शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दर घसरल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी निराश

By admin | Updated: May 13, 2017 04:27 IST

राज्यातील शेतकऱ्यांस हमखास उत्पन्न मिळवून देणारे म्हणून डाळिंबाची ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ट नियोजन, कौशल्यपूर्ण

सतीश सांगळे । लोकमत न्यूज नेटवर्ककळस : राज्यातील शेतकऱ्यांस हमखास उत्पन्न मिळवून देणारे म्हणून डाळिंबाची ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ट नियोजन, कौशल्यपूर्ण व्यवस्थापन आणि निर्यातक्षम मालाच्या उत्पादनाद्वारे डाळिंब उत्पादकास मागील काही वर्षांत चांगले दिवस आले. मात्र, चालू वर्षी ऐन हंगामात डाळिंबाचे दर घसरल्याने उत्पादक निराश झाले आहेत. फेब्रुवारीत निर्यात हंगामाच्या सुरुवातीस १२० ते १४० रु. दर असणारे डाळिंब आता कांद्या-बटाट्याच्या किमतीत विकण्याची वेळ आली आहे. द्राक्षांचे पडलेले दर, आंब्याची व इतर फळांची उपलब्धता आणि खरेदीतील पडतळ पाहता स्थानिक ग्राहकाकडून डाळिंबाचा उठाव कमी होत आहे. स्थानिक बाजारपेठेत दर गुणवत्तेनुसार १५ ते ५० रुपयेवर आले आहेत. चालू वर्षी सुरुवातीस डाळिंबास अपेक्षित दर मिळाला. एप्रिल आणि मेमध्ये उन्हाच्या आणि उष्णतेच्या प्रभावाने डाळिंबाची गुणवत्ता ढासळते. इंदापूर तालुक्यातील कळस, कडबनवाडी, शेळगाव, निमगाव, रुई, न्हावी आदी भागात डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. तालुक्यात सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब लागवडीखाली आहे. मात्र, डाळिंब पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लाखोंची उलाढाल होत असते. डाळिंबाचे चांगले उत्पादन होऊन त्यास बाजारभाव मिळाल्यावर बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण असते. मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी चांगले चार पैसे मिळवून देणारे पीक नाही. शेतकऱ्याांकडे पैसा नसल्याने येथील व्यावसायिकांनाही मंदी जाणवत आहे. अशातच बँका शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीचा तगादा लावत आहेत. शेतकऱ्याला आधार देण्यासाठी काहीतरी मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मोठा खर्च करुन डाळिंबाची लागवड केली. झाडे बहर धरण्यायोग्य झाल्यावर बहर धरण्याच्या तयारीत सलग तीन वर्ष केवळ झाडे जगविण्यासाठीच खर्च करावा लागतो. शेवटी बाग काढून टाकावी लागत आहे.