त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच आहे.

या परिसरातून जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पामुळे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते भूमिहीन होणार आहेत. तर काही शेतकरी अल्पभूधारक होणार आहेत.तसेच या प्रकल्पामुळे प्रामुख्याने येथील शेतीचे असंख्य तुकडे होणार आहेत.या परिसरातील शेतकऱ्यांची शेती वरच उपजीविका आहे आणि शेती हेच उपजीविकेचे एकमेव साधन आहे.अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँकांचे कर्ज देखील घेतलेली आहेत.अनेक शेतकऱ्यांना अत्यंत कमी शेत जमीन आहे.येथून जाणाऱ्या रेल्वेमुळे येथील शेतकरी हे उघडे होणार आहेत, म्हणून येथील शेतकऱ्यांचा या रेल्वेप्रकल्पाला तीव्र विरोध आहे

हिवरे तर्फे नारायणगाव येथून जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असून याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर यांना दिले.