शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

कर्जमाफीच्या अस्पष्टतेमुळे शेतकरी गोंधळात

By admin | Updated: March 26, 2017 01:23 IST

शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीसंदर्भात अद्याप अस्पष्टता असल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुपे : शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीसंदर्भात अद्याप अस्पष्टता असल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पीककर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्हा बॅँका ओस पडलेल्या दिसत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून विधिमंडळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यावरुन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरीवर्ग कर्जमाफी कधी होईल याकडे लक्ष देऊन आहेत. मात्र, शासनाकडे कर्जमाफीच्या संदर्भात अद्याप अस्पष्टता असल्याने शेतकरीवर्ग गोंधळलेल्या अवस्थेत आहे. पीककर्ज भरण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत सात दिवसांवर आली असल्याने शेतकऱ्यांकडून अद्याप बँकांकडे भरणा केला जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जाची फेड केल्यास शुन्य टक्के व्याजदर जिल्हा बँकेकडून आकारला जातो. मात्र, एप्रिल महिन्यापासून मागील पीककजार्ला ६ टक्के तर थकीत कर्जाला १२ टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. तर पुन्हा कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. मात्र, कर्जमाफी होईल या आशेवर येथील शेतकरीवर्गाने बॅँकांकडे पाठ फिरवली आहे. दरम्यान, येथील जिल्हा बँकेच्या शाखेत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात खरीप आणि रब्बी मिळून येथील अकरा विविध कार्यकारी सोसायट्यांना सुमारे ३२ कोटींचे कर्जवाटप केले आहे. तर मध्यम मुदतीचे सुमारे ४ कोटी कर्जाचे वाटप केले आहे. मात्र ३१ मार्चला सात दिवस बाकी राहिले असतानाही एकही टक्का वसुली शेतकऱ्यांची आली नसल्याची माहिती बॅँकेच्या अधिकृत सूत्रांनी दिली. (वार्ताहर)