शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

लाखेवाडी हल्ल्यातील कुटुंबाचे शासन पुनर्वसन करणार

By admin | Updated: June 29, 2015 23:47 IST

‘लाखेवाडी दलित हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेस दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अन्यायग्रस्त

इंदापूर : ‘‘लाखेवाडी दलित हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेस दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अन्यायग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी प्रत्येकी चाळीस हजार रुपये येत्या एक-दोन दिवसांत मिळतील,’’ अशी माहिती समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज (दि. २९) येथे पत्रकार परिषदेत दिली.अन्यायग्रस्त भिंगारदिवे कुटुंबास सामाजिक न्याय विभागाच्या वतीने घर बांधून देण्यात येईल. रहदारीसाठी डांबरी रस्ता तयार करून देण्यात येईल. पाणी, स्वच्छतागृहाचीही व्यवस्था करण्यात येईल, असे सांगून दिलीप कांबळे म्हणाले, की भिंगारदिवे कुटुंबाकडे सहा एकर बागायत जमीन आहे. ती त्यांनी विकावी अथवा ती बळकावता यावी या दृष्टीने आरोपी त्यांच्यावर दबाव आणत होते. त्यातूनच हे हल्ला प्रकरण घडले आहे, असे आज भिंगारदिवे कुटुंबातील सदस्यांशी बोलताना आपल्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांची जमीन त्यांच्या मर्जीशिवाय किमान वीस वर्षे तरी विकली जाणार नाही, अशी व्यवस्था आपण केली आहे, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.कांबळे म्हणाले, की पोलीस यंत्रणेकडून आपण तपासाची माहिती घेतली आहे. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. भा.दं.वि. कलम ३०७ लावण्यात आले आहे. प्रमुख आरोपी पकडले गेले आहेत. मात्र गुंडवजा पैलवान असणारे व ज्यांनी अमानुष मारहाण केली ते २५ ते ३० जण अद्याप फरार आहेत. सर्व आरोपींना अटक करावी. कसल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करावी, असे आदेश आपण पोलीस यंत्रणेस दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे, असे कांबळे म्हणाले.या घटनेमुळे आमच्या लाखेवाडी गावास हल्लेखोरांनी काळीमा फासला, अशी तेथील लोकांची प्रतिक्रिया आहे. मातंग समाजाची गावात केवळ दोनच घरे आहेत. एक तर मागासवर्गीयांकडे जमीनच नसते. ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावर असे प्रसंग येतात, असे या वेळी बोलताना दिलीप कांबळे म्हणाले. दलित अत्याचाराबाबत अहमदनगरनंतर इंदापुरात असे चित्र निर्माण झाले आहे. भाजपाचे सरकार आल्यानंतर दलितांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे का, या प्रश्नास उत्तर देताना, आपल्याला तसे वाटत नाही, असे कांबळे यांनी सांगितले. ते म्हणाले, की दलित अत्याचाराबाबत आमचे सरकार गंभीर आहे, अशी कृत्ये करणाऱ्या कुणालाही माफ केले जाणार नाही. कडक कारवाई करणार आहे, असेही त्यांनी संगितले. कुठल्याही दलित बांधवावर अन्याय झाला तर पहिल्यांदा रिपाइंच आवाज उठवते. त्यानंतर बाकीचे येतात. मग आमचे यामध्ये कुठे चुकते का, अशी विचारणा पत्रकार परिषदेत येऊन रिपाइंचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मखरे यांनी थेट दिलीप कांबळे यांना केली. त्या वेळी सर्वच जण अवाक झाले. यावर दिलीप कांबळे तत्काळ उत्तरले, की रिपाइंचे काहीच चुकत नाही. बसून चर्चा करू, असेही मखरे यांना सुचवले.