शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

महावितरण, पाणीपुरवठा खात्यांबाबत शेतकऱ्यांत नाराजी

By admin | Updated: June 26, 2017 03:39 IST

वेल्हे तालुक्यात महावितरणकडून शेतकऱ्यांना व सामान्य व्यक्तींना योग्य सेवा मिळत नाही तर या वर्षीच्या पाणीटंचाईकाळात

लोकमत न्यूज नेटवर्कमार्गासनी : वेल्हे तालुक्यात महावितरणकडून शेतकऱ्यांना व सामान्य व्यक्तींना योग्य सेवा मिळत नाही तर या वर्षीच्या पाणीटंचाईकाळात वेल्ह्यात एकच टँकर चालू आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खात्यांबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी नाराजी व्यक्त केली.वेल्हे तहसील कार्यालयात शुक्रवारी (दि. २३) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी मनोज जाधव, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, अमोल नलावडे, सभापती सीमा राऊत, उपसभापती दिनकर सरपाले, पंचायत समिती सदस्या संगीता जेधे, राजगडच्या संचालिका शोभाताई जाधव, नाना राऊत, चंद्रकांत शेंडकर, संदीप नगिने आदींसह सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. आमदार थोपटे यांनी सर्व खातेप्रमुखांकडून संबंधित खात्याची माहिती घेतली. लोकप्रतिनिधीकडून अडचणी जाणून घेतल्या. यामध्ये महावितरणकडून शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला योग्य सेवा मिळत नसल्याची माहिती मिळताच आमदारांनी नाराजी व्यक्त केली. या वर्षी पाणीटंचाईकाळात एकच टँकर सुरू असल्याने जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला. आगामी काळात योग्य नियोजन करावे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. वेल्हे तालुक्यातील शिक्षण विभागाबाबात बोलताना आमदारांनी शाळेंवर तोंडी आदेशानुसार असलेल्या शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणीच काम करावे, अशा सूचना प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुनील मुगळे यांना दिल्या.परिवहन विभागास मुक्कामी गाड्या व हारपुड गाडी पुन्हा सुरू करावी. पानशेतला पास केंद्र सुरू करण्याची सूचना दिली. गुंजवणी धरणाचे काम शंभर टक्के झाले असले तरी पुनर्वसनाबाबत १०० टक्के झाले नाही. दोन नंबर गावठाणाला नागरी सुविधा लवकर देण्याच्या सूचना दिल्या. पोलीस ठाणे, पशुसंर्वधन, जिल्हा परिषद बांधकाम, आयटीआय, भूमीअभिलेख, वनखाते, दुय्यम निबंधक, कृषी विभाग, पीडीसीसी बँक, ग्रामीण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र या विभागांचा आढावा घेण्यात आला. या बहुतेक खात्यांमध्ये कर्मचारीसंख्या कमी असल्याने याचा परिणाम सेवांवर होत असून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर कर्मचारी आल्याशिवाय कोणत्याही खात्याने कर्मचारी सोडू नये, अशा सूचना आमदारांनी या वेळी दिल्या.