शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

सरकारचा हमीभाव म्हणजे निव्वळ धूळफेक : घनवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:25 IST

सरकारने जाहीर केलेला हमीभाव ही धूळफेक असून, त्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे शोषण थांबणार नाही. निर्यातीच्या बाबतीत आपले धोरण धरसोडीचे आहे.

सोमेश्वरनगर - सरकारने जाहीर केलेला हमीभाव ही धूळफेक असून, त्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे शोषण थांबणार नाही. निर्यातीच्या बाबतीत आपले धोरण धरसोडीचे आहे. त्यामुळे निर्यातीबाबत आपली आतंरराष्ट्रीय विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, अशी टीका शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली.भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे जिल्हा शाखा सोमेश्वरनगर यांच्यावतीने ६९ व्या ज्ञान विज्ञान गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आघारकर कृषी अनुसंधान संस्थेचे संचालक अजित चव्हाण होते. पाहुण्यांनी उपस्थित श्रोत्यांशी ‘जागतिकीकरणानंतरची शेती’ या विषयावर संवाद साधला. यावेळी घनवट बोलत होते.घनवट म्हणाले, की सत्तेवर येणारे प्रत्येक सरकार शेती तोट्यात कशी राहील, अशीच धोरणे आहेत. शेतकरी कर्जबाजारी राहील, यासाठीच प्रयत्न केले आहेत. शेतकºयाला त्याच्या मालाची किंमत ठरविण्याचा अधिकार जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतीचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. देशात मुबलक अन्नधान्य उपलब्ध असताना इतर देशांतून अन्नधान्य आयात केले जाते. त्यामुळे शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही.शेतकºयाला व्यापार करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. गोवंशबंदी कायद्यामुळे शेतकºयाचे कंबरडे मोडले आहे. हा कायदा शेतकरीविरोधी आहे, म्हणून जागतिकीकरणाचे लाभ शेतकºयाला मिळालेच पाहिजेत. शेतकरी मतदान करताना जात बघतो, म्हणूनच त्याचे प्रश्न कायम आहेत. म्हणून शेतकºयांना प्रश्न सोडवायचे असतील तर जात, धर्म पाहू नये, असे घनवट म्हणाले.धनाजी धुमाळ, अनिल चव्हाण, शिवाजी शिंदे, मदन काकडे, अजहर नदाफ, समीक्षा मिलिंद, सविता पडवळ, प्राजक्ता पवार, अजय दरेकर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल दत्तात्रय अलगूर व आदिवासी प्रवर्गातून इंग्रजी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. गोरख काळे यांचा आणि माजी सैनिकांसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यपातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. राहुल खरात यांनी सूत्रसंचालन केले. आकाश सावळकर यांनी आभार मानले.

टॅग्स :agricultureशेतीnewsबातम्या