शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
5
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
6
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
9
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
10
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
11
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
12
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
13
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
14
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
15
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
16
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
17
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
18
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
19
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
20
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  

शेतमजूर ते द्राक्षबागायतदार यशस्वी वाटचाल

By admin | Updated: December 26, 2016 02:12 IST

इंदापूर तालुक्यातील द्राक्षाचे आगार म्हणून बोरी गावाची ओळख आहे. मागील १० ते १५ वर्षांपूर्वी पाण्यासाठी दाहीदिशा असणाऱ्या

अजय नागवे / काझडइंदापूर तालुक्यातील द्राक्षाचे आगार म्हणून बोरी गावाची ओळख आहे. मागील १० ते १५ वर्षांपूर्वी पाण्यासाठी दाहीदिशा असणाऱ्या या गावाचा शेततळ्यांच्या माध्यमातून आता कायापालट झाला आहे. शेतमजूर ते द्राक्षबागायतदार असा प्रेरणादायी प्रवास बोरीच्या शेतकऱ्यांचा आहे. तब्बल १५० शेततळी आहेत. या १५० शेततळ्यांत लाखो लिटर पाणी साठवले जात आहे. त्यामुळे दुष्काळातही येथील शेती हिरवीगार दिसते.गावाची लोकसंख्या ६ हजारापर्र्यंत आहे. शेततळ्यात साठवलेल्या पाण्यामुळे गाव हिरवेगार आहे. १९७१-७२च्या काळात बोरी गावाला मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागल्या आहेत तसेच २००४च्या काळत भीषण दुष्काळ पडला होता. या वेळी थोड्याफार प्रमाणात असणाऱ्या द्राक्षबागा पाणी नसल्यान तोडून टाकाव्या लागल्या आणि त्या वेळी गावातील बागायतदारांना आसपासच्या गावांमध्ये मजुरीसाठी जावे लागले. यानंतर मात्र गावातील प्रत्येक शेतकऱ्याने पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा चंगच बांधला. येथील शेतकऱ्यांच्या प्रयत्नातूनच बोरीच्या माळरानावर आज नंदनवन फुलले आहे. गावात बांधण्यात आलेल्या शेततळ्याचा वापर उन्हाळ्यात केला जातो. उन्हाळ्यात वापरलेल्या पाण्याचा साठा खालावला, की शेततळे पुन्हा भरण्यासाठी पावसाळ्यात विहिरी पाण्याने पूर्ण क्षमतेने भरून ठेवतात. शेततळ्यातले पाणी द्राक्ष बागांना ठिबक सिंचनाद्वारे दिले जाते. त्यामळे त्या पाण्याचीसुध्दा बचत होते. ज्या माळरानावर हुलगा, मटकी पिकत होते, तिथे आता फळबागा पिकत आहेत.पहिल्यांदा विरोध; नंतर अनुकरण... बोरी गावातील रामचंद्र शिंदे यांनी प्रथम बोरीमध्ये शेततळे उभारले. या वेळी त्यांना शेततळे न बांधण्याचा सल्ला अनेकांनी दिला. परंतु शिंदे यांनी शेततळे उभारून त्याचा वापरही शेतकऱ्यांना करून दाखवला. तसेच पाणीटंचाईच्या काळात याच शेततळ्याने त्यांच्या द्राक्षबागेला आधार दिला. यावर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शिंदे यांच्याकडून शेततळ्याची माहिती घेतली. येथूनच शेततळ्याची क्रांती होत गेली.