शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात कोटी रुपये परत देण्यास शेतकऱ्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:09 IST

केंद्राने दिले १४ कोटी रुपये : फक्त ६ कोटी ५८ लाखांचीच झाली वसुली पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेतून वगळलेल्या ...

केंद्राने दिले १४ कोटी रुपये : फक्त ६ कोटी ५८ लाखांचीच झाली वसुली

पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेतून वगळलेल्या जिल्ह्यातील करदात्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर केंद्र सरकारकडून १४ कोटी ६ लाख रुपये जमा केले होते. ते सर्व पैसे या करदात्या शेतकऱ्यांनी परत करावेत, असा आदेश केंद्र शासनाने काढला आहे. कारण चुकून ते पैसे वगळलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात गेले होते. मात्र, आतापर्यंत केवळ ६ कोटी ५८ लाख रुपये परत मिळाले आहेत. तब्बल ७ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये परत करण्यास करदात्या शेतकऱ्यांनी ठेंगा दाखवला आहे. उर्वरित रक्कम लवकर परत करा; अन्यथा कारवाई करू, असा इशारा पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेत पुणे जिल्ह्यातील एकूण ५ लाख ३३ हजार २०० लाभार्थी आहेत. त्यापैकी ४ लाख ८८ हजार ४७९ शेतकरी पात्र आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दर चार महिन्यांनंतर केंद्रशासन २ हजार रुपये असे वार्षिक एकूण ६ हजार रुपये जमा करत असते. या योजनेत २१ हजार १७८ करदात्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. मात्र, तरीही केंद्र शासनाकडून या शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ कोटी ६ लाख रुपये जमा करण्यात आले. ते पैसे परत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या शेतकऱ्यांना वारंवार नोटिसा काढल्या आहेत. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक करदात्या शेतकऱ्यांनी पैसे परत करण्यास ठेंगा दाखवला आहे.

----

* पीएम किसान योजनेचे एकूण लाभार्थी :- ५ लाख ३३ हजार २००

* आतापर्यंत परत आलेली एकूण रक्कम :- ६ कोटी ५८ लाख १६ हजार रुपये

* पैसे परत करा म्हणून नोटिसा पाठवलेले एकूण करदाते शेतकरी :- २१ हजार १७८

* करदात्या शेतकऱ्यांकडून पैसे परत येणे बाकी असलेली रक्कम :- ७ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये

----

४४ हजार ७२१ शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही

पुणे जिल्ह्यातील एकूण लाभार्थी ५ लाख ३३ हजार २०० शेतकऱ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ४७९ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा थेट लाभ मिळत आहे. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे ४४ हजार ७२१ शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.

----

अत्यंत अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने सन २०१८ पासून राज्यात प्रधानमंत्री किसान योजना सुरू केली आहे. कमीत कमी २ हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मानधन यामध्ये दिले जाते.

- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक

----

प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळावा, यासाठी वारंवार अर्ज भरून दिला आहे. मात्र, प्रत्येक वेळी तांत्रिक कारणाने अर्ज बाद केल्याचे संबंधित अधिकारी, कर्मचारी सांगतात. त्यामुळे या योजनेत फटका बसत आहे.

- हनुमंत नारनोर, शेतकरी

----

आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत. आमचं उत्पन्न अत्यंत तुटपुंजे आहे. आम्ही पात्र असूनही या योजनेचा लाभ मिळत नाही. जे करदाते शेतकरी आहेत, त्यांच्या खात्यावर शासन पैसे जमा करतेय. मात्र, पात्र असूनही आम्हाला वंचित ठेवते. हा कुठला न्याय आहे.

- नवनाथ कदम, शेतकरी