शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांचे डोळे आकाशाकडे

By admin | Updated: July 5, 2014 22:19 IST

राजगुरुनगर : 1972च्या दुष्काळापेक्षाही सध्याची परिस्थिती भीषण असल्याचे खेड तालुक्यातील जुनी जाणती माणसे सांगत आहेत.

राजगुरुनगर : 1972च्या दुष्काळापेक्षाही सध्याची परिस्थिती भीषण असल्याचे खेड तालुक्यातील जुनी जाणती माणसे सांगत आहेत. खरिपाच्या पेरण्या होण्याची चिन्हे तर  दिसत नाहीच; पण पावसाची मृग आणि आद्र्रा ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने, माणसांना आणि जनावरांना प्यायला पाणीही उपलब्ध होणार की नाही, ही शंका आता भेडसावू लागली आहे. तालुक्यात सध्या सहा टँकरने 6 गावे आणि 77 वाडय़ा-वस्त्यांना पाणीपुरवठा चालू आहे. आकाशातून आषाढधारा बरसण्याऐवजी त्या शेतक:यांच्या डोळ्यांतून बरसाव्यात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यात 57 हजार हेक्टर क्षेत्र खरिपाचे आहे. त्यातल्या अवघ्या 12क्क् हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. आजर्पयतची ही सर्वात नीचांकी आकडेवारी आहे.  1972 मध्ये झालेल्या दुष्काळात वळवाचे पाऊस पडले होते. त्यामुळे पेरण्या झाल्या होत्या. पण, पुढे पुरेसा पाऊस न झाल्याने तीव्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती.  मात्र, पेरण्याच न होण्याची ही पहिलीच वेळ असावी, असे जाणकार सांगतात. कितीही दुष्काळ पडला तरी तालुक्याच्या पश्चिम डोंगरी भागात पाऊस होतोच. यंदा मात्र तिथेही पाऊस नाही हे कटू वास्तव आहे. पाऊस कमी-जास्त झाला तरी भातरोपेच उगवली नाही अशी परिस्थिती  पहिल्यांदाच उद्भवल्याचे शेतकरी सांगतात.
 कडधान्याच्या पेरण्यांचा हंगाम तर निघूनच गेला आहे. भाताच्या लागवडी जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून सुरू होतात. त्या यंदा झाल्याच नाहीत. भातरोपे वाया गेली असून, बाहेरचे पाणी देऊन ज्यांनी कशीबशी जी रोपे जगविली आहेत, ती खाचरात पाणीच नसल्याने लावू शकत नाही.  नवीन रोपे टाकून ती उगवण्याची वाट पाहणो आता शक्य नाही. कारण, रोपे लागवडीयोग्य होण्यास 22 दिवसांचा किमान कालावधी लागतो. तो मिळणो आता शक्य नाही. या सर्व परिस्थितीचा सार असा आहे की खेड तालुक्यात तरी आता कडधान्ये, भात ही पूर्णपणो हातातून गेली आहेत. या आठवडय़ात पाऊस झाला नाही, तर बाजरी आणि भुईमुगाची पेरही शक्य होणार नसल्याने त्या पिकांचीही हातात येण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
 
जनावरे जगविणो कठीण
4तालुक्यात जुलै महिन्यातही टँकरने पाणीपुरवठा करण्याची गेल्या कित्येक वर्षातली ही पहिलीच वेळ आहे. हा पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या पाणी मिळत असले तरी, भविष्यात तेही उपलब्ध होईल की नाही अशी शंका आहे. पेरण्या तर नाहीतच, पण डोंगरावर किंवा माळावरचे गवतही यावर्षी उगवलेले नसल्याने जनावरे जगविणो कठीण होणार आहे. 
4तालुक्याची मुख्य खरीप पिके असलेली बाजरी आणि भुईमूग या पिकांच्या पेरण्या उशिरात उशिरा 15 जुलैर्पयत होऊ शकतात. त्यानंतर ही पिके पेरली जाऊ शकणार नाहीत, असे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी सांगितले.