शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दर घसरल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी निराश

By admin | Updated: May 13, 2017 04:27 IST

राज्यातील शेतकऱ्यांस हमखास उत्पन्न मिळवून देणारे म्हणून डाळिंबाची ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ट नियोजन, कौशल्यपूर्ण

सतीश सांगळे । लोकमत न्यूज नेटवर्ककळस : राज्यातील शेतकऱ्यांस हमखास उत्पन्न मिळवून देणारे म्हणून डाळिंबाची ओळख निर्माण झाली आहे. उत्कृष्ट नियोजन, कौशल्यपूर्ण व्यवस्थापन आणि निर्यातक्षम मालाच्या उत्पादनाद्वारे डाळिंब उत्पादकास मागील काही वर्षांत चांगले दिवस आले. मात्र, चालू वर्षी ऐन हंगामात डाळिंबाचे दर घसरल्याने उत्पादक निराश झाले आहेत. फेब्रुवारीत निर्यात हंगामाच्या सुरुवातीस १२० ते १४० रु. दर असणारे डाळिंब आता कांद्या-बटाट्याच्या किमतीत विकण्याची वेळ आली आहे. द्राक्षांचे पडलेले दर, आंब्याची व इतर फळांची उपलब्धता आणि खरेदीतील पडतळ पाहता स्थानिक ग्राहकाकडून डाळिंबाचा उठाव कमी होत आहे. स्थानिक बाजारपेठेत दर गुणवत्तेनुसार १५ ते ५० रुपयेवर आले आहेत. चालू वर्षी सुरुवातीस डाळिंबास अपेक्षित दर मिळाला. एप्रिल आणि मेमध्ये उन्हाच्या आणि उष्णतेच्या प्रभावाने डाळिंबाची गुणवत्ता ढासळते. इंदापूर तालुक्यातील कळस, कडबनवाडी, शेळगाव, निमगाव, रुई, न्हावी आदी भागात डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. तालुक्यात सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब लागवडीखाली आहे. मात्र, डाळिंब पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लाखोंची उलाढाल होत असते. डाळिंबाचे चांगले उत्पादन होऊन त्यास बाजारभाव मिळाल्यावर बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण असते. मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी चांगले चार पैसे मिळवून देणारे पीक नाही. शेतकऱ्याांकडे पैसा नसल्याने येथील व्यावसायिकांनाही मंदी जाणवत आहे. अशातच बँका शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीचा तगादा लावत आहेत. शेतकऱ्याला आधार देण्यासाठी काहीतरी मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मोठा खर्च करुन डाळिंबाची लागवड केली. झाडे बहर धरण्यायोग्य झाल्यावर बहर धरण्याच्या तयारीत सलग तीन वर्ष केवळ झाडे जगविण्यासाठीच खर्च करावा लागतो. शेवटी बाग काढून टाकावी लागत आहे.