शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

गळतीमुळे शेतजमिनी होताहेत नापीक

By admin | Updated: April 24, 2017 04:39 IST

चाचकमानच्या पाणीवटपावरून सध्या मोठे वाद होत आहेत. त्यात धरणात पाणी अत्यल्प राहिल्याने पाणलोटक्षेत्रात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

चासकमान : चाचकमानच्या पाणीवटपावरून सध्या मोठे वाद होत आहेत. त्यात धरणात पाणी अत्यल्प राहिल्याने पाणलोटक्षेत्रात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. असे असताना मात्र कालव्यातून सोडलेल्या आवर्तनातील पाणी गळतीमुळे मध्येच जिरत आहे. नको असताना शेतात पाणी जिरत असल्याने येथील शेत नापीक होत आहे. यामुळे ही गळती कधी थांबनार असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत. धरणाच्या डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. मात्र कालव्याचे अस्तरीकरण न झाल्यामुळे ठिकठिकाणी गळतीमुळे ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी शेतात झिरपत असल्याने जमिनी नापीक होत आहेत. धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्याने धरणांतर्गत असलेल्या डेहणे, वाडा, दरकवाडी, बुरसेवाडी, तिफनवाडी परिसरातील पाणीपातळीत घट होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. डाव्या कालव्याचे अस्तरीकरण न झाल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे गळती होणाऱ्या पाण्याला कोणी वाली आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.या धरणातील पाण्याचा फायदा खेड व शिरूर तालुक्याला झाला. परंतु गेले ४० वर्षे उलटूनही चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे अपूर्ण काम तसेच अस्तरीकरण झालेले नाही. पश्चिम भागातील कमान, चास, आखरवाडी, तिन्हेवाडीदरम्यान तसेच पूर्व भागातील भांबुरवाडी भागात गळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती असतानाही परिसरात ओढे, नाले, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून पाणी वाहताना दिसत आहे. कालव्याच्या गळतीमुळे दरवर्षी ३० ते ४० टक्के पाणी वापराविना वाया जात असते. त्यामुळे कालव्यातून पाणी सोडले तरी शिरुर तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. यामुळे शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीचे क्षेत्र पाण्यावाचून वंचित राहत असते. यामुळे कालव्याचे लवकरात लवकर अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. (वार्ताहर)