शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Updated: March 13, 2016 01:34 IST

हवेली तालुक्यातील १६ आणि दौंडमधील ९ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी भामा-आसखेड धरणासाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत

पिंपरी सांडस : हवेली तालुक्यातील १६ आणि दौंडमधील ९ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी भामा-आसखेड धरणासाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत. याबाबत जमीन संपादनविरोधी कृती समितीमार्फत व अन्यायग्रस्त शेतक ऱ्यांसह सतत संघर्ष आणि पाठपुरावा केला. परंतु राजकीय इच्छाशक्ती शेतकऱ्यांच्या बाजूने दिसत नाही. यामुळे आता शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनासाठी तयार राहावे. पुनर्वसनासाठी बेकायदा राखीव असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनविरोधी कृती समितीकडून सोमवारी (दि. १४) पुणे महसूूल आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष विकास लवांडे यांनी दिली.भामा-आसखेडचा नियोजित कालवा रद्द होऊन हे पाणी बिगर सिंचनासाठी राखीव ठेवण्यात आले. कृष्णा खोरे विकास महामंडळाने लाभक्षेत्रातून हवेली, दौंडमधील सर्व क्षेत्र वगळले, तसा २०१३मध्ये अधिकृत ठराव झाला. परंतु त्याची अंमलबजावणी महसूल विभागामार्फत होणे गरजेचे होते. ती न झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे.तत्कालीन शासनाने जमिनीच्या ७/१२ वरील पुनर्वसन राखीव शेरे कमी करण्याचा निर्णय (जी. आर.) १ सप्टेंबर २०१४ रोजी घेतला. नव्या युती सरकारने तो अध्यादेश रद्द करून शब्दप्रयोग आणि वाक्यरचना बदलून त्याच अर्थाचा १ आॅगस्ट २०१५ रोजी नवीन अध्यादेश काढला आहे. मात्र वेळोवेळी पाठपुरावा करूनही जिल्हा प्रशासन अद्याप शेरे कमी करायला तयार नाहीत. शिरूर, हवेली आणि दौंडच्या लोकप्रतिनिधींनी याकामी सकारात्मक भूमिका घेऊन अन्यायग्रस्त हजारो शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही अपेक्षा आहे. मात्र, त्यांचा प्रतिसाद चांगला मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)