शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

गळतीमुळे शेतजमिनी होताहेत नापीक

By admin | Updated: April 24, 2017 04:39 IST

चाचकमानच्या पाणीवटपावरून सध्या मोठे वाद होत आहेत. त्यात धरणात पाणी अत्यल्प राहिल्याने पाणलोटक्षेत्रात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

चासकमान : चाचकमानच्या पाणीवटपावरून सध्या मोठे वाद होत आहेत. त्यात धरणात पाणी अत्यल्प राहिल्याने पाणलोटक्षेत्रात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. असे असताना मात्र कालव्यातून सोडलेल्या आवर्तनातील पाणी गळतीमुळे मध्येच जिरत आहे. नको असताना शेतात पाणी जिरत असल्याने येथील शेत नापीक होत आहे. यामुळे ही गळती कधी थांबनार असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत. धरणाच्या डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. मात्र कालव्याचे अस्तरीकरण न झाल्यामुळे ठिकठिकाणी गळतीमुळे ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी शेतात झिरपत असल्याने जमिनी नापीक होत आहेत. धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्याने धरणांतर्गत असलेल्या डेहणे, वाडा, दरकवाडी, बुरसेवाडी, तिफनवाडी परिसरातील पाणीपातळीत घट होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. डाव्या कालव्याचे अस्तरीकरण न झाल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे गळती होणाऱ्या पाण्याला कोणी वाली आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.या धरणातील पाण्याचा फायदा खेड व शिरूर तालुक्याला झाला. परंतु गेले ४० वर्षे उलटूनही चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे अपूर्ण काम तसेच अस्तरीकरण झालेले नाही. पश्चिम भागातील कमान, चास, आखरवाडी, तिन्हेवाडीदरम्यान तसेच पूर्व भागातील भांबुरवाडी भागात गळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती असतानाही परिसरात ओढे, नाले, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून पाणी वाहताना दिसत आहे. कालव्याच्या गळतीमुळे दरवर्षी ३० ते ४० टक्के पाणी वापराविना वाया जात असते. त्यामुळे कालव्यातून पाणी सोडले तरी शिरुर तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. यामुळे शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीचे क्षेत्र पाण्यावाचून वंचित राहत असते. यामुळे कालव्याचे लवकरात लवकर अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. (वार्ताहर)