शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांमध्ये साहित्य, संस्कृतीबाबत अनास्था

By admin | Updated: June 6, 2015 23:53 IST

पंजाबमध्ये संत नामदेव महाराजांनंतर मराठी भाषेची पताका डॉ.सदानंद मोरे यांनी फडकावली. आजच्या तरुण पिढीमध्ये साहित्य- संस्कृतीविषयी अनास्था दिसून येते.

पिंपरी : पंजाबमध्ये संत नामदेव महाराजांनंतर मराठी भाषेची पताका डॉ.सदानंद मोरे यांनी फडकावली. आजच्या तरुण पिढीमध्ये साहित्य- संस्कृतीविषयी अनास्था दिसून येते. डॉ. मोरे व डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार झाल्यास निश्चितच मोठी साहित्य व सांस्कृतिक चळवळ उभी राहील, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात शनिवारी दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मोरे यांना पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्कार मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, महापौर शकुंतला धराडे, डॉ. मोरे व सुरेखा मोरे, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, संयोजक माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, नगरसेविका उषा वाघेरे उपस्थित होते. मुंडे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदावर डॉ. मोरे यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी मी आणि आमदार हेमंत टकले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. डॉ. मोरे हेच या पदाला न्याय देतील व या पदाची उंची वाढवतील.’’ छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण केले जाते. मात्र, त्यांचा आदर्श घेतला जात नाही. त्यांना काही लोक आपल्या सोयीपुरते ‘बोन्साय’ करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्शियन शब्द राज्यकारभारातून काढून प्राकृत मराठी व शालिवाहन काळातील शब्द वापरून मराठी भाषेस राज्यभाषेचा दर्जा दिला. जोपर्यंत मराठी भाषा ही सत्ता चालविण्याची, न्यायदानाची भाषा होत नाही, तोपर्यंत आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणता येणार नाही, असे डॉ. मोरे म्हणाले. डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘समाजाचा सामाजिक, राजकीय परिस्थितीचा समतोल अभ्यास करणाऱ्या निवडक लोकांमध्ये डॉ. मोरे यांचा समावेश होतो. सध्याच्या पिढीत राजकारणाबद्दलची तुच्छता दिसते. परंतु, समाजात बदल करण्यासाठी राजकारण आवश्यक आहे. जगात अनेक सामाजिक व सांस्कृतिक बदल राजकारणामुळेच झाले आहेत. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची दिशा देण्यामध्ये लेखकांचा खूप मोठा वाटा आहे. मात्र, देशात स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणात लेखकांना महत्त्व उरले नाही. जगाचा सामाजिक अभ्यास केल्यावर कळते की, प्रथम सांस्कृतिक परिवर्तन घडते आणि नंतरच सामाजिक व राजकीय बदल घडतात. यात लेखकांचा मोठा हिस्सा असतो.’’ स्वागत संयोजक वाघेरे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षण मंडळ सदस्य नाना शिवले, तर आभार उपमहापौर वाघेरे यांनी मानले. (प्रतिनिधी)