शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:10 IST

मंचर:वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे. विशेषत: श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथील महावितरण कंपनीच्या सब स्टेशनची दुरुस्ती ...

मंचर:वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे. विशेषत: श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथील महावितरण कंपनीच्या सब स्टेशनची दुरुस्ती झाली नसल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित केला जातो. परिणामी, शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता येत नाही. इतर व्यवसायावर परिणाम झाला आहे. वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा साकोरे गावचे सरपंच अशोक मोढवे यांनी दिला आहे.

श्रीक्षेत्र वडगाव काशिबेंग येथे महावितरण कंपनीचे ३३/११ केव्हीचे सबस्टेशन आहे.येथे २०१७ मध्ये नवीन ५ एमव्हीचा ट्रान्सफारमर बसविला गेला. त्यावर परिसरातील साकोरे, सुलतानपुर,वाळुंजवाडी हे तीन ११ केंव्ही फिडर काढले गेले. परतुं ४ वर्षांत अधिकाऱ्यांनी यातील १ सुध्दा फिडर चालू केला नाही. दरमहा सबस्टेशन देखभाल दुरुस्तीसाठी निधी मिळाला जातो. पण एवढे मोठे काम होऊन सुद्धा अधिकाऱ्यांच्या हालगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना सतत वीजटंचाईचा सामना करावा लागतो. दिवसातील ८ तासातून १ तास सुध्दा शेतकऱ्यांना वीज मिळत नसेल तर महावितरण विरोधात आंदोलन करण्याचा इशारा साकोरे, सुलतानपुर,वाळुंजवाडी,वडगाव काशिबेंग,चिंचोडी देशपांडे कोळवाडी,चास येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या मोर्चाचे नियोजन करून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवुन आंदोलन केले जाईल असा इशारा साकोरे गावचे सरपंच अशोक मोढवे यांनी दिला आहे.

विजेअभावी ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी अवस्था शेतकऱ्यांची महावितरण कंपनीने केली आहे.दिवसातून क्षुल्लक कारणासाठी अनेक वेळा वीजपुरवठा बंद केला जातो. साधा एलटी लाईनचा जंप जोडायचा असेल तरी सुद्धा पुरवठा बंद केला जातो.वडगाव काशिंबेग येथील सबस्टेशनमधील अनेक पार्ट जळाल्यामुळे ३३ केव्हीएचा इन्कमर सप्लाय बंद केला जातो व ब्रेकरचे सर्व पार्ट जळाल्यामुळे व योग्य त्या प्रकारे शेती फिडर,गावठाण फिडर वेगळे नसल्यामुळे विजेचा दाब कमी जास्त होऊन अनेकांची घरची उपकरणे,विहिरीवरील मोटारपंप जळतात.हे सर्व महावितरण कंपनीचे अधिकारी व कामातील त्रुटी यामुळे घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.