शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फारसा फायदा मिळणार नाही

By admin | Updated: July 8, 2017 02:01 IST

कर्जमाफीची खोटी आकडेवारी दाखवून राज्य शासन शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. कर्जमाफीचा फारसा फायदा शेतकऱ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : कर्जमाफीची खोटी आकडेवारी दाखवून राज्य शासन शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. कर्जमाफीचा फारसा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नसून शासनाने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकरी बचाव कृती समितीचे संस्थापक प्रभाकर बांगर यांनी केली आहे.राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. या कर्जमाफी निर्णयाची (जीआरची) होळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने आज करण्यात आली. त्या वेळी बांगर बोलत होते. या वेळी वनाजी बांगर, शिवराम पोखरकर, बाळासाहेब इंदोरे, दिनेश भालेराव, राजू बांगर, शैलेश पोखरकर, सुरेश दौंड, भाऊसाहेब पोखरकर, निवृत्ती बांगर, नीलेश बांगर, सुशांत रोडे आदींसह शेतकरी हजर होते.या वेळी बोलताना प्रभाकर बांगर म्हणाले, की राज्य सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करताना उर्वरित कर्ज शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. जर शेतकऱ्यांकडे कर्ज भरण्यासाठी पैसे असते तर त्यांनी यापूर्वीच कर्ज भरले नसते का, असा सवाल करून बांगर म्हणाले, की शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा. कृषीपंपाचे वीजबिल माफ करून २४ तास मोफत वीज द्या. ६० वयापुढील शेतकऱ्यांना पेन्शन चालू करा. तुषार सिंचन व ठिबक सिंचनासाठी १०० टक्के अनुदान द्यावे. शेतीमालावरची निर्यातबंदी कायमची हटवा, अशी मागणी बांगर यांनी केली.या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणा देत कर्जमाफीच्या जीआरची होळी केली.दुधाचे भाव ५० रुपये लिटर करा दुधाचा दर जाहीर करताना विक्रीमधून येणाऱ्या पैशातून ७० टक्के वाटा शेतकऱ्यांचा व ३० टक्के प्रोसेसिंगचा, असे सरकारने सांगितले होते. मात्र दुधाला सध्या रास्त भाव मिळत नाही. त्यासाठी दुधाचे भाव ५० रुपये लिटर करा, अशी मागणी बांगर यांनी केली. त्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य केल्याचे म्हणते मात्र किती मागण्या पूर्ण झाल्या याचे उत्तर द्या, असे आव्हान केले.