शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण, पाणीपुरवठा खात्यांबाबत शेतकऱ्यांत नाराजी

By admin | Updated: June 26, 2017 03:39 IST

वेल्हे तालुक्यात महावितरणकडून शेतकऱ्यांना व सामान्य व्यक्तींना योग्य सेवा मिळत नाही तर या वर्षीच्या पाणीटंचाईकाळात

लोकमत न्यूज नेटवर्कमार्गासनी : वेल्हे तालुक्यात महावितरणकडून शेतकऱ्यांना व सामान्य व्यक्तींना योग्य सेवा मिळत नाही तर या वर्षीच्या पाणीटंचाईकाळात वेल्ह्यात एकच टँकर चालू आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खात्यांबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी नाराजी व्यक्त केली.वेल्हे तहसील कार्यालयात शुक्रवारी (दि. २३) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी मनोज जाधव, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, अमोल नलावडे, सभापती सीमा राऊत, उपसभापती दिनकर सरपाले, पंचायत समिती सदस्या संगीता जेधे, राजगडच्या संचालिका शोभाताई जाधव, नाना राऊत, चंद्रकांत शेंडकर, संदीप नगिने आदींसह सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. आमदार थोपटे यांनी सर्व खातेप्रमुखांकडून संबंधित खात्याची माहिती घेतली. लोकप्रतिनिधीकडून अडचणी जाणून घेतल्या. यामध्ये महावितरणकडून शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला योग्य सेवा मिळत नसल्याची माहिती मिळताच आमदारांनी नाराजी व्यक्त केली. या वर्षी पाणीटंचाईकाळात एकच टँकर सुरू असल्याने जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला. आगामी काळात योग्य नियोजन करावे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. वेल्हे तालुक्यातील शिक्षण विभागाबाबात बोलताना आमदारांनी शाळेंवर तोंडी आदेशानुसार असलेल्या शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणीच काम करावे, अशा सूचना प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुनील मुगळे यांना दिल्या.परिवहन विभागास मुक्कामी गाड्या व हारपुड गाडी पुन्हा सुरू करावी. पानशेतला पास केंद्र सुरू करण्याची सूचना दिली. गुंजवणी धरणाचे काम शंभर टक्के झाले असले तरी पुनर्वसनाबाबत १०० टक्के झाले नाही. दोन नंबर गावठाणाला नागरी सुविधा लवकर देण्याच्या सूचना दिल्या. पोलीस ठाणे, पशुसंर्वधन, जिल्हा परिषद बांधकाम, आयटीआय, भूमीअभिलेख, वनखाते, दुय्यम निबंधक, कृषी विभाग, पीडीसीसी बँक, ग्रामीण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र या विभागांचा आढावा घेण्यात आला. या बहुतेक खात्यांमध्ये कर्मचारीसंख्या कमी असल्याने याचा परिणाम सेवांवर होत असून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर कर्मचारी आल्याशिवाय कोणत्याही खात्याने कर्मचारी सोडू नये, अशा सूचना आमदारांनी या वेळी दिल्या.