शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

गळतीमुळे शेतजमिनी होताहेत नापीक

By admin | Updated: April 24, 2017 04:39 IST

चाचकमानच्या पाणीवटपावरून सध्या मोठे वाद होत आहेत. त्यात धरणात पाणी अत्यल्प राहिल्याने पाणलोटक्षेत्रात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

चासकमान : चाचकमानच्या पाणीवटपावरून सध्या मोठे वाद होत आहेत. त्यात धरणात पाणी अत्यल्प राहिल्याने पाणलोटक्षेत्रात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. असे असताना मात्र कालव्यातून सोडलेल्या आवर्तनातील पाणी गळतीमुळे मध्येच जिरत आहे. नको असताना शेतात पाणी जिरत असल्याने येथील शेत नापीक होत आहे. यामुळे ही गळती कधी थांबनार असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत. धरणाच्या डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. मात्र कालव्याचे अस्तरीकरण न झाल्यामुळे ठिकठिकाणी गळतीमुळे ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी शेतात झिरपत असल्याने जमिनी नापीक होत आहेत. धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्याने धरणांतर्गत असलेल्या डेहणे, वाडा, दरकवाडी, बुरसेवाडी, तिफनवाडी परिसरातील पाणीपातळीत घट होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. डाव्या कालव्याचे अस्तरीकरण न झाल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे गळती होणाऱ्या पाण्याला कोणी वाली आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.या धरणातील पाण्याचा फायदा खेड व शिरूर तालुक्याला झाला. परंतु गेले ४० वर्षे उलटूनही चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे अपूर्ण काम तसेच अस्तरीकरण झालेले नाही. पश्चिम भागातील कमान, चास, आखरवाडी, तिन्हेवाडीदरम्यान तसेच पूर्व भागातील भांबुरवाडी भागात गळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती असतानाही परिसरात ओढे, नाले, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून पाणी वाहताना दिसत आहे. कालव्याच्या गळतीमुळे दरवर्षी ३० ते ४० टक्के पाणी वापराविना वाया जात असते. त्यामुळे कालव्यातून पाणी सोडले तरी शिरुर तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. यामुळे शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीचे क्षेत्र पाण्यावाचून वंचित राहत असते. यामुळे कालव्याचे लवकरात लवकर अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. (वार्ताहर)