शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतकऱ्यांची वीज तोडल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:11 IST

महावितरणकडून शेतकऱ्यांचे वीज तोडून वीजबिल भरण्याचा तगादा लावला जात आहे. वीज तोडणे थांबविले नाहीत तर आंदोलनाचा इशारा भारतीय ...

महावितरणकडून शेतकऱ्यांचे वीज तोडून वीजबिल भरण्याचा तगादा लावला जात आहे. वीज तोडणे थांबविले नाहीत तर आंदोलनाचा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला आहे.

शिक्रापूर येथील विद्युत वितरण कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य पंडित भुजबळ, भाजपा युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नितीन गव्हाणे, पिंपळे खालसाचे माजी सरपंच राजेंद्र धुमाळ, विशाल गव्हाणे यांसह आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. मार्च अखेर असल्यामुळे सोसायटीचा भरणा परस्पर कपात केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसे देखील नाहीत. त्यामध्ये शेतकऱ्यांना वीजबिलासाठी तगादा लावणे योग्य नाही, असे जयेश शिंदे यांनी सांगितले. शिक्रापूर महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांना निवेदन देण्यात आले.

चौकट

वीजबिले मिळत नव्हती तर मागून का घेतली नाही?

वापरलेल्या विजेचे बिल देणे, हे सभ्य ग्राहक म्हणून कर्तव्य

गेली अनेक वर्षे ज्यांना वीजबिले मिळत नव्हती, त्या शेतकऱ्यांनी महावितरणशी संपर्क करून आपली

थकीत बिले का घेतली नाहीत? असा प्रतिप्रश्न महाजन यांनी या वेळी उपस्थितांना केला. तसेच, वापरलेल्या विजेचे बिल देणे, हे सभ्य ग्राहक म्हणून कायद्याने दायित्व आहे, असे नितीन महाजन यांनी पटवून दिले.

फोटो ओळ – शिक्रापूर ता. शिरूर येथील विद्युत वितरण कार्यालयात निवेदन देताना भाजपा पदाधिकारी व शेतकरी.