शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शेतमजूर ते द्राक्षबागायतदार यशस्वी वाटचाल

By admin | Updated: December 26, 2016 02:12 IST

इंदापूर तालुक्यातील द्राक्षाचे आगार म्हणून बोरी गावाची ओळख आहे. मागील १० ते १५ वर्षांपूर्वी पाण्यासाठी दाहीदिशा असणाऱ्या

अजय नागवे / काझडइंदापूर तालुक्यातील द्राक्षाचे आगार म्हणून बोरी गावाची ओळख आहे. मागील १० ते १५ वर्षांपूर्वी पाण्यासाठी दाहीदिशा असणाऱ्या या गावाचा शेततळ्यांच्या माध्यमातून आता कायापालट झाला आहे. शेतमजूर ते द्राक्षबागायतदार असा प्रेरणादायी प्रवास बोरीच्या शेतकऱ्यांचा आहे. तब्बल १५० शेततळी आहेत. या १५० शेततळ्यांत लाखो लिटर पाणी साठवले जात आहे. त्यामुळे दुष्काळातही येथील शेती हिरवीगार दिसते.गावाची लोकसंख्या ६ हजारापर्र्यंत आहे. शेततळ्यात साठवलेल्या पाण्यामुळे गाव हिरवेगार आहे. १९७१-७२च्या काळात बोरी गावाला मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागल्या आहेत तसेच २००४च्या काळत भीषण दुष्काळ पडला होता. या वेळी थोड्याफार प्रमाणात असणाऱ्या द्राक्षबागा पाणी नसल्यान तोडून टाकाव्या लागल्या आणि त्या वेळी गावातील बागायतदारांना आसपासच्या गावांमध्ये मजुरीसाठी जावे लागले. यानंतर मात्र गावातील प्रत्येक शेतकऱ्याने पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा चंगच बांधला. येथील शेतकऱ्यांच्या प्रयत्नातूनच बोरीच्या माळरानावर आज नंदनवन फुलले आहे. गावात बांधण्यात आलेल्या शेततळ्याचा वापर उन्हाळ्यात केला जातो. उन्हाळ्यात वापरलेल्या पाण्याचा साठा खालावला, की शेततळे पुन्हा भरण्यासाठी पावसाळ्यात विहिरी पाण्याने पूर्ण क्षमतेने भरून ठेवतात. शेततळ्यातले पाणी द्राक्ष बागांना ठिबक सिंचनाद्वारे दिले जाते. त्यामळे त्या पाण्याचीसुध्दा बचत होते. ज्या माळरानावर हुलगा, मटकी पिकत होते, तिथे आता फळबागा पिकत आहेत.पहिल्यांदा विरोध; नंतर अनुकरण... बोरी गावातील रामचंद्र शिंदे यांनी प्रथम बोरीमध्ये शेततळे उभारले. या वेळी त्यांना शेततळे न बांधण्याचा सल्ला अनेकांनी दिला. परंतु शिंदे यांनी शेततळे उभारून त्याचा वापरही शेतकऱ्यांना करून दाखवला. तसेच पाणीटंचाईच्या काळात याच शेततळ्याने त्यांच्या द्राक्षबागेला आधार दिला. यावर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शिंदे यांच्याकडून शेततळ्याची माहिती घेतली. येथूनच शेततळ्याची क्रांती होत गेली.