शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

बाजारभाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:09 IST

मंचर: गेल्या पंधरा दिवसांपासून मागणी नसल्याने पालेभाज्यांचे भाव ढासळले आहे. अजूनही भावात होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. ...

मंचर: गेल्या पंधरा दिवसांपासून मागणी नसल्याने पालेभाज्यांचे भाव ढासळले आहे. अजूनही भावात होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या जो दर मिळत आहे त्यातून गुंतवलेले भांडवलदेखील मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, शुक्रवारी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथीला शेकडा ५०१ रुपये तर कोथिंबिरीला शेकडा ८५० रुपये दर मिळाल्याची माहिती सभापती देवदत्त निकम यांनी दिली.

पालेभाज्यांचे बाजारभाव ढासळले आहेत. शेतकरी बाजारभाव वाढण्याची वाट पाहत आहेत. मात्र अनेक दिवस झाले बाजारभाव स्थिर आहेत. मध्यंतरी मेथी,कोथिंबीर अक्षरशः फेकून द्यावी लागत होती. सध्या मेथीची एक जुडी दोन ते पाच रुपये या दराने विकली जात आहे. तर कोथिंबिरीला शेकडा १०१ ते ८५० रुपये असा भाव मिळत आहे. ठोक बाजारात बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी किरकोळ बाजारात पालेभाज्या विकण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या पंधरा दिवसांत मागणी नसल्याने अक्षरशः पालेभाज्यांना मिळेल त्या भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वाहतूक खर्चही वसूल होत नसून अनेक शेतकऱ्यांचे भांडवल अंगावर आले आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान या काळात झाले आहे.

महागाई वाढल्याने मेथी कोथिंबीर यांच्या भांडवली खर्चात वाढ झाली. असे असतानाही अनेक शेतकऱ्यांनी धाडसाने ही पिके घेतली आहेत. मात्र बाजारभावाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला गेला आहे. पालेभाज्यांचे बाजारभाव काहीसे वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र उत्पादन जास्त निघत असल्याने बाजारभाव वाढत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात पालेभाज्यांचे दर स्थिर आहे.बाजार समितीत १३ हजार ७५५ मेथी जुड्यांची आवक होऊन शेकडा २०१ ते ५०१ रुपये असा भाव मिळाला आहे. कोथींबिरीच्या ८ हजार २५१ जुड्या आवक होऊन शेकडा १०१ ते ८५० रुपये भाव मिळाला आहे. पालेभाज्याचे बाजारभाव कमी झाल्याने मंचर शहरातील दररोजच्या बाजारात मेथी कोथिंबीर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. ग्राहकांची मागणी कमी असल्यामुळे अगदी पाच रुपयाला एक जुडी या दराने विक्री करावी लागत आहे. पालेभाज्यांचे बाजारभाव स्थिर आहेत, अशी माहिती मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी संदीप गांजाळे यांनी दिली.

०५ मंचर