शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

दर घसरल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी निराश

By admin | Updated: May 13, 2017 04:27 IST

राज्यातील शेतकऱ्यांस हमखास उत्पन्न मिळवून देणारे म्हणून डाळिंबाची ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ट नियोजन, कौशल्यपूर्ण

सतीश सांगळे । लोकमत न्यूज नेटवर्ककळस : राज्यातील शेतकऱ्यांस हमखास उत्पन्न मिळवून देणारे म्हणून डाळिंबाची ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ट नियोजन, कौशल्यपूर्ण व्यवस्थापन आणि निर्यातक्षम मालाच्या उत्पादनाद्वारे डाळिंब उत्पादकास मागील काही वर्षांत चांगले दिवस आले. मात्र, चालू वर्षी ऐन हंगामात डाळिंबाचे दर घसरल्याने उत्पादक निराश झाले आहेत. फेब्रुवारीत निर्यात हंगामाच्या सुरुवातीस १२० ते १४० रु. दर असणारे डाळिंब आता कांद्या-बटाट्याच्या किमतीत विकण्याची वेळ आली आहे. द्राक्षांचे पडलेले दर, आंब्याची व इतर फळांची उपलब्धता आणि खरेदीतील पडतळ पाहता स्थानिक ग्राहकाकडून डाळिंबाचा उठाव कमी होत आहे. स्थानिक बाजारपेठेत दर गुणवत्तेनुसार १५ ते ५० रुपयेवर आले आहेत. चालू वर्षी सुरुवातीस डाळिंबास अपेक्षित दर मिळाला. एप्रिल आणि मेमध्ये उन्हाच्या आणि उष्णतेच्या प्रभावाने डाळिंबाची गुणवत्ता ढासळते. इंदापूर तालुक्यातील कळस, कडबनवाडी, शेळगाव, निमगाव, रुई, न्हावी आदी भागात डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. तालुक्यात सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब लागवडीखाली आहे. मात्र, डाळिंब पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लाखोंची उलाढाल होत असते. डाळिंबाचे चांगले उत्पादन होऊन त्यास बाजारभाव मिळाल्यावर बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण असते. मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी चांगले चार पैसे मिळवून देणारे पीक नाही. शेतकऱ्याांकडे पैसा नसल्याने येथील व्यावसायिकांनाही मंदी जाणवत आहे. अशातच बँका शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीचा तगादा लावत आहेत. शेतकऱ्याला आधार देण्यासाठी काहीतरी मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मोठा खर्च करुन डाळिंबाची लागवड केली. झाडे बहर धरण्यायोग्य झाल्यावर बहर धरण्याच्या तयारीत सलग तीन वर्ष केवळ झाडे जगविण्यासाठीच खर्च करावा लागतो. शेवटी बाग काढून टाकावी लागत आहे.