शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फारसा फायदा मिळणार नाही

By admin | Updated: July 8, 2017 02:01 IST

कर्जमाफीची खोटी आकडेवारी दाखवून राज्य शासन शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. कर्जमाफीचा फारसा फायदा शेतकऱ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : कर्जमाफीची खोटी आकडेवारी दाखवून राज्य शासन शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. कर्जमाफीचा फारसा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नसून शासनाने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकरी बचाव कृती समितीचे संस्थापक प्रभाकर बांगर यांनी केली आहे.राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. या कर्जमाफी निर्णयाची (जीआरची) होळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने आज करण्यात आली. त्या वेळी बांगर बोलत होते. या वेळी वनाजी बांगर, शिवराम पोखरकर, बाळासाहेब इंदोरे, दिनेश भालेराव, राजू बांगर, शैलेश पोखरकर, सुरेश दौंड, भाऊसाहेब पोखरकर, निवृत्ती बांगर, नीलेश बांगर, सुशांत रोडे आदींसह शेतकरी हजर होते.या वेळी बोलताना प्रभाकर बांगर म्हणाले, की राज्य सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करताना उर्वरित कर्ज शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. जर शेतकऱ्यांकडे कर्ज भरण्यासाठी पैसे असते तर त्यांनी यापूर्वीच कर्ज भरले नसते का, असा सवाल करून बांगर म्हणाले, की शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा. कृषीपंपाचे वीजबिल माफ करून २४ तास मोफत वीज द्या. ६० वयापुढील शेतकऱ्यांना पेन्शन चालू करा. तुषार सिंचन व ठिबक सिंचनासाठी १०० टक्के अनुदान द्यावे. शेतीमालावरची निर्यातबंदी कायमची हटवा, अशी मागणी बांगर यांनी केली.या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणा देत कर्जमाफीच्या जीआरची होळी केली.दुधाचे भाव ५० रुपये लिटर करा दुधाचा दर जाहीर करताना विक्रीमधून येणाऱ्या पैशातून ७० टक्के वाटा शेतकऱ्यांचा व ३० टक्के प्रोसेसिंगचा, असे सरकारने सांगितले होते. मात्र दुधाला सध्या रास्त भाव मिळत नाही. त्यासाठी दुधाचे भाव ५० रुपये लिटर करा, अशी मागणी बांगर यांनी केली. त्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य केल्याचे म्हणते मात्र किती मागण्या पूर्ण झाल्या याचे उत्तर द्या, असे आव्हान केले.