शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

कर्जमाफीच्या अस्पष्टतेमुळे शेतकरी गोंधळात

By admin | Updated: March 26, 2017 01:23 IST

शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीसंदर्भात अद्याप अस्पष्टता असल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुपे : शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीसंदर्भात अद्याप अस्पष्टता असल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पीककर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्हा बॅँका ओस पडलेल्या दिसत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून विधिमंडळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यावरुन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरीवर्ग कर्जमाफी कधी होईल याकडे लक्ष देऊन आहेत. मात्र, शासनाकडे कर्जमाफीच्या संदर्भात अद्याप अस्पष्टता असल्याने शेतकरीवर्ग गोंधळलेल्या अवस्थेत आहे. पीककर्ज भरण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत सात दिवसांवर आली असल्याने शेतकऱ्यांकडून अद्याप बँकांकडे भरणा केला जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जाची फेड केल्यास शुन्य टक्के व्याजदर जिल्हा बँकेकडून आकारला जातो. मात्र, एप्रिल महिन्यापासून मागील पीककजार्ला ६ टक्के तर थकीत कर्जाला १२ टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. तर पुन्हा कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. मात्र, कर्जमाफी होईल या आशेवर येथील शेतकरीवर्गाने बॅँकांकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान, येथील जिल्हा बँकेच्या शाखेत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात खरीप आणि रब्बी मिळून येथील अकरा विविध कार्यकारी सोसायट्यांना सुमारे ३२ कोटींचे कर्जवाटप केले आहे. तर मध्यम मुदतीचे सुमारे ४ कोटी कर्जाचे वाटप केले आहे. मात्र ३१ मार्चला सात दिवस बाकी राहिले असतानाही एकही टक्का वसुली शेतकऱ्यांची आली नसल्याची माहिती बॅँकेच्या अधिकृत सूत्रांनी दिली. (वार्ताहर)