शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

महावितरणविरोधात शेतक-यांचा असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 06:40 IST

येत्या दोन दिवसांत शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर तालुक्यातील महावितरण कंपनीच्या अधिकाºयांना खुर्चीवर बसू दिले जाणार नाही.

इंदापूर : येत्या दोन दिवसांत शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर तालुक्यातील महावितरण कंपनीच्या अधिकाºयांना खुर्चीवर बसू दिले जाणार नाही. वीज केंद्रांना कुलपे घातली जातील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी आज (दि. २९) दिला.महावितरण कंपनीने सुरू केलेली शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम बंद करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात पंचायत समितीसमोर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्या वेळी ते बोलत होते.महारुद्र पाटील, अमोल भिसे, मधुकर भरणे, अनिल राऊत, श्रीधर बाब्रस, किसन जावळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याआधी या विषयावर त्याच ठिकाणी रास्ता रोको करताना आमदार दत्तात्रय भरणे यांना टीकेचे लक्ष्य केले होते. त्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला.महारुद्र पाटील म्हणाले, की गेल्या दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदाच्या चांगल्या पावसामुळे शेतकरी पीकपेरणीस लागला आहे. त्यांना दिलासा देण्याऐवजी शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निंदनीय प्रकार भाजप सरकारने चालवला आहे. तो बंद करावा; अन्यथा शेतकरी त्यांना दणका दिल्याशिवाय राहणार नाहीत. अमोल भिसे म्हणाले की, युती शासनाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पाळली गेली नाहीत. उलट नोटाबंदी असो, जीएसटी असो यातून लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला आहे. आता जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या धोरणाने शेतकºयांची क्रूर चेष्टा चालवलेली आहे. जर या शासनाला शेतकºयांसाठी काहीच करता येत नसेल तर त्याने सत्तेवरुन पायउतार व्हावे, असे ते म्हणाले.या वेळी अनिल राऊत, रमेश पाटील, वसंत आरडे यांची भाषणे झाली. महावितरण कंपनीचे इंदापूर विभागाचे सहायक अभियंता रघुनाथ गोफणे, तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. अशोक चोरमले, किसन जावळे, कालिदास देवकर, अरबाज शेख, सचिन चव्हाण, नाना नरुटे, साहेबराव चोपडे, आप्पा पाटील, विजय वाघमोडे व इतर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.