शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
2
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
3
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
4
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
5
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
6
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
7
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
9
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
10
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
11
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
12
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
13
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
14
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
15
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
16
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
17
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
18
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
19
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
20
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

शेतकरी सापडला दुहेरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST

गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलांचा शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाबरोबरच या हवामानाच्या बदलांनाही सामोरे जावे ...

गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलांचा शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाबरोबरच या हवामानाच्या बदलांनाही सामोरे जावे लागत आहे. शेतीचे उत्पन्नही कमी आले आहे. त्यातच गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट सतत भेडसावत आहे. कोरोनामुळे वांरवार लॉकडाऊनसारख्या पर्यायांचा वापर करावा लागत आहे. त्याचा शेतमालावर परिणात होत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

शेतात पिकवलेला माल ज्यावेळी बाजारात आणला जातो त्यालाही सध्याच्या परिस्थितीत भाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतीमाल भाजीमंडईत विक्रीला न्यायचा की नाही असा ही प्रश्न भेडसावत असल्याने तूर्त तरी शेतकरी आर्थिक विवंचनेत असल्याचे चित्र दिसत आहेत.

यासंदर्भात बोरीबेलचे शेतकरी हनुमंत पाचपुते म्हणाले की, कोरोना होईल या भीतीने शेतकरी शेतीमाल शहरीभागात विक्रीला नेण्यासाठी घाबरत आहे तर दुसरीकडे गावपातळीवर सर्वच माल विकला जाईल, याची शाश्वती नाही. शेतकऱ्यांचा पिकवलेला शेतीमाल शेतातच पडून राहत असल्याने सध्यातरी शेतकऱ्यांपुढे नुकसानीचा सपाटा सुरू आहे.

पारगाव येथील शेतकरी पोपटराव ताकवणे म्हणाले, की जोपर्यंत शासन शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला हमीभाव ठरवून देत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक पडझड सुरू राहील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीमाल नुकसानीचे आर्थिक पॅकेज जाहीर करून नुकसान भरपाई दिली तरच शेतकरी आर्थिकदृष्ट्या तग धरेल.