शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

पाण्यासाठी शेतकऱ्यांना मारहाण

By admin | Updated: March 30, 2017 00:14 IST

खोरवडी (ता. दौंड) येथील बंधाऱ्यांवर वडगावदरेकर (ता. दौंड) आणि कौठा (ता. श्रीगोंदा) या दोन तालुक्यांतील

देऊळगावराजे : खोरवडी (ता. दौंड) येथील बंधाऱ्यांवर वडगावदरेकर (ता. दौंड) आणि कौठा (ता. श्रीगोंदा) या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्यासाठी हाणामारी झाली. या वेळी वडगावदरेकरच्या ग्रामस्थांना मारहाण झाली. संतप्त वडगावदरेकरच्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकले. एकंदरीतच तालुक्याच्या पूर्व भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ््याच्या तोंडावर पेटला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात नेमकी काय परिस्थिती राहील, याबाबत शेतकरी धास्तावला आहे. वडगावदरेकर येथील बंधाऱ्यात पाणी पोहोचले नसल्याने येथील शेतकरी खोरवडीच्या बंधाऱ्यावर ढापे टाकून पाणी अडवले की काय, हे पाहण्यासाठी गेले होते. जर पाणी अडवले असेल तर ते पाणी वडगावदरेकरपर्यंत पोहोचू शकणार नाही. प्रत्यक्षात मात्र ढापे टाकलेले होते. काही शेतकरी ढापे काढायला लागले. कौठा (ता. श्रीगोंदा) येथील शेतकऱ्यांनी ढापे काढण्यासाठी विरोध केला. वडगावदरेकर येथील शेतकऱ्यांना कौठा येथील शेतकऱ्यांनी मारहाण केली.वडगावदरेकर येथील संतप्त शेतकऱ्यांनी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी दौंड पाटबंधारे कार्यालयात गेले होते, मात्र पाटबंधारे कार्यालयात कोणीच निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नव्हते. परिणामी वडगावदरेकर येथील शेतकरी अधिक संतप्त झाले. शेतकऱ्यांनी पाटबंधाऱ्याच्या कार्यालयाला टाळे ठोकले. तहसीलदार विवेक साळुंके यांना पाणी सोडण्याबाबतचे निवेदन दिले. साळुंके यांनी पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला ठोकलेले टाळे काढून घेतले. पाटबंधारे कार्यालयाचे ढिसाळ नियोजनदौंड तालुक्याच्या पूर्व भागात पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी पोहोचू शकले नाही. दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भामा आसखेडचे पाणी सोडण्यात आले होते. पाटबंधारे विभागाने पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून ‘टेल टू हेड’ या पद्धतीने बंधारे भरायला हवे होते, परंतु तसे न करता पाटबंधारे विभागाने सोडलेल्या पाण्याने दौंड पश्चिमेकडील बंधारे भरल्याने पाणी दौंडच्या पूर्व भागापर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. भामा-आसखेडचे पाणी भीमा नदी चालू होते तोपर्यंत पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन करून पाणी दौंड तालुक्यातील खानवटे गावापर्यंत पोहोचवणे गरजेचे होते, परंतु पाणी बंद झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी माऊली कापसे, पोपट वाघमारे, राजू वाघमारे, शहाजी वाघमारे, मनोहर पहाणे, संभाजी वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.