शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

साडेसात कोटी रुपये परत देण्यास शेतकऱ्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:09 IST

केंद्राने दिले १४ कोटी रुपये : फक्त ६ कोटी ५८ लाखांचीच झाली वसुली पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेतून वगळलेल्या ...

केंद्राने दिले १४ कोटी रुपये : फक्त ६ कोटी ५८ लाखांचीच झाली वसुली

पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेतून वगळलेल्या जिल्ह्यातील करदात्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर केंद्र सरकारकडून १४ कोटी ६ लाख रुपये जमा केले होते. ते सर्व पैसे या करदात्या शेतकऱ्यांनी परत करावेत, असा आदेश केंद्र शासनाने काढला आहे. कारण चुकून ते पैसे वगळलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात गेले होते. मात्र, आतापर्यंत केवळ ६ कोटी ५८ लाख रुपये परत मिळाले आहेत. तब्बल ७ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये परत करण्यास करदात्या शेतकऱ्यांनी ठेंगा दाखवला आहे. उर्वरित रक्कम लवकर परत करा; अन्यथा कारवाई करू, असा इशारा पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेत पुणे जिल्ह्यातील एकूण ५ लाख ३३ हजार २०० लाभार्थी आहेत. त्यापैकी ४ लाख ८८ हजार ४७९ शेतकरी पात्र आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दर चार महिन्यांनंतर केंद्रशासन २ हजार रुपये असे वार्षिक एकूण ६ हजार रुपये जमा करत असते. या योजनेत २१ हजार १७८ करदात्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. मात्र, तरीही केंद्र शासनाकडून या शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ कोटी ६ लाख रुपये जमा करण्यात आले. ते पैसे परत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या शेतकऱ्यांना वारंवार नोटिसा काढल्या आहेत. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक करदात्या शेतकऱ्यांनी पैसे परत करण्यास ठेंगा दाखवला आहे.

----

* पीएम किसान योजनेचे एकूण लाभार्थी :- ५ लाख ३३ हजार २००

* आतापर्यंत परत आलेली एकूण रक्कम :- ६ कोटी ५८ लाख १६ हजार रुपये

* पैसे परत करा म्हणून नोटिसा पाठवलेले एकूण करदाते शेतकरी :- २१ हजार १७८

* करदात्या शेतकऱ्यांकडून पैसे परत येणे बाकी असलेली रक्कम :- ७ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये

----

४४ हजार ७२१ शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही

पुणे जिल्ह्यातील एकूण लाभार्थी ५ लाख ३३ हजार २०० शेतकऱ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ४७९ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा थेट लाभ मिळत आहे. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे ४४ हजार ७२१ शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.

----

अत्यंत अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने सन २०१८ पासून राज्यात प्रधानमंत्री किसान योजना सुरू केली आहे. कमीत कमी २ हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मानधन यामध्ये दिले जाते.

- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक

----

प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळावा, यासाठी वारंवार अर्ज भरून दिला आहे. मात्र, प्रत्येक वेळी तांत्रिक कारणाने अर्ज बाद केल्याचे संबंधित अधिकारी, कर्मचारी सांगतात. त्यामुळे या योजनेत फटका बसत आहे.

- हनुमंत नारनोर, शेतकरी

----

आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत. आमचं उत्पन्न अत्यंत तुटपुंजे आहे. आम्ही पात्र असूनही या योजनेचा लाभ मिळत नाही. जे करदाते शेतकरी आहेत, त्यांच्या खात्यावर शासन पैसे जमा करतेय. मात्र, पात्र असूनही आम्हाला वंचित ठेवते. हा कुठला न्याय आहे.

- नवनाथ कदम, शेतकरी