शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

पाण्यासाठी शेतकऱ्यांना मारहाण

By admin | Updated: March 30, 2017 00:14 IST

खोरवडी (ता. दौंड) येथील बंधाऱ्यांवर वडगावदरेकर (ता. दौंड) आणि कौठा (ता. श्रीगोंदा) या दोन तालुक्यांतील

देऊळगावराजे : खोरवडी (ता. दौंड) येथील बंधाऱ्यांवर वडगावदरेकर (ता. दौंड) आणि कौठा (ता. श्रीगोंदा) या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्यासाठी हाणामारी झाली. या वेळी वडगावदरेकरच्या ग्रामस्थांना मारहाण झाली. संतप्त वडगावदरेकरच्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकले. एकंदरीतच तालुक्याच्या पूर्व भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ््याच्या तोंडावर पेटला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात नेमकी काय परिस्थिती राहील, याबाबत शेतकरी धास्तावला आहे. वडगावदरेकर येथील बंधाऱ्यात पाणी पोहोचले नसल्याने येथील शेतकरी खोरवडीच्या बंधाऱ्यावर ढापे टाकून पाणी अडवले की काय, हे पाहण्यासाठी गेले होते. जर पाणी अडवले असेल तर ते पाणी वडगावदरेकरपर्यंत पोहोचू शकणार नाही. प्रत्यक्षात मात्र ढापे टाकलेले होते. काही शेतकरी ढापे काढायला लागले. कौठा (ता. श्रीगोंदा) येथील शेतकऱ्यांनी ढापे काढण्यासाठी विरोध केला. वडगावदरेकर येथील शेतकऱ्यांना कौठा येथील शेतकऱ्यांनी मारहाण केली.वडगावदरेकर येथील संतप्त शेतकऱ्यांनी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी दौंड पाटबंधारे कार्यालयात गेले होते, मात्र पाटबंधारे कार्यालयात कोणीच निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नव्हते. परिणामी वडगावदरेकर येथील शेतकरी अधिक संतप्त झाले. शेतकऱ्यांनी पाटबंधाऱ्याच्या कार्यालयाला टाळे ठोकले. तहसीलदार विवेक साळुंके यांना पाणी सोडण्याबाबतचे निवेदन दिले. साळुंके यांनी पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला ठोकलेले टाळे काढून घेतले. पाटबंधारे कार्यालयाचे ढिसाळ नियोजनदौंड तालुक्याच्या पूर्व भागात पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी पोहोचू शकले नाही. दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भामा आसखेडचे पाणी सोडण्यात आले होते. पाटबंधारे विभागाने पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून ‘टेल टू हेड’ या पद्धतीने बंधारे भरायला हवे होते, परंतु तसे न करता पाटबंधारे विभागाने सोडलेल्या पाण्याने दौंड पश्चिमेकडील बंधारे भरल्याने पाणी दौंडच्या पूर्व भागापर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. भामा-आसखेडचे पाणी भीमा नदी चालू होते तोपर्यंत पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन करून पाणी दौंड तालुक्यातील खानवटे गावापर्यंत पोहोचवणे गरजेचे होते, परंतु पाणी बंद झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी माऊली कापसे, पोपट वाघमारे, राजू वाघमारे, शहाजी वाघमारे, मनोहर पहाणे, संभाजी वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.