शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

कर्जमाफीच्या अस्पष्टतेमुळे शेतकरी गोंधळात

By admin | Updated: March 26, 2017 01:23 IST

शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीसंदर्भात अद्याप अस्पष्टता असल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुपे : शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीसंदर्भात अद्याप अस्पष्टता असल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पीककर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्हा बॅँका ओस पडलेल्या दिसत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून विधिमंडळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यावरुन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरीवर्ग कर्जमाफी कधी होईल याकडे लक्ष देऊन आहेत. मात्र, शासनाकडे कर्जमाफीच्या संदर्भात अद्याप अस्पष्टता असल्याने शेतकरीवर्ग गोंधळलेल्या अवस्थेत आहे. पीककर्ज भरण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत सात दिवसांवर आली असल्याने शेतकऱ्यांकडून अद्याप बँकांकडे भरणा केला जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जाची फेड केल्यास शुन्य टक्के व्याजदर जिल्हा बँकेकडून आकारला जातो. मात्र, एप्रिल महिन्यापासून मागील पीककजार्ला ६ टक्के तर थकीत कर्जाला १२ टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. तर पुन्हा कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. मात्र, कर्जमाफी होईल या आशेवर येथील शेतकरीवर्गाने बॅँकांकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान, येथील जिल्हा बँकेच्या शाखेत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात खरीप आणि रब्बी मिळून येथील अकरा विविध कार्यकारी सोसायट्यांना सुमारे ३२ कोटींचे कर्जवाटप केले आहे. तर मध्यम मुदतीचे सुमारे ४ कोटी कर्जाचे वाटप केले आहे. मात्र ३१ मार्चला सात दिवस बाकी राहिले असतानाही एकही टक्का वसुली शेतकऱ्यांची आली नसल्याची माहिती बॅँकेच्या अधिकृत सूत्रांनी दिली. (वार्ताहर)