शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

हिवरे येथील शेतकऱ्यांचा रेल्वे प्रकल्पाला तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST

खोडद : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...

खोडद : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असून, सुमारे ९९ शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे. दरम्यान, हिवरे हद्दीत रेल्वे प्रकल्पासाठी चालू असलेले सर्वेक्षणाचे कामदेखील शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे.

याबाबत माहिती अशी की, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प हिवरे गाव व परिसरातून जात आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.या प्रकल्पासाठी सुमारे २५ हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात येणार आहे. मात्र याबाबत शेतकऱ्यांना कुठलीही नोटीस बजावण्यात आलेली नाही.

दरम्यान, हिवरे गावातील सुमारे ९९ शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी विरोध केला असून, याबाबत त्यांनी हरकतीचे निवेदन प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर यांना दिले आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी आमच्या शेतजमिनी घेऊन आम्हांला भूमिहीन करू नका, अशी आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी संजय भोर, अवधूत बारवे, विलास खोकराळे, सुभाष खोकराळे, शिवदास खोकराळे, सुरेश शिंदे, संतोष खोकराळे, विशाल भोर यांच्यासह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिवरे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना पुनर्वसनाचे शेरे असून, त्या पुनर्वसनासाठी राखीव ठेवल्या आहेत. यामुळे आधीच अनेकांचे क्षेत्र कमी झालेले आहे. त्यात हा प्रकल्प येथून गेल्यास शेतकरी अधिक अल्पभूधारक होणार आहेत. हिवरे परिसरातील शेतजमिनी बारमाही बागायती आहेत. द्राक्ष, ऊस,टोमॅटो,पपई, सीताफळ,डाळिंब,भाजीपाला अशी नगदी पिके घेतली जातात. हिवरे परिसरातील अनेक शेतकरी हे नोकरीला नसल्याने त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच आहे.

या परिसरातून जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पामुळे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते भूमिहीन होणार आहेत. तर काही शेतकरी अल्पभूधारक होणार आहेत.तसेच या प्रकल्पामुळे प्रामुख्याने येथील शेतीचे असंख्य तुकडे होणार आहेत.या परिसरातील शेतकऱ्यांची शेती वरच उपजीविका आहे आणि शेती हेच उपजीविकेचे एकमेव साधन आहे.अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँकांचे कर्ज देखील घेतलेली आहेत.अनेक शेतकऱ्यांना अत्यंत कमी शेत जमीन आहे.येथून जाणाऱ्या रेल्वेमुळे येथील शेतकरी हे उघडे होणार आहेत, म्हणून येथील शेतकऱ्यांचा या रेल्वेप्रकल्पाला तीव्र विरोध आहे

हिवरे तर्फे नारायणगाव येथून जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असून याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर यांना दिले.