शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नेटवर्कअभावी किसान ॲपला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST

चाकण : शेतकऱ्यांना वातावरणातील बदल, पीक लागवड, कीड रोगाचे व्यवस्थापन, औषधफवारणी, वादळी वारे आणि पाऊस यांसह शेतीविषयक सगळीच माहिती ...

चाकण : शेतकऱ्यांना वातावरणातील बदल, पीक लागवड, कीड रोगाचे व्यवस्थापन, औषधफवारणी, वादळी वारे आणि पाऊस यांसह शेतीविषयक सगळीच माहिती मिळावी, यासाठी ‘किसान ॲप’ची निर्मिती केली. त्या ॲपच्या आधारे शेतकऱ्यांना मेसेजद्वारे माहिती देण्यात येत होती. मात्र, काही दिवसांपासून नेटवर्कअभावी ही माहिती शेतकऱ्यांना मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे पिकांवर येणाऱ्या संकटावेळी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना शेतीविषयक अचूक माहिती मिळावी, यासाठी शासनाने किसान पोर्टल सुरू केले आहे. खेड तालुक्यात शेतीला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने येथील शेतकरी सधन झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक शेतकरी शेतात विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्य पिके, भात शेती आणि फळबागांमधून चांगले उत्पादन घेत आहेत. अनेक शेतकरी नवनवीन शेती पिकांचे उत्पादन घेऊन सेंद्रिय खतांचा वापर करून पिके घेत आहे. निर्सगाच्या अनियमितपणामुळे अचूक माहिती मिळावी यासाठी किसान पोर्टलला जोडले गेले आहे. परंतु मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने शेतीविषयक माहितीचे एसएमएस मिळत नाही. यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

किसान ॲपमुळे शेतकऱ्यांना शेतीबद्दल चांगल्या प्रकारे माहिती मिळत आहे. बी-बियाणे, खत, औषध आणि हंगामातील पिकांची लागवड, वाढीव उत्पादन याचे व्यवस्थित नियोजन करता येत आहे. परंतु मेसेज वेळेवर मिळत नसल्याने हवामानाचा अंदाज चुकत आहे, असे गोनवडी येथील प्रगतिशील शेतकरी दिनेश मोहिते-पाटील यांनी सांगितले.

आमच्याकडे मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने पावसाची माहिती मिळत नाही. भामनेर खोऱ्यात भाताचे आगर असल्याने सर्व पावसावर अवलंबून असते. अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल नाही. त्यामुळे त्यांना मेसेजवर अवलंबून राहवे लागते. तेही नेटवर्क अभावी मिळत नाही. यावर सरकारने काहीतरी नियोजन करावे, असे भात उत्पादक शेतकरी किसन नवले यांनी म्हटले आहे.