शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Updated: March 13, 2016 01:34 IST

हवेली तालुक्यातील १६ आणि दौंडमधील ९ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी भामा-आसखेड धरणासाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत

पिंपरी सांडस : हवेली तालुक्यातील १६ आणि दौंडमधील ९ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी भामा-आसखेड धरणासाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत. याबाबत जमीन संपादनविरोधी कृती समितीमार्फत व अन्यायग्रस्त शेतक ऱ्यांसह सतत संघर्ष आणि पाठपुरावा केला. परंतु राजकीय इच्छाशक्ती शेतकऱ्यांच्या बाजूने दिसत नाही. यामुळे आता शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनासाठी तयार राहावे. पुनर्वसनासाठी बेकायदा राखीव असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनविरोधी कृती समितीकडून सोमवारी (दि. १४) पुणे महसूूल आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष विकास लवांडे यांनी दिली.भामा-आसखेडचा नियोजित कालवा रद्द होऊन हे पाणी बिगर सिंचनासाठी राखीव ठेवण्यात आले. कृष्णा खोरे विकास महामंडळाने लाभक्षेत्रातून हवेली, दौंडमधील सर्व क्षेत्र वगळले, तसा २०१३मध्ये अधिकृत ठराव झाला. परंतु त्याची अंमलबजावणी महसूल विभागामार्फत होणे गरजेचे होते. ती न झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे.तत्कालीन शासनाने जमिनीच्या ७/१२ वरील पुनर्वसन राखीव शेरे कमी करण्याचा निर्णय (जी. आर.) १ सप्टेंबर २०१४ रोजी घेतला. नव्या युती सरकारने तो अध्यादेश रद्द करून शब्दप्रयोग आणि वाक्यरचना बदलून त्याच अर्थाचा १ आॅगस्ट २०१५ रोजी नवीन अध्यादेश काढला आहे. मात्र वेळोवेळी पाठपुरावा करूनही जिल्हा प्रशासन अद्याप शेरे कमी करायला तयार नाहीत. शिरूर, हवेली आणि दौंडच्या लोकप्रतिनिधींनी याकामी सकारात्मक भूमिका घेऊन अन्यायग्रस्त हजारो शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही अपेक्षा आहे. मात्र, त्यांचा प्रतिसाद चांगला मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)