शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

लाखेवाडी हल्ल्यातील कुटुंबाचे शासन पुनर्वसन करणार

By admin | Updated: June 29, 2015 23:47 IST

‘लाखेवाडी दलित हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेस दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अन्यायग्रस्त

इंदापूर : ‘‘लाखेवाडी दलित हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेस दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अन्यायग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी प्रत्येकी चाळीस हजार रुपये येत्या एक-दोन दिवसांत मिळतील,’’ अशी माहिती समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज (दि. २९) येथे पत्रकार परिषदेत दिली.अन्यायग्रस्त भिंगारदिवे कुटुंबास सामाजिक न्याय विभागाच्या वतीने घर बांधून देण्यात येईल. रहदारीसाठी डांबरी रस्ता तयार करून देण्यात येईल. पाणी, स्वच्छतागृहाचीही व्यवस्था करण्यात येईल, असे सांगून दिलीप कांबळे म्हणाले, की भिंगारदिवे कुटुंबाकडे सहा एकर बागायत जमीन आहे. ती त्यांनी विकावी अथवा ती बळकावता यावी या दृष्टीने आरोपी त्यांच्यावर दबाव आणत होते. त्यातूनच हे हल्ला प्रकरण घडले आहे, असे आज भिंगारदिवे कुटुंबातील सदस्यांशी बोलताना आपल्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांची जमीन त्यांच्या मर्जीशिवाय किमान वीस वर्षे तरी विकली जाणार नाही, अशी व्यवस्था आपण केली आहे, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.कांबळे म्हणाले, की पोलीस यंत्रणेकडून आपण तपासाची माहिती घेतली आहे. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. भा.दं.वि. कलम ३०७ लावण्यात आले आहे. प्रमुख आरोपी पकडले गेले आहेत. मात्र गुंडवजा पैलवान असणारे व ज्यांनी अमानुष मारहाण केली ते २५ ते ३० जण अद्याप फरार आहेत. सर्व आरोपींना अटक करावी. कसल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करावी, असे आदेश आपण पोलीस यंत्रणेस दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे, असे कांबळे म्हणाले.या घटनेमुळे आमच्या लाखेवाडी गावास हल्लेखोरांनी काळीमा फासला, अशी तेथील लोकांची प्रतिक्रिया आहे. मातंग समाजाची गावात केवळ दोनच घरे आहेत. एक तर मागासवर्गीयांकडे जमीनच नसते. ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावर असे प्रसंग येतात, असे या वेळी बोलताना दिलीप कांबळे म्हणाले. दलित अत्याचाराबाबत अहमदनगरनंतर इंदापुरात असे चित्र निर्माण झाले आहे. भाजपाचे सरकार आल्यानंतर दलितांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे का, या प्रश्नास उत्तर देताना, आपल्याला तसे वाटत नाही, असे कांबळे यांनी सांगितले. ते म्हणाले, की दलित अत्याचाराबाबत आमचे सरकार गंभीर आहे, अशी कृत्ये करणाऱ्या कुणालाही माफ केले जाणार नाही. कडक कारवाई करणार आहे, असेही त्यांनी संगितले. कुठल्याही दलित बांधवावर अन्याय झाला तर पहिल्यांदा रिपाइंच आवाज उठवते. त्यानंतर बाकीचे येतात. मग आमचे यामध्ये कुठे चुकते का, अशी विचारणा पत्रकार परिषदेत येऊन रिपाइंचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मखरे यांनी थेट दिलीप कांबळे यांना केली. त्या वेळी सर्वच जण अवाक झाले. यावर दिलीप कांबळे तत्काळ उत्तरले, की रिपाइंचे काहीच चुकत नाही. बसून चर्चा करू, असेही मखरे यांना सुचवले.